शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

‘बालगोपाल’ अंतिम फेरीत --पाटाकडील ‘अ’वर टायब्रेकरवर मात :

By admin | Updated: February 13, 2015 23:24 IST

घारगे स्मृती फुटबॉल चषक स्पर्धा

कोल्हापूर : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणाऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघास ४-३ अशी टायब्रेकरवर मात देत अवधूत घारगे स्मृती फुटबॉल चषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. लढवय्या खेळाडू म्हणून पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील यास गौरविण्यात आले.छत्रपती शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी ‘बालगोपाल’ विरुद्ध पाटाकडील (अ) यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक व चुरशीच्या खेळाचे प्रदर्शन केले. पाटाकडील ‘अ’कडून ९ व्या मिनिटास रूपेश सुर्वे याने मैदानी गोल नोंदवीत संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी काही काळच टिकली. ११व्या मिनिटास ‘बालगोपाल’कडून जयकुमार पाटील याने गोल नोंदवीत सामन्यात १-१ अशी बरोबरी आणली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. ‘बालगोपाल’च्या ऋतुराज पाटील व रोहित कुरणे यांचे गोल करण्याचे प्रयत्न पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील याने निष्फळ ठरविले; ‘बालगोपाल’कडून सचिन गायकवाड, आशिष कुरणे, रोहित कुरणे, ऋतुराज पाटील, तर पाटाकडील (अ)कडून उत्सव मरळकर, अक्षय मेथे-पाटील, ऋषिकेश मेथे-पाटील, अजिंक्य नलवडे, नियाज पटेल, दीपक थोरात यांनी वेगवान व उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ५७ व्या मिनिटास ‘बालगोपाल’च्या पेनल्टी क्षेत्रात आशिष कुरणे याने चेंडू हाताळल्याबद्दल पंचांनी पाटाकडील (अ)ला पेनल्टी बहाल केली. यावर अक्षय मेथे-पाटील याने अचूक गोल नोंदवीत २-१ अशी आघाडी वाढविली. सामन्यात बरोबरी साधण्यासाठी ‘बालगोपाल’च्या खेळाडूंनी जिवाचे रान केले. सामन्याच्या शेवटच्या पाच सेकंदांत ‘बालगोपाल’च्या अजिंक्य जाधव याने गोल नोंदवीत सामना बरोबरीत आणला. यावर टायब्रेकरचा अवलंब केला. यामध्ये ‘बालगोपाल’ने ४-३ असा सामना जिंकत अंतिम फेरी गाठली.