शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

उसाचा रस, बी हेवी मोलॅसिसपासून अल्कोहोल निर्मितीवरील बंदी शिथिल; केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 12:34 IST

साखर कारखान्यांना दिलासा

कोल्हापूर: उसाचा रस आणि बी हेवी मोलॅसिस पासून अल्कोहोल निर्मिती वरील बंदी २०२४-२५ च्या हंगामाकरिता केंद्र सरकारने शुक्रवारी उठवली. साखर कारखानदारीसाठी हा एक दिलासादायक निर्णय आहे.देशात साखरेचा पुरवठा कमी पडू नये यासाठी दक्षता म्हणून १५ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने एका आदेशाद्वारे उसाचा रस आणि बी हेवी मोलासिस पासून रेक्टिफाईड स्पिरिट ,इथेनॉल आणि एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल निर्मितीवर बंदी घातली होती. यातील इथेनॉल निर्मिती वरील बंदी काही दिवसापूर्वीच उठविली. अल्कोहोल आणि रेक्टिफाइड स्पिरिटवरील बंदीही उठवावी, अशी साखर उद्योगाची मागणी होती.आगामी हंगामात साखरेचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. तसेच हंगामाच्या सुरुवातीला शिल्लक साखरेचा साठाही पुरेसा असणार आहे. या पार्श्वभूमीवर आधी इथेनॉल आणि आता अल्कोहोल निर्मितीवरील बंदीही उठविल्याने आगामी हंगाम साखर कारखानदारीसाठी चांगला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

साखरेचा विक्री दर वाढवावासाखरेचा किमान विक्री दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तो वाढवून ४२००रुपये करावा अशी मागणी साखर कारखानदारांकडून गेल्या दोन-तीन वर्षापासून होत आहे. केंद्र सरकारने ही मागणी अद्याप पूर्ण केलेली नाही. साखरेचा विक्री दर वाढल्यास साखर कारखान्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यास मदत होणार आहे.

केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयामुळे तयार होणारे अल्कोहोल हे केमिकल उत्पादने, देशी दारूचे उत्पादन तसेच फॉरेन लिकर साठी उपयोगी असल्याने त्यासाठीची बाजारपेठ कारखान्यांना उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यास मदत होणार असल्याने केंद्राचा हा निर्णय दिलासादायक आहे. -पी.जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेCentral Governmentकेंद्र सरकार