शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 15:22 IST

राजकीय फायदा मिळविण्याकरिता बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला

मुंबई : कोल्हापूरच्या विशाळगडावरील संरक्षित क्षेत्रामध्ये प्राण्यांचा बळी देण्याच्या जुन्या प्रथेवर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय, मुंबईच्या उपसंचालकांनी १ फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या निर्देशाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यामध्ये उपसंचालकांनी उच्च न्यायालयाच्या १९९८ च्या निकालाचा हवाला दिला आहे. या निकालाद्वारे सार्वजनिक ठिकाणी देवी-देवतांच्या नावाने बळी देण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश उजव्या विचारसरणीच्या संघटनांच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. राजकीय फायदा मिळविण्याकरिता बहुसंख्याकांना खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.ही याचिका विशाळगडावरील हजरत पीर, लिक रेहान मिरा साहेब दर्गा या ट्रस्टने दाखल केली आहे. हा दर्गा अत्यंत जुना असून येथे हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक भेट देतात, असे ट्रस्टने याचिकेत म्हटले आहे. आजही दोन्ही धर्माचे लोक येथील कबरीची पूजा करतात, असा दावा ट्रस्टने केला आहे.प्राण्यांचा बळी देणे, ही दर्ग्याची अविभाज्य प्रथा आहे. वास्तविकता प्राण्यांचा बळी सार्वजनिक ठिकाणी दिला जात नाही. तर, खासगी मालकीच्या जागेवर दिला जातो, असे याचिकेत म्हटले आहे. कोणत्याही राजाने, हिंदू, मुस्लीम किंवा ब्रिटिशांनीही येथे प्राण्यांचा बळी देण्यास बंदी घालण्याचा विचार केला नाही. येथे प्राण्यांचा बळी देत असल्याने आजूबाजूच्या खेड्यातील गरीब लोकांना अन्न मिळते. राज्य सरकारचा हा निर्णय मनमानी व भेदभाव करणारा आहे, असे याचिकेत म्हटले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्त्या ट्रस्टने केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडHigh Courtउच्च न्यायालय