शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘बालगोपाल’ अंतिम फेरीत --पाटाकडील ‘अ’वर टायब्रेकरवर मात :

By admin | Updated: February 13, 2015 23:24 IST

घारगे स्मृती फुटबॉल चषक स्पर्धा

कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघास ४-३ अशी टायब्रेकरवर मात देत अवधूत घारगे स्मृती फुटबॉल चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लढवय्या खेळाडू म्हणून पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील यास गौरविण्यात आले.छत्रपती शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी ‘बालगोपाल’ विरुद्ध पाटाकडील (अ) यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन केले. पाटाकडील ‘अ’कडून ९ व्या मिनिटास रूपेश सुर्वे याने मैदानी गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी काही काळच टिकली. ११व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून जयकुमार पाटील याने गोल नोंदवीत सामन्यात १-१ अशी बरोबरी आणली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. ‘बालगोपाल’च्या ऋतुराज पाटील व रोहित कुरणे यांचे गोल करण्याचे प्रयत्न पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील याने निष्फळ ठरविले; ‘बालगोपाल’कडून सचिन गायकवाड, आशिष कुरणे, रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, तर पाटाकडील (अ)कडून उत्सव मरळकर, अक्षय मेथे-पाटील, ऋषिकेश मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे, नियाज पटेल, दीपक थोरात यांनी वेगवान व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ५७ व्या मिनिटास ‘बालगोपाल’च्या पेनल्टी क्षेत्रात आशिष कुरणे याने चेंडू हाताळल्याबद्दल पंचांनी पाटाकडील (अ)ला पेनल्टी बहाल केली. यावर अक्षय मेथे-पाटील याने अचूक गोल नोंदवीत २-१ अशी आघाडी वाढविली. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी ‘बालगोपाल’च्या खेळाडूंनी जिवाचे रान केले. सामन्याच्या शेवटच्या पाच सेकंदांत ‘बालगोपाल’च्या अजिंक्य जाधव याने गोल नोंदवीत सामना बरोबरीत आणला. यावर टायब्रेकरचा अवलंब केला. यामध्ये ‘बालगोपाल’ने ४-३ असा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.