शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

‘राष्ट्रवादी’तून आवाडे यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:59 AM

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार व काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले व्यक्तिगत संबंध व काँग्रेसमध्ये आता कोणच ‘गॉडफादर’ राहिले नसल्याच्या कारणावरून आवाडे यांनी हा पर्याय निवडला असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढविण्याची ...

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार व काँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले व्यक्तिगत संबंध व काँग्रेसमध्ये आता कोणच ‘गॉडफादर’ राहिले नसल्याच्या कारणावरून आवाडे यांनी हा पर्याय निवडला असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीने जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढविण्याची तयारी सुरू केली असून, त्या प्रयत्नाचांच हा भाग असल्याचे मानण्यात येते.गेल्याच पंधरवड्यात काँग्रेसअंतर्गत जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांच्याशी असलेले राजकीय वैर आवाडे कुटुंबीयांनी संपुष्टात आणले व हातात हात घेऊन काँग्रेस मजबूत करण्याची ग्वाही दिली. आवाडे घराणे आजपर्यंत काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे व त्या पक्षानेही त्यांना आजपर्यंत सत्तेची भरपूर संधी दिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होतानाच ते त्या पक्षात जातील असे होरा होता; परंतु त्यावेळी त्यांनी काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला; तथापि आजपर्यंतच्या वाटचालीत पवार यांची आवाडे यांच्या ताब्यातील संस्थांच्या अडीअडचणीवेळी खूप मदत झाली आहे. ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांना अखिल भारतीय सहकारी साखर कारखाना महासंघावरही पवार यांच्यामुळेच संधी मिळाली होती.गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याचा हातकणंगले मतदारसंघ आवाडे यांच्यासाठी पवार यांनीच सोडला व त्यांना विजयी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. या सर्व प्रक्रियेत आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती.आता त्यांच्याकडेच पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी त्यांनी काही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातूनच प्रकाश आवाडे यांचे नाव विधानसभेसाठी राष्ट्रवादीतून पुढे आले आहे.इचलकरंजीत राष्ट्रवादीत मदन कारंडे व माजी आमदार अशोक जांभळे असे दोन गट आहेत. त्यांना पक्षाने आपल्याला ही जागा लढवायची असल्याने बूथ कमिट्यांची रचना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उमेदवार कोण असेल हे सांगितलेले नाही.स्थानिक राजकारणात आवाडे व कारंडे गट यांच्यात टोकाचेवितुष्ट आहे, हेदेखील नाकारता येत नाही.पाच जागांचा आग्रहराष्ट्रवादीने जिल्ह्यातील कागल-गडहिंग्लज, चंदगड-आजरा, राधानगरी-भुदरगड हे हक्काचे तीन मतदारसंघ व त्याचबरोबर शिरोळ आणि इचलकरंजी असे पाच मतदारसंघ लढविण्याची तयारी केली आहे. इचलकरंजीत आवाडे गट काँग्रेससोबतच राहिला तर कोल्हापूर उत्तरच्या जागेवरही हा पक्ष दावा करू शकतो; परंतु ‘उत्तर’मध्ये पक्षाकडे ताकदीने लढण्यासाठी उमेदवार नाही. त्यामुळे इचलकरंजीवर लक्ष केंद्रित केले आहे. पक्षाने कार्याध्यक्षपदी राजेंद्र यड्रावकर यांना संधी दिली, त्यामागेही विधानसभेचेच राजकारण आहे.