शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

उचगावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:06 IST

उचगाव : उचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करा; अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र ...

उचगाव : उचगाव कमान ते आंबेडकर चौक या मुख्य रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करा; अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना बुधवारी निवेदनाद्वारे दिला.

निवेदनात म्हटले आहे की, उचगावात मुख्य रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या रस्त्यावरून शिरोली, गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित एमआयडीसीकडे जा-ये करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मार्केट यार्ड व हुपरी चांदी बाजारपेठेसाठी उचगावमधून मोठ्या प्रमाणात लोक जात असतात. विद्यार्थी-विद्यार्थिनीही या रस्त्यावरून जात असतात. मात्र, मुख्य रस्त्यावरच खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होत आहेत. ग्रामदैवत मंगेश्वर देवाची यात्राही दोन महिन्यांवर आली आहे. या काळात उचगावमध्ये मोठी गर्दी होते. त्यामुळे उचगावची स्वागत कमान ते आंबेडकर चौक रस्ता तत्काळ डांबरीकरण करण्यात यावा; अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. शिष्टमंडळात उपतालुकाप्रमुख दीपक पाटील, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, उपशाखाप्रमुख कैलास जाधव, शफिक देवळे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, भूषण चौगुले, नितीन गाणबोटे, आदींचा समावेश होता.

फोटो : ०३ उचगाव रस्ता

ओळ : उचगाव (ता. करवीर) येथील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करावे, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना देताना शिवसैनिक.