शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
3
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
4
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
5
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
6
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
7
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
8
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
9
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
10
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
11
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
12
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
13
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
14
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
15
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
16
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
17
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
18
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
19
"सर, ब्रेकअप झालंय" Gen Z कर्मचाऱ्यानं बॉसला पाठवला ईमेल; लगेच १० दिवसांची सुट्टी मंजूर, कारण..
20
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?

कोल्हापुरात पोलिसांवर हल्ले नगण्यच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 13:31 IST

गुन्हेगारांवर नेहमीच पोलिसांचा वचक राहिल्याने हल्ल्याच्या घटना तशा कमी आहेत.

तानाजी पोवार

कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा तसा सधन आहे. तसा शेतीसंपन्न जिल्हा असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण सर्वसामान्य आहे. येथे कायदा व सुव्यवस्था सुरळीत असल्याने पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाणही अगदीच नगण्य आहे. जिल्ह्यात वर्षभरात पोलिसांवर हल्ल्याच्या जास्तीत जास्त आठ ते दहा घटना घडतात. गुन्हेगारांवर नेहमीच पोलिसांचा वचक राहिल्याने हल्ल्याच्या घटना तशा कमी आहेत.

पोलिसांची जरब असली तरी सरकारी नोकरदारांवर हल्ल्याच्या घटनेचे प्रमाण मात्र नजरेत भरणारे आहे. दरवर्षी सरासरी ७० घटना जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या झाल्या आहेत.

पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना जिल्ह्यात अगदीच नगण्य आहेत. येथे कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण चांगले आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काही ठिकाणी अवैध व्यवसायाला विरोध करताना पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडतात.

तीन घटना...

अतिक्रमण काढताना पोलीस निरीक्षकावर हल्ला

एप्रिल २०२१ मध्ये महापालिकेमार्फत शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. बिंदू चौक सबजेलजवळ रस्त्याकडेला मांडलेल्या वस्तू हटवताना विक्रेत्याने तत्कालीन वाहतूक पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केली. त्याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

गांजा विक्रेत्याचा पोलिसांवर हल्ला

मे २०२१ मध्ये संचारबंदीत शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे गांजा विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करताना तेथे कारवाईसाठी गेलेल्या चार पोलिसांवर गांजा विक्रेत्याने हत्यार उगारले. त्याने पोलिसांशी झटापट केली. त्यात एक पोलीसही जखमी झाल्याची शिरोळ पोलीस ठाण्यात नोंद आहे.

वाद मिटवताना पोलिसांस धक्काबुक्की

गेल्या महिन्यात मध्यरात्री व्हिनस कॉर्नर येथे दोन गटातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. जमावातील एकाने आपण पोलीस असल्याची बतावणी करून लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन हल्ला केला. त्याला शाहुपुरी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली.

सरकारी कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले

वर्षे :       पोलीस    इतर सरकारी कर्मचारी

२०१८ :    ०९       ४६

२०१९:     ०७       ५९

२०२० :    १२       ७९

२०२१ (नोव्हेंबरपर्यंत): ०८ - ८०

वर्षभरात सात जण गजाआड

गेल्या अकरा महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ल्याच्या ८० घटना घडल्या. त्यापैकी पोलिसांवर हल्ल्याच्या फक्त ९ घटना घडल्या. त्यापैकी ७ जणांना अटक केली. त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत.

पोलीस हा कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. नागरी रक्षण हे त्याचे प्रथम कर्तव्य असते. अवैध गोष्टीला पोलिसांचा नेहमीच विरोध असतो. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची कधीही गय केली जाणार नाही, त्याला योग्य ते शासन होईलच.- शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस