शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

शेतीमाल हमीभावात सरासरी दोनशेची वाढ--शेतकºयांना दिलासा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र शासनाने खरीप पिकांच्या शेतीमालाचा हमीभाव निश्चित केल्याने क्विंटलला सरासरी दोनशे रुपये हमीभाव वाढला आहे.

ठळक मुद्देआधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास बाजार समिती कारवाई करणारतो खरीप हंगामापासून लागू झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाºयांना शेतमाल खरेदी करता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क  सांगली : केंद्र शासनाने खरीप पिकांच्या शेतीमालाचा हमीभाव निश्चित केल्याने क्विंटलला सरासरी दोनशे रुपये हमीभाव वाढला आहे. सोयाबीन क्विंटलला २७५ रुपये, भुईमूग २३०, सूर्यफूल ३५०, तूर ४००, तर मुगाला ३५० रुपयांची वाढ झाली आहे. आता सोयाबीन ३०५० रुपये, भुईमूग ४४५०, तर ज्वारी १७२५ रुपये क्विंटलने खरेदी केली जाईल. शेतीमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास व्यापाºयांवर कारवाई करण्याचा इशारा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी बुधवारी दिला.

दरवर्षी खरीप हंगामापूर्वी केंद्र शासनाकडून पिकांच्या कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाते. मागील काही दिवसांपासून महागाईत वाढ होऊ लागली आहे. महागाई वाढत असताना, शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. प्रत्येकवर्षी किमान हमीभावात वाढ होते, मात्र उत्पादन आणि खर्च यांचा मेळ लागत नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता २०१७-१८ या वर्षासाठी शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीत सरासरी दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गतवर्षी सोयाबीनसाठी २७०० रुपयांचा भाव होता, यंदा त्यामध्ये २७५ रुपयांची वाढ होऊन ३०५० रुपये करण्यात आला आहे. भुईमुगात २३० रुपयांची वाढ होऊन, तो ४२५० रुपयांवरुन ४४५० रुपये क्विंटल झाला. तूर आणि उदडाचा भाव चारशे रुपयांनी वाढला. तूर ५०५० रुपयांवरुन ५४५० रुपये, उडीद पाच हजारावरुन ५४०० रुपये, तसेच मुगाच्या हमीभावात ३५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मूग ५२२५ रुपयांवरुन ५५७५ रुपये क्विंटल झाला. कापसामध्ये अडीचशे रुपयांची वाढ झाली.

मध्यम स्टेपल कापूस ३७५० ऐवजी ४०२० रुपये, तर लांब स्टेपल कापूस ४०५० ऐवजी ४३२० रुपयांनी खरेदी करावा लागणार आहे. बाजरीत क्विंटलला ९५ रुपयांची वाढ झाल्याने ती १३३० रुपयांवरुन १४२५ रुपये झाली. ज्वारी १६५० रुपयांवरुन १७२५ रुपये, हायब्रीड १६२५ वरुन १७०० रुपये, मका १३६५ वरुन १४२५ रुपये, तर बाजरीला १३३० रुपयांवरून १४२५ रुपये क्विंटल हमीभाव झाला आहे.गव्हाच्या हमीभावात १७५ रुपयांची वाढ झाली. १४५० रुपयांवरून १६२५ रुपये झाला. तिळाच्याा हमीभावात तब्बल सातशे रुपयांची वाढ झाली. ४६०० रुपयाऐवजी ५३०० रुपये तसेच सूर्यफुलाच्या दरात साडेतीनशे रुपयांनी वाढ झाली असून, ३७५० ऐवजी ४१०० रुपये क्विंटल आधारभूत किंमत झाली आहे. केंद्र सरकारने शेतमालाचा हमीभाव निश्चित केला असून, तो खरीप हंगामापासून लागू झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाºयांना शेतमाल खरेदी करता येणार नाही.

शेतमाल कमी दराने खरेदी केल्यास बाजार समितीच्यावतीने महाराष्टÑ कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती शेजाळ आणि सचिव पी. एस. पाटील यांनी दिला आहे. बाजार समिती मुख्य आवार, दुय्यम आवार, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत येथील अडते, खरेदीदार, व्यापाºयांना परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.