शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:22 IST

राजकीय फायदा मिळविण्याकरिता बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला

मुंबई : कोल्हापूरच्या विशाळगडावरील संरक्षित क्षेत्रामध्ये प्राण्यांचा बळी देण्याच्या जुन्या प्रथेवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय, मुंबईच्या उपसंचालकांनी १ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निर्देशाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यामध्ये उपसंचालकांनी उच्च न्यायालयाच्या १९९८ च्या निकालाचा हवाला दिला आहे. या निकालाद्वारे सार्वजनिक ठिकाणी देवी-देवतांच्या नावाने बळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. राजकीय फायदा मिळविण्याकरिता बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.ही याचिका विशाळगडावरील हजरत पीर, लिक रेहान मिरा साहेब दर्गा या ट्रस्टने दाखल केली आहे. हा दर्गा अत्यंत जुना असून येथे हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक भेट देतात, असे ट्रस्टने याचिकेत म्हटले आहे. आजही दोन्ही धर्माचे लोक येथील कबरीची पूजा करतात, असा दावा ट्रस्टने केला आहे.प्राण्यांचा बळी देणे, ही दर्ग्याची अविभाज्य प्रथा आहे. वास्तविकता प्राण्यांचा बळी सार्वजनिक ठिकाणी दिला जात नाही. तर, खासगी मालकीच्या जागेवर दिला जातो, असे याचिकेत म्हटले आहे. कोणत्याही राजाने, हिंदू, मुस्लीम किंवा ब्रिटिशांनीही येथे प्राण्यांचा बळी देण्यास बंदी घालण्याचा विचार केला नाही. येथे प्राण्यांचा बळी देत असल्याने आजूबाजूच्या खेड्यातील गरीब लोकांना अन्न मिळते. राज्य सरकारचा हा निर्णय मनमानी व भेदभाव करणारा आहे, असे याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्त्या ट्रस्टने केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडHigh Courtउच्च न्यायालय