शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

निराधारांचा आधार- दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:54 IST

चंद्रकांत कित्तुरेभूक एक अशी गोष्ट आहे की, जी आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही. ती कशाचीही असू शकते. मग ती अन्नाची असेल, शिक्षणाची असेल, पैशाची असेल, यशाची असेल. ही भूक भागविण्यासाठी माणूस आयुष्यभर कष्ट करीत असतो. पैसा असेल तर सर्व काही मिळविता येते असा एक आपला सर्वसाधारण समज असतो. म्हणूनच आपण ...

चंद्रकांत कित्तुरेभूक एक अशी गोष्ट आहे की, जी आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही. ती कशाचीही असू शकते. मग ती अन्नाची असेल, शिक्षणाची असेल, पैशाची असेल, यशाची असेल. ही भूक भागविण्यासाठी माणूस आयुष्यभर कष्ट करीत असतो. पैसा असेल तर सर्व काही मिळविता येते असा एक आपला सर्वसाधारण समज असतो. म्हणूनच आपण पैशाच्या पाठीमागे लागलेले असतो. पोटाची भूक भागविण्यासाठी आपल्याला अन्न लागते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. त्या भागल्या की माणसाला अन्य प्रकारची भूक भागविण्यासाठी प्रयत्न करता येतात, पण त्याच भागल्या नाहीत तर जगायचे कसे हाच त्याच्यापुढचा सर्वांत मोठा प्रश्न असतो. कुपोषण, भूकबळी यांसारखे प्रश्न त्यामुळेच खूप गंभीर आहेत. आपल्याकडे कुपोषणचा प्रश्न मोठा नसला तरी गरीब-श्रीमंत ही दरी मोठी आहेच. अनेकांच्या घरी दोनवेळचे खायचे वांदे असतात. अशावेळी घरात, कुटुंबात वाद होतात. पुरुषमंडळी व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. यामुळे त्या कुटुबांचे स्वास्थ्यच हरवून जाते. अशा अनेक घरांंमध्ये वृद्ध आई-वडील किंवा काही काम न करणारे कोणी असेल तर ते घरात नकोसे वाटतात. यातून होणाऱ्या भांडणातून एकतर आई-वडील घराबाहेर पडतात किंवा मुले. त्याचप्रमाणे मनोरुग्ण, संतती नसलेले ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य काही कारणांमुळेही एकाकी जीवन कंठणारे नागरिक एकप्रकारे निराधारच बनलेले असतात. ते आधार आणि मायेच्या शोधात असतात. अशा निराधारांना आधार देणारेही अनेकजण समाजात आहेत. कुणी व्यक्तिगत पातळीवर, तर कुणी संघटनात्मक पातळीवर असा आधार देत असतात. अशीच एक संस्था जयसिंगपूर येथे २०१४ पासून कार्यरत आहे. जयसिंगपूर युवा फौंडेशन तिचे नाव. जयसिंगपूर शहराला भूकमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्नशील आहे. अझहर पटेल व त्यांच्या काही मित्रांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. काय करावयाचे याचा विचार करत असताना निराधार, असाहाय्य बनलेल्यांचा आधार बनण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी पहिले पाऊल म्हणून असे लोक शोधून त्यांना दोनवेळचे जेवण घरपोच देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काटेकोर निकष लावून जे गरजू आहेत त्यांनाच याचा लाभ मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केली. ४ एप्रिल २०१४ रोजी त्यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला. सुरुवातीला स्वत:च्या खिशातून पैसे घातले. त्यांचे हे कार्य पाहून शहरातील उद्योजक, दानशूर व्यक्तींनीही या उपक्रमासाठी मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. त्यामुळे उत्साह वाढलेल्या या तरुणांनी या निराधारांच्या आरोग्याची काळजी वाहण्याचे ठरवले. त्यासाठी खास एका डॉक्टरची नेमणूक केली. महिन्यातून एकदा त्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचारही मोफत करण्यास सुरुवात केली. याशिवाय कपडेही दिले जातात. सध्या ५० हून अधिक अशा असाहाय्य, निराधारांचा आधार ही संस्था बनलेली आहे. यंदा ४ एप्रिलपासून ५० हून अधिक लोकांना सकाळचा चहा, नाष्टाही घरपोच देण्यास सुरुवात केली आहे. कनकभाई शहा आणि भाऊसाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संस्थेच्या कार्यात अझहर यांना निखिल कुंभार, अमर पाटील, सचिन मोठे, समर पाटील, जुनेद गवंडी, चेतन माने, अक्षय परुळेकर, हेमंत जाधव, शंभू हजारे, मनोज शिंदे, रोहित साळुंखे, मुकुंद हजारे, पूनम पाटील, सोनल पटेल आदींची साथ आहे. हे सर्वजण मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. व्यवसाय, नोकरी सांभाळून हे कार्य ते करीत आहेत. निराधारांचा आधार बनले आहेत. जयसिंगपूर ९५ टक्के तरी भूकमुक्त झाले असल्याचा दावा अझहर पटेल करतात. भविष्यात परिसरातील गावांमध्येही हा उपक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचे हे कार्य इतरांसाठी अनुकरणीय आहे. (लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.kollokmatpratisad@gmail.com  )