शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : भाजपचे अशोकराव माने, अनिल यादव जनसुराज्यमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 14:47 IST

भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाली असून, शिरोळमधून भाजपचे नेते अनिल यादव हे जनसुराज्यचे उमेदवार असतील.

ठळक मुद्देभाजपचे अशोकराव माने, अनिल यादव जनसुराज्यमध्येहातकणंगले, शिरोळमधून उमेदवारी, मानेंचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाली असून, शिरोळमधून भाजपचे नेते अनिल यादव हे जनसुराज्यचे उमेदवार असतील.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदले दिवशी वेगवान घडामोडी घडल्या असून, सकाळी माने यांच्या जनसुराज्यच्या उमेदवारीवर विनय कोरे यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर माने यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रतोद विजय भोजे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.दुसरीकडे शिरोळ तालुक्यातून ‘गोकुळ’चे संचालक आणि भाजपचे नेते अनिल यादव यांनीही जनसुराज्यची उमेदवारी स्वीकारली असून, हे दोघेही आज, शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हातकणंगले येथून १५ वर्षांपूर्वी राजीव आवळे जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते.

भाजप शिवसेना युती झाल्यानंतर जनसुराज्यकडे इच्छुकांची गर्दी झाली असून, यामध्ये भाजपच्या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. स्वत: विनय कोरे आणि समित कदम या सर्वांशी गेले दोन दिवस चर्चा करीत असून, जिल्ह्यातील १० पैकी पाच मतदारसंघांत ‘जनसुराज्य’चे उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.वरील दोन उमेदवारांव्यतिरिक्त ‘जनसुराज्य’चे संस्थापक विनय कोरे हे स्वत: पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. ‘कोल्हापूर उत्तर’मधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. त्याच पद्धतीने चंदगडमधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. २००४ साली याच मतदारसंघातून नरसिंगराव पाटील जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते; मात्र करवीर, कोल्हापूर दक्षिण, कागल, इचलकरंजी, भुदरगडमध्ये जनसुराज्यचा उमेदवार नसण्याची शक्यता आहे.युतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यताएकीकडे जिल्ह्यातील १0 पैकी ८ मतदारसंघांमध्ये शिवसेनेला जागा मिळाल्या असताना भाजपचेच नेते किमान चार ठिकाणी बंड करण्याच्या तयारीत आहेत. समरजितसिंह घाटगे, अशोकराव माने, अनिल यादव हे तीनही भाजपचे नेते शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात रिंगणात उतरणार असल्याने शिवसेना-भाजप युतीमध्ये बेबनाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे; त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात बंडाचा वणवा पेटला आहे. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर