शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

जिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 12:52 IST

आता ‘गोकुळ’नंतरच जिल्हा बॅँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. नेत्यांना, विशेष करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोकळीक मिळणार असल्याने ‘गोकुळ’चे रणांगण चांगलेच तापणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणारराष्ट्रवादीच्या बचावात्मक भूमिकेला मोकळीक मिळणार

कोल्हापूर : राज्य सरकारने जिल्हा बॅँकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक प्रक्रिया थांबली आहे. ‘गोकुळ’बरोबर जिल्हा बॅँकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने नेत्यांची गोची झाली होती. मात्र आता ‘गोकुळ’नंतरच जिल्हा बॅँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. नेत्यांना, विशेष करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोकळीक मिळणार असल्याने ‘गोकुळ’चे रणांगण चांगलेच तापणार आहे.‘गोकुळ’ व जिल्हा बॅँक या दोन संस्था जिल्ह्याच्या शिखर संस्था आहेत. येथे सत्ता मिळविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांत चढाओढ असते. ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिलच्या शेवटच्या, तर जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची मुदत मेच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू होत असल्याने राजकीय नेत्यांची कोंडी होते.

सध्या जिल्हा बॅँकेची ठराव संकलित करण्याची प्रक्रिया थांबणार आहे. साधारणत: २७ एप्रिलनंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे. तोपर्यंत म्हणजेच साधारणत: १३ एप्रिलला ‘गोकुळ’चे मतदान होण्याची शक्यता आहे.‘गोकुळ’च्या राजकारणाचे पडसाद जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीवर पडतात. त्यामुळे राष्ट्रवादी  कॉँग्रेस ‘गोकुळ’च्या निवडणुकीत बचावात्मक भूमिका घेते. या वेळेलाही राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा. त्या बदल्यात जिल्हा बॅँकेत सहकार्य करू, अशी भूमिका आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांनी घेतली आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही दिल्याची चर्चा आहे.

इकडे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांना जवळ घ्यायचे की आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांना सोबत घेऊन जिल्हा बॅँकेचे राजकारण सोपे करायचे, अशी गोची मंत्री हसन मुश्रीफ यांची झाली आहे.

तीच अडचण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील व आमदार राजेश पाटील यांची आहे. त्यानुसार राष्ट्रवादीमध्ये सावध हालचाली सुरू आहेत. आता जिल्हा बॅँकेची निवडणूक पुढे गेल्याने या नेत्यांना मोकळीक मिळणार आहे.तीन महिने पुढे प्रक्रिया गेली तरी प्रत्यक्षात निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. तोपर्यंत ‘गोकुळ’चे राजकारण शांत होईल आणि बॅँकेची निवडणूक सोपी जाईल, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करील.जिल्हा बॅँकेची निवडणूक आॅक्टोबरमध्ये शक्यसरकारने २७ एप्रिलपर्यंत निवडणूक लांबणीवर टाकली आहे. मात्र त्यानंतर प्रक्रिया सुरू करून निवडणुका होईपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे कारण पुढे करीत निवडणुकांना मुदतवाढ मिळू शकते. परिणामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्येच बॅँकेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर