शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बालन्याय विधेयकामुळे बालगुन्हेगारांना चाप

By admin | Updated: December 24, 2015 00:33 IST

१६ वर्षांच्या बालगुन्हेगारांचा प्रौढ गुन्हेगारांच्या यादीत समावेश

एकनाथ पाटील - कोल्हापूर -खून, चोरी, आदी गुन्ह्यांमध्ये १८ वर्षांपर्यंतच्या मुलांचा सहभाग वाढत आहे. या गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याने ते भयानक गंभीर गुन्ह्यांमधूनही सहीसलामत सुटत होते. वाढत्या बालगुन्हेगारीच्या घटनांमुळे पाल्यांसह पोलिसांची डोकेदुखीही वाढली होती. बहुचर्चित ‘बालन्याय सुधारणा विधेयक’ राज्यसभेत मंजूर झाल्याने बालगुन्हेगारांचे वय आता १८ वरून १६ करण्यात आले आहे. एकंदरीत १६ ते १८ वर्षांतील मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. या नवीन कायद्यामुळे आता बालगुन्हेगारीला चांगलाच चाप बसणार आहे. मित्राचा मोबाईल पाहून परिस्थिती नसतानाही आई-वडिलांकडे मोबाईल, सायकल, दुचाकी, किमती कपडे यासाठी मुले हट्टी बनली आहेत. आई-वडिलांनी त्याला विरोध करीत परिस्थितीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर त्याचेही त्यांना वावडे वाटते. अखेर चोरी करण्याकडे त्यांचे पाय वळतात. बऱ्यापैकी नववी ते बारावीपर्यंतच्या मुलांकडून मोबाईल, दुचाकी चोरी असे प्रकार जास्त घडत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, खून, बलात्कारांमध्येही बालगुन्हेगारांचे प्रमाण जास्त आहे. १८ वर्षांखालील बालगुन्हेगाराला ‘विधिसंघर्ष बालक’ म्हणून पोलीस ताब्यात घेतात. त्याला पोलीस कोठडीत ठेवता येत नसल्याने त्याच्या आई-वडिलांना बोलावून त्याला समज दिली जाते. त्याला सुधारण्याची हमी आई-वडिलांनी दिली तर त्याला त्यांच्या ताब्यात दिले जाते. जे बालगुन्हेगार सुधारण्याच्या मानसिकतेत नाहीत, त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. राधानगरी येथे वडिलांचा खून, राजारामपुरी परिसरात चैनीसाठी मोबाईल व दुचाकींची चोरी अशा गंभीर घटना गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कोल्हापुरात घडल्या आहेत. गंभीर गुन्ह्यांतून सहीसलामत सुटत असल्याने १८ वर्षांखालील मुलांना कायद्याची भीतीच राहिली नव्हती. सन २०१२ मधील ‘निर्भया’ प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराला कोणत्या कायद्याच्या आधारावर अटकेत ठेवायचे, याबाबत पुरेसे कायदेच नाहीत, असे स्पष्ट करीत सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी या आरोपीची सुटका करण्याचे निर्देश दिले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘बालन्याय सुधारणा विधेयक’ राज्यसभेत मंजूर झाल्याने आता १६ वर्षांच्या मुलाने एखादा गुन्हा केला तर तो ‘प्रौढ गुन्हेगार’ म्हणून पोलीस रेकॉर्डवर नोंदविला जाणार आहे. या कायद्यामुळे बालगुन्हेगारांचे प्रमाण कमी होणार आहे, तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचे मुलांचे धाडस होणार नाही. त्यांच्यावर या कायद्याचा चांगलाच वचक बसेल. - धन्यकुमार गोडसे,पोलीस निरीक्षक बालन्याय विधेयकामध्ये बालगुन्हेगारांचे वय १८ ऐवजी १६ वर्षे करून चांगला निर्णय घेण्यात आला आहे. या नवीन कायद्यामुळे मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे धाडस करणार नाहीत. - अ‍ॅड. चंद्रकांत बुधले,विशेष सरकारी वकील