जिल्ह्यात दिवसाला सरासरी १३ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:31 IST2021-04-30T04:31:17+5:302021-04-30T04:31:17+5:30
गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट सुरू झाली आणि सप्टेंबर २०२० मध्ये ती टोकाला गेली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १७०५ ...

जिल्ह्यात दिवसाला सरासरी १३ मृत्यू
गेल्यावर्षी कोरोनाची पहिली लाट सुरू झाली आणि सप्टेंबर २०२० मध्ये ती टोकाला गेली. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १७०५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते २८ एप्रिल २०२१ पर्यंत ४३४ मृतांची नोंद झाली आहे. २०२१ मधील ही आकडेवारी पाहिल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा मृतांचा आकडा धडकी भरवणारा आहे. म्हणूनच पालकमंत्री सतेज पाटील यांनी मृत्युदर रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.
चौकट
महिनावार मृत्यू
जानेवारी २०२१ ११
फेब्रुवारी २२
मार्च २७
२८ एप्रिलपर्यंत ३७४
चौकट
विभागावर मृत्यू
कोल्हापूर महापालिका १०५
नगरपालिका क्षेत्र ३७
इतर जिल्हे ९५
ग्रामीण तालुके १९७
एकूण ४३४
चौकट
वेगळे डेथ ऑडिट करणे वेळखाऊ
यातील सर्व रुग्णांचा नेमका मृत्यू कशामुळे झाला याच्या नोंदी आरोग्य विभागाकडे आहेत. इली, सारी, अस्थमा, रक्तदाब, मधुमेह यातील काय कारणे आहेत याची ही नोंद आहे. आता तालुकास्तरीय समितीकडून डेथ ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, एकूण मृतांपैकी निम्मे मृ़त हे ग्रामीण भागातील आहे. यातील बहुतांशी जणांचा मृत्यू येथील सीपीआर रुग्णालयात झाला आहे. आता येथून ही सर्व कागदपत्रे तालुक्याला न्यावी लागणार आहेत आणि तेथे विश्लेषण केले जाणार आहे. कोरोनाचा कहर सध्या सुरू असताना हे काम वेळखाऊ ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.