शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पोलिसांवर हल्ले नगण्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:31 IST

गुन्हेगारांवर नेहमीच पोलिसांचा वचक राहिल्याने हल्ल्याच्या घटना तशा कमी आहेत.

तानाजी पोवार

कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा तसा सधन आहे. तसा शेतीसंपन्न जिल्हा असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण सर्वसामान्य आहे. येथे कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याने पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाणही अगदीच नगण्य आहे. जिल्ह्यात वर्षभरात पोलिसांवर हल्ल्याच्या जास्तीत जास्त आठ ते दहा घटना घडतात. गुन्हेगारांवर नेहमीच पोलिसांचा वचक राहिल्याने हल्ल्याच्या घटना तशा कमी आहेत.

पोलिसांची जरब असली तरी सरकारी नोकरदारांवर हल्ल्याच्या घटनेचे प्रमाण मात्र नजरेत भरणारे आहे. दरवर्षी सरासरी ७० घटना जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या झाल्या आहेत.

पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना जिल्ह्यात अगदीच नगण्य आहेत. येथे कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण चांगले आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही ठिकाणी अवैध व्यवसायाला विरोध करताना पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडतात.

तीन घटना...

अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षकावर हल्ला

एप्रिल २०२१ मध्ये महापालिकेमार्फत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. बिंदू चौक सबजेलजवळ रस्त्याकडेला मांडलेल्या वस्तू हटवताना विक्रेत्याने तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली. त्याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

गांजा विक्रेत्याचा पोलिसांवर हल्ला

मे २०२१ मध्ये संचारबंदीत शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे गांजा विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करताना तेथे कारवाईसाठी गेलेल्या चार पोलिसांवर गांजा विक्रेत्याने हत्यार उगारले. त्याने पोलिसांशी झटापट केली. त्यात एक पोलीसही जखमी झाल्याची शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद आहे.

वाद मिटवताना पोलिसांस धक्काबुक्की

गेल्या महिन्यात मध्यरात्री व्हिनस कॉर्नर येथे दोन गटातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. जमावातील एकाने आपण पोलीस असल्याची बतावणी करून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन हल्ला केला. त्याला शाहुपुरी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली.

सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले

वर्षे :       पोलीस    इतर सरकारी कर्मचारी

२०१८ :    ०९       ४६

२०१९:     ०७       ५९

२०२० :    १२       ७९

२०२१ (नोव्हेंबरपर्यंत): ०८ - ८०

वर्षभरात सात जण गजाआड

गेल्या अकरा महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या ८० घटना घडल्या. त्यापैकी पोलिसांवर हल्ल्याच्या फक्त ९ घटना घडल्या. त्यापैकी ७ जणांना अटक केली. त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत.

पोलीस हा कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. नागरी रक्षण हे त्याचे प्रथम कर्तव्य असते. अवैध गोष्टीला पोलिसांचा नेहमीच विरोध असतो. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची कधीही गय केली जाणार नाही, त्याला योग्य ते शासन होईलच.- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस