शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

बाप्पा चालले आपल्या गावाला, घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:09 IST

गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.

ठळक मुद्देबाप्पा चालले आपल्या गावालाघरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.ज्या गणरायाची भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहतात, त्या गणपतीचे आगमन झाले. यंदा कोरोनाचे संकट दारादारांत असताना देवाच्या स्वागतात आणि धार्मिक विधीत मात्र कोणतीही कमतरता ठेवू न देता कोल्हापूरकरांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. घरोघरी सुंदर आरास सजली.

आपापल्या पातळीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नागरिकांनी या सणाचा आनंद लुटला. बाप्पांचा पाच दिवस भक्तांच्या घरी छान पाहुणचार झाला. गणपतीपाठोपाठ गौरी आणि शंकरोबाही आले. या परिवार देवतांचे पूजन झाले. पंचपक्वान्नांचा नैवेद्य झाला. आज, गुरुवारी सहाव्या दिवशी भाविकांना जड अंत:करणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला. गणपतीबरोबरच गणोबा, ज्येष्ठा गौरी आणि शंकरोबाचेही विसर्जन झाले.यंदा कोल्हापुरात गणेश विसर्जन काहिलीतसकाळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर निलोफर आजगेकर यांच्या हस्ते गणेशाची आरती करून मिरजकर तिकटी येथून गणेश विसर्जनाला सुरवात झाली. बालगोपाल तालिम येथे मान्यवरांच्या हस्ते काहिलीमध्ये पंचगंगेचे पाणी ओतून विसर्जनाला सुरवात झाली आहे.दरवर्षी पंचगंगा नदीघाट, रंकाळा, कळंबा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक येऊन आपापल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने नागरिकांना आपापल्या भागातच गणेशमूर्तीचे विसर्जन करा असे आवाहन केले. त्यासाठी ठिकठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी काहिली व विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली. कोल्हापूर शहरासाठी महापालिका व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विसर्जनाचे नियोजन करण्यात आले.घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन असल्याने या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीसह अन्य तलावांत गणेशमूर्ती विसर्जनाला मनाई केली आहे. शहरातील रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, राजाराम या तलावांत प्रवेशबंदी करण्यात आली होती, यामुळे भाविकांनी विसर्जन कुंडांतच मूर्तींचे विसर्जन केले.घरगुती गौरी-गणपती विसर्जनाला आज, गुरुवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. विसर्जन करताना गर्दीतून न कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा काम करीत होती.

गणेश विसर्जनाला भाविकांनी नदी, तलावांच्या ठिकाणी न जात आपल्या प्रभागातच महापालिकेच्या वतीने ठेवलेल्या विसर्जन कुंडांचा वापर करत प्रशासनाला सहकार्य केले. येथे विसर्जित मूर्ती तसेच मूर्तिदानातून जमा होणाऱ्या मूर्तींचे विधीवत विसर्जन इराणी खणीमध्ये करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे.नदी, तलाव परिसरात बॅरिकेडिंगपंचगंगा नदीघाटावर जाणारा मार्ग, रंकाळा, कळंबा, राजाराम, कोटीतीर्थ या तलावांच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते. विसर्जनासाठी नदी, तलावाच्या जाण्यास सर्वांना प्रतिबंध करण्यात आले. भाविकांनीहि आपापल्या प्रभागांत विसर्जन कुंडांत गणेशमूर्ती विसर्जित केल्या.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण