शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बाप्पा चालले आपल्या गावाला, घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 17:09 IST

गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.

ठळक मुद्देबाप्पा चालले आपल्या गावालाघरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

कोल्हापूर : गेल्या पाच दिवसांपासून भक्तांकडून पाहुणचार घेत असलेले घरगुती गणपती बाप्पा तसेच गंगा-गौरी शंकरोबांचे आज, गुरुवारी विसर्जन झाले. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या सणाला यंदा पाणवठ्यांऐवजी भागाभागांतच काहिलीतून मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.ज्या गणरायाची भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहतात, त्या गणपतीचे आगमन झाले. यंदा कोरोनाचे संकट दारादारांत असताना देवाच्या स्वागतात आणि धार्मिक विधीत मात्र कोणतीही कमतरता ठेवू न देता कोल्हापूरकरांनी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला. घरोघरी सुंदर आरास सजली.

आपापल्या पातळीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून नागरिकांनी या सणाचा आनंद लुटला. बाप्पांचा पाच दिवस भक्तांच्या घरी छान पाहुणचार झाला. गणपतीपाठोपाठ गौरी आणि शंकरोबाही आले. या परिवार देवतांचे पूजन झाले. पंचपक्वान्नांचा नैवेद्य झाला. आज, गुरुवारी सहाव्या दिवशी भाविकांना जड अंत:करणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला. गणपतीबरोबरच गणोबा, ज्येष्ठा गौरी आणि शंकरोबाचेही विसर्जन झाले.यंदा कोल्हापुरात गणेश विसर्जन काहिलीतसकाळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर निलोफर आजगेकर यांच्या हस्ते गणेशाची आरती करून मिरजकर तिकटी येथून गणेश विसर्जनाला सुरवात झाली. बालगोपाल तालिम येथे मान्यवरांच्या हस्ते काहिलीमध्ये पंचगंगेचे पाणी ओतून विसर्जनाला सुरवात झाली आहे.दरवर्षी पंचगंगा नदीघाट, रंकाळा, कळंबा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक येऊन आपापल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. यंदा कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने नागरिकांना आपापल्या भागातच गणेशमूर्तीचे विसर्जन करा असे आवाहन केले. त्यासाठी ठिकठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनासाठी काहिली व विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली. कोल्हापूर शहरासाठी महापालिका व ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विसर्जनाचे नियोजन करण्यात आले.घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन असल्याने या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदीसह अन्य तलावांत गणेशमूर्ती विसर्जनाला मनाई केली आहे. शहरातील रंकाळा, कोटीतीर्थ, कळंबा, राजाराम या तलावांत प्रवेशबंदी करण्यात आली होती, यामुळे भाविकांनी विसर्जन कुंडांतच मूर्तींचे विसर्जन केले.घरगुती गौरी-गणपती विसर्जनाला आज, गुरुवारी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत. विसर्जन करताना गर्दीतून न कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणा काम करीत होती.

गणेश विसर्जनाला भाविकांनी नदी, तलावांच्या ठिकाणी न जात आपल्या प्रभागातच महापालिकेच्या वतीने ठेवलेल्या विसर्जन कुंडांचा वापर करत प्रशासनाला सहकार्य केले. येथे विसर्जित मूर्ती तसेच मूर्तिदानातून जमा होणाऱ्या मूर्तींचे विधीवत विसर्जन इराणी खणीमध्ये करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले आहे.नदी, तलाव परिसरात बॅरिकेडिंगपंचगंगा नदीघाटावर जाणारा मार्ग, रंकाळा, कळंबा, राजाराम, कोटीतीर्थ या तलावांच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते. विसर्जनासाठी नदी, तलावाच्या जाण्यास सर्वांना प्रतिबंध करण्यात आले. भाविकांनीहि आपापल्या प्रभागांत विसर्जन कुंडांत गणेशमूर्ती विसर्जित केल्या.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Visarjanगणेश विसर्जनMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण