शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

राज्य सरकार पाडण्यासाठी सौदेबाजी, तुषार गांधी यांचा आरोप; सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 11:48 IST

काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे.

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी विकाऊ लोकांची सौदेबाजी झाली. खुलेआम लोकशाहीची थट्टा करण्यात आली. मतदारांनी निवडून दिले म्हणून सौदेबाजी करून त्यांनी कमाई केली. म्हणून सौदेबाजांना मतदारांनी जाब विचारावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी रविवारी केले.

जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे वितरण आयोजित पुरस्कार कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 'गांधीजींच्या खुनानंतर ७५ वर्षांनी त्यांची आपल्याला आवश्यकता . आहे का?' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी 'जगन फडणीस स्मृतीशोध पत्रकारिता पुरस्कार' दिल्ली येथील साहित्यिक आणि इतिहास संशोधक अशोककुमार पांडेय यांना देण्यात आला. शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.

गांधी म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी निवडणूक व्यवस्था आणि लोकशाहीची खिल्ली उडविण्यात आली. काय ते डोंगार, काय ते हाटील हे जणू काय राष्ट्रगीत असल्याप्रमाणे समाज माध्यमात व्हायरल झाले. हे लोकशाहीला घातक आहे. बिल्कीस बानू या महिलेवर बलात्कार करून हत्या केलेले आरोपी उच्चवर्णीय असल्याने सुटल्याचे सांगितले जात आहे. यामुळे सध्याच्या न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभा केले जात आहे.पांडेय म्हणाले, महात्मा गांधी यांनी जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या जातीय अस्मिता टोकदार बनवल्या आहेत. जातीय हिंसा घडवून आणले जात आहे.यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके, ओमप्रकाश कलमे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते. डॉ. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. निशिकांत चाचे यांनी आभार मानले.समाज गप्प म्हणून

  • गेल्या आठ वर्षांत संविधानात अनेक बदल करण्यात आले. जातीय हिंसा झाल्या. मॉब लिचिंगच्या घटना झाल्या,
  • लोकशाहीतील संस्था डळमळीत करण्यात आल्या. तरीही समाज गप्प आहे. त्यामुळे वाईट घटना वाढत आहेत, असे मत गांधी यांनी व्यक्त केले.

अश्रू अनावर

  • राजस्थानमधील दलित मुलाची माठातील पाणी प्यायल्याने हत्या झाली. तरीही समाजाकडून अपेक्षित उठाव झाला नाही.
  • ही घटना सांगताना गांधी यांना अश्रू अनावर झाले. इतकी गंभीर घटना घडूनही पंतप्रधानाकडून दुःख व्यक्त केले नाही. नाटकी अश्रूही काढले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस