शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल हमीभावात सरासरी दोनशेची वाढ--शेतकºयांना दिलासा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 22:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र शासनाने खरीप पिकांच्या शेतीमालाचा हमीभाव निश्चित केल्याने क्विंटलला सरासरी दोनशे रुपये हमीभाव वाढला आहे.

ठळक मुद्देआधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास बाजार समिती कारवाई करणारतो खरीप हंगामापासून लागू झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाºयांना शेतमाल खरेदी करता येणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क  सांगली : केंद्र शासनाने खरीप पिकांच्या शेतीमालाचा हमीभाव निश्चित केल्याने क्विंटलला सरासरी दोनशे रुपये हमीभाव वाढला आहे. सोयाबीन क्विंटलला २७५ रुपये, भुईमूग २३०, सूर्यफूल ३५०, तूर ४००, तर मुगाला ३५० रुपयांची वाढ झाली आहे. आता सोयाबीन ३०५० रुपये, भुईमूग ४४५०, तर ज्वारी १७२५ रुपये क्विंटलने खरेदी केली जाईल. शेतीमाल आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास व्यापाºयांवर कारवाई करण्याचा इशारा सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत शेजाळ यांनी बुधवारी दिला.

दरवर्षी खरीप हंगामापूर्वी केंद्र शासनाकडून पिकांच्या कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाते. मागील काही दिवसांपासून महागाईत वाढ होऊ लागली आहे. महागाई वाढत असताना, शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून केला जात आहे. प्रत्येकवर्षी किमान हमीभावात वाढ होते, मात्र उत्पादन आणि खर्च यांचा मेळ लागत नसल्याचे स्पष्ट झाले होते. आता २०१७-१८ या वर्षासाठी शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीत सरासरी दोनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गतवर्षी सोयाबीनसाठी २७०० रुपयांचा भाव होता, यंदा त्यामध्ये २७५ रुपयांची वाढ होऊन ३०५० रुपये करण्यात आला आहे. भुईमुगात २३० रुपयांची वाढ होऊन, तो ४२५० रुपयांवरुन ४४५० रुपये क्विंटल झाला. तूर आणि उदडाचा भाव चारशे रुपयांनी वाढला. तूर ५०५० रुपयांवरुन ५४५० रुपये, उडीद पाच हजारावरुन ५४०० रुपये, तसेच मुगाच्या हमीभावात ३५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे मूग ५२२५ रुपयांवरुन ५५७५ रुपये क्विंटल झाला. कापसामध्ये अडीचशे रुपयांची वाढ झाली.

मध्यम स्टेपल कापूस ३७५० ऐवजी ४०२० रुपये, तर लांब स्टेपल कापूस ४०५० ऐवजी ४३२० रुपयांनी खरेदी करावा लागणार आहे. बाजरीत क्विंटलला ९५ रुपयांची वाढ झाल्याने ती १३३० रुपयांवरुन १४२५ रुपये झाली. ज्वारी १६५० रुपयांवरुन १७२५ रुपये, हायब्रीड १६२५ वरुन १७०० रुपये, मका १३६५ वरुन १४२५ रुपये, तर बाजरीला १३३० रुपयांवरून १४२५ रुपये क्विंटल हमीभाव झाला आहे.गव्हाच्या हमीभावात १७५ रुपयांची वाढ झाली. १४५० रुपयांवरून १६२५ रुपये झाला. तिळाच्याा हमीभावात तब्बल सातशे रुपयांची वाढ झाली. ४६०० रुपयाऐवजी ५३०० रुपये तसेच सूर्यफुलाच्या दरात साडेतीनशे रुपयांनी वाढ झाली असून, ३७५० ऐवजी ४१०० रुपये क्विंटल आधारभूत किंमत झाली आहे. केंद्र सरकारने शेतमालाचा हमीभाव निश्चित केला असून, तो खरीप हंगामापासून लागू झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने व्यापाºयांना शेतमाल खरेदी करता येणार नाही.

शेतमाल कमी दराने खरेदी केल्यास बाजार समितीच्यावतीने महाराष्टÑ कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती शेजाळ आणि सचिव पी. एस. पाटील यांनी दिला आहे. बाजार समिती मुख्य आवार, दुय्यम आवार, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत येथील अडते, खरेदीदार, व्यापाºयांना परिपत्रकाव्दारे कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.