शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहाकडे वरपित्यांची लागली रिघ

By विश्वास पाटील | Updated: March 22, 2025 13:42 IST

लुबाडणुकीचाही प्रकार आला समोर

विश्वास पाटीलकोल्हापूर : लग्नासाठी मुली मिळत नसल्याने राज्यभरातील शासनाच्या महिला आधारगृहांकडे लग्नासाठी मुलगी हवी म्हणून बायोडेटांची थप्पी लागत आहे. अनेक पालक या संस्थांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु, हल्ली संस्थांतील विवाहयोग्य मुलींचे प्रमाण कमी झाल्याने तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. यातून लग्नासाठी मुली मिळवण्यातील भीषण समाजवास्तव पुढे येत आहे.राज्यभरात शासन अनुदानित प्रत्येक जिल्ह्यात दोन तरी महिला आधारगृहे आहेत. त्यातून मुलींचे शिक्षणाने, विवाहाने पुनर्वसन करून दिले जाते. त्यामुळे तिथे अनाथ, निराधार मुली लग्नासाठी सहज उपलब्ध होतील, असा समज करून पालकांनी अशा संस्थांकडे मोर्चा वळवला आहे. या संस्थांतील मुलींच्या विवाहाची शासनाने एक पध्दती निश्चित करून दिली आहे. मुलाचे वय जास्तीत जास्त २८ असेल तरच त्याचा बायोडेटा स्वीकारला जातो. लग्नात मुलीच्या पसंतीला महत्व असते. त्यांच्या एचआयव्हीपासून सर्व आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. आर्थिक स्थितीची तपासणी केली जाते. शेतकरी, छोटे व्यावसायिक, कमी उत्पन्न गटातील सर्व जातीतील पालक अगोदर पै-पाहुण्यांतून, ओळखीतून मुली शोधतात आणि कुठेच मुलगी मिळाली नाही की मग संस्थेतील मुलगी हवी म्हणून येतात. परंतु, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.या संस्थांमध्ये अनाथ, निराधार मुली येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. लहान वयातच दत्तकप्रक्रिया होत असल्याने लग्नापर्यंत मुली राहात नाहीत. संस्थेतील मुली निराधार असल्याने त्या सहज लग्नाला तयार होतील, अशी समाजधारणा असते, त्याचा गैरफायदाही घेतला जात आहे. शासनाच्या शाहूवाडीतील महिला आश्रमातील मुलीचे लग्न करायचे आहे, अशी जाहिरात सोशल मीडियावर गेले काही दिवस व्हायरल झाली आहे.

त्यात एका सुंदर मुलीचा फोटो वापरला आहे. तो पाहून कोणतीही माहिती न घेताच पालकांनी, विवाहइच्छूक तरुणांनी पाच हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतची रक्कम ऑनलाइन पाठवली आहे. कित्येक लाखांची त्यातून लुबाडणूक झाली आहे. गंमत म्हणजे शासनाची शाहूवाडी तालुक्यात अशी कोणतीच संस्था नाही.

संस्थेतील मुलींचे विवाहाने पुनर्वसन होत आहे, ही चांगलीच बाब आहे. परंतु, राज्य पुरुषगृहातील मुलांचा विवाह हा विषय समाजाच्याच काय शासनाच्याही ध्यानीमनी अजून आलेला नाही. त्यांना शासनाने वाऱ्यावरच सोडले आहे. त्यांच्या पालकत्त्वाची भूमिका आपण घेतली पाहिजे. - डॉ. सुनीलकुमार लवटे 

आमच्या संस्थेतून वर्षातून एक किंवा दोन मुलींचीच लग्न होतात. परंतु, त्यासाठी रोज किमान दोन बायोडेटा येतात. आठ ते दहा पालक आमच्या मुलासाठी मुलगी आहे का म्हणून चौकशी करायला संस्थेत येत आहेत. आमच्या संस्थेतून आतापर्यंत ७४ मुलींची लग्ने झाली असून, त्या सुखी संसार करत आहेत. - पद्मा तिवले मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नWomenमहिला