प्लास्टिकचा वापर टाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST2021-09-22T04:27:37+5:302021-09-22T04:27:37+5:30
इचलकरंजी : मानवी जीवनाला सर्व बाजूंनी प्लास्टिकने व्यापले आहे. अत्यावश्यक कारणासाठी समर्थनीय आहे; पण त्याचा अतिरेक झाल्याने गंभीर समस्या ...

प्लास्टिकचा वापर टाळावा
इचलकरंजी : मानवी जीवनाला सर्व बाजूंनी प्लास्टिकने व्यापले आहे. अत्यावश्यक कारणासाठी समर्थनीय आहे; पण त्याचा अतिरेक झाल्याने गंभीर समस्या निर्माण होत आहेत. नगरपालिकेच्या कचरा गाडीतून प्लास्टिक कचरा गोळा होतो. तो ओल्या कचऱ्याबरोबर असल्याने वेगळे करणे आणि रिसायकलिंग करणे कठीण आहे. त्यामुळे लोकांनीच त्याचा वापर टाळावा, असे मत नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित प्लास्टिकमुक्ती अभियान कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन हरीश बोहरा होते.
बोहरा म्हणाले, विद्यार्थिनींनी प्लास्टिक पिशव्या वापरणे पूर्ण बंद करून कापडी पिशव्या वापराव्यात. प्लास्टिक मानव व पाळीव प्राण्यांच्याही आरोग्याला घातक आहे. कार्यक्रमात विद्यार्थिनी व शिक्षकांच्या माध्यमातून जमविलेल्या प्लास्टिक पिशव्या व बॉटल प्लास्टिक रिसायकल मिशनकडे सोपविण्यात आल्या. मुख्याध्यापिका एस.एस. गोंदकर यांनी स्वागत केले. यावेळी विठ्ठल सुर्वे, डॉ. ज्योती बडे, रेणू डांगरे, उपप्राचार्य आर.एस. पाटील, व्ही.एन. कांबळे यांच्यासह शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थिनींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शेखर शहा यांनी केले. एस.एस. भस्मे यांनी आभार मानले.
फोटो ओळी
२१०९२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित प्लास्टिकमुक्ती अभियान उपक्रम राबविण्यात आला.