शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : भाजपचे अशोकराव माने, अनिल यादव जनसुराज्यमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 14:47 IST

भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाली असून, शिरोळमधून भाजपचे नेते अनिल यादव हे जनसुराज्यचे उमेदवार असतील.

ठळक मुद्देभाजपचे अशोकराव माने, अनिल यादव जनसुराज्यमध्येहातकणंगले, शिरोळमधून उमेदवारी, मानेंचा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युती झाल्यानंतर अस्वस्थ झालेल्या भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत अचानक विनय कोरे यांच्या ‘जनसुराज्य’ पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. हातकणंगले मतदारसंघातून भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने यांची उमेदवारी निश्चित झाली असून, शिरोळमधून भाजपचे नेते अनिल यादव हे जनसुराज्यचे उमेदवार असतील.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदले दिवशी वेगवान घडामोडी घडल्या असून, सकाळी माने यांच्या जनसुराज्यच्या उमेदवारीवर विनय कोरे यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर माने यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रतोद विजय भोजे यांच्याकडे सुपूर्द केला आहे.दुसरीकडे शिरोळ तालुक्यातून ‘गोकुळ’चे संचालक आणि भाजपचे नेते अनिल यादव यांनीही जनसुराज्यची उमेदवारी स्वीकारली असून, हे दोघेही आज, शुक्रवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हातकणंगले येथून १५ वर्षांपूर्वी राजीव आवळे जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते.

भाजप शिवसेना युती झाल्यानंतर जनसुराज्यकडे इच्छुकांची गर्दी झाली असून, यामध्ये भाजपच्या नेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. स्वत: विनय कोरे आणि समित कदम या सर्वांशी गेले दोन दिवस चर्चा करीत असून, जिल्ह्यातील १० पैकी पाच मतदारसंघांत ‘जनसुराज्य’चे उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे.वरील दोन उमेदवारांव्यतिरिक्त ‘जनसुराज्य’चे संस्थापक विनय कोरे हे स्वत: पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. ‘कोल्हापूर उत्तर’मधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. त्याच पद्धतीने चंदगडमधूनही जनसुराज्यची उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू आहेत. २००४ साली याच मतदारसंघातून नरसिंगराव पाटील जनसुराज्यच्या तिकीटावर निवडून आले होते; मात्र करवीर, कोल्हापूर दक्षिण, कागल, इचलकरंजी, भुदरगडमध्ये जनसुराज्यचा उमेदवार नसण्याची शक्यता आहे.युतीमध्ये बेबनाव होण्याची शक्यताएकीकडे जिल्ह्यातील १0 पैकी ८ मतदारसंघांमध्ये शिवसेनेला जागा मिळाल्या असताना भाजपचेच नेते किमान चार ठिकाणी बंड करण्याच्या तयारीत आहेत. समरजितसिंह घाटगे, अशोकराव माने, अनिल यादव हे तीनही भाजपचे नेते शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात रिंगणात उतरणार असल्याने शिवसेना-भाजप युतीमध्ये बेबनाव असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे; त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच जिल्ह्यात बंडाचा वणवा पेटला आहे. 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर