शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

मुलांना एकच आधार, मुलगी चालेल निराधार; महिला आधारगृहाकडे वरपित्यांची लागली रिघ

By विश्वास पाटील | Updated: March 22, 2025 13:42 IST

लुबाडणुकीचाही प्रकार आला समोर

विश्वास पाटीलकोल्हापूर : लग्नासाठी मुली मिळत नसल्याने राज्यभरातील शासनाच्या महिला आधारगृहांकडे लग्नासाठी मुलगी हवी म्हणून बायोडेटांची थप्पी लागत आहे. अनेक पालक या संस्थांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु, हल्ली संस्थांतील विवाहयोग्य मुलींचे प्रमाण कमी झाल्याने तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. यातून लग्नासाठी मुली मिळवण्यातील भीषण समाजवास्तव पुढे येत आहे.राज्यभरात शासन अनुदानित प्रत्येक जिल्ह्यात दोन तरी महिला आधारगृहे आहेत. त्यातून मुलींचे शिक्षणाने, विवाहाने पुनर्वसन करून दिले जाते. त्यामुळे तिथे अनाथ, निराधार मुली लग्नासाठी सहज उपलब्ध होतील, असा समज करून पालकांनी अशा संस्थांकडे मोर्चा वळवला आहे. या संस्थांतील मुलींच्या विवाहाची शासनाने एक पध्दती निश्चित करून दिली आहे. मुलाचे वय जास्तीत जास्त २८ असेल तरच त्याचा बायोडेटा स्वीकारला जातो. लग्नात मुलीच्या पसंतीला महत्व असते. त्यांच्या एचआयव्हीपासून सर्व आरोग्य तपासण्या कराव्या लागतात. आर्थिक स्थितीची तपासणी केली जाते. शेतकरी, छोटे व्यावसायिक, कमी उत्पन्न गटातील सर्व जातीतील पालक अगोदर पै-पाहुण्यांतून, ओळखीतून मुली शोधतात आणि कुठेच मुलगी मिळाली नाही की मग संस्थेतील मुलगी हवी म्हणून येतात. परंतु, तोपर्यंत फार उशीर झालेला असतो.या संस्थांमध्ये अनाथ, निराधार मुली येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. लहान वयातच दत्तकप्रक्रिया होत असल्याने लग्नापर्यंत मुली राहात नाहीत. संस्थेतील मुली निराधार असल्याने त्या सहज लग्नाला तयार होतील, अशी समाजधारणा असते, त्याचा गैरफायदाही घेतला जात आहे. शासनाच्या शाहूवाडीतील महिला आश्रमातील मुलीचे लग्न करायचे आहे, अशी जाहिरात सोशल मीडियावर गेले काही दिवस व्हायरल झाली आहे.

त्यात एका सुंदर मुलीचा फोटो वापरला आहे. तो पाहून कोणतीही माहिती न घेताच पालकांनी, विवाहइच्छूक तरुणांनी पाच हजारांपासून ते दीड लाखांपर्यंतची रक्कम ऑनलाइन पाठवली आहे. कित्येक लाखांची त्यातून लुबाडणूक झाली आहे. गंमत म्हणजे शासनाची शाहूवाडी तालुक्यात अशी कोणतीच संस्था नाही.

संस्थेतील मुलींचे विवाहाने पुनर्वसन होत आहे, ही चांगलीच बाब आहे. परंतु, राज्य पुरुषगृहातील मुलांचा विवाह हा विषय समाजाच्याच काय शासनाच्याही ध्यानीमनी अजून आलेला नाही. त्यांना शासनाने वाऱ्यावरच सोडले आहे. त्यांच्या पालकत्त्वाची भूमिका आपण घेतली पाहिजे. - डॉ. सुनीलकुमार लवटे 

आमच्या संस्थेतून वर्षातून एक किंवा दोन मुलींचीच लग्न होतात. परंतु, त्यासाठी रोज किमान दोन बायोडेटा येतात. आठ ते दहा पालक आमच्या मुलासाठी मुलगी आहे का म्हणून चौकशी करायला संस्थेत येत आहेत. आमच्या संस्थेतून आतापर्यंत ७४ मुलींची लग्ने झाली असून, त्या सुखी संसार करत आहेत. - पद्मा तिवले मानद कार्यवाह, बालकल्याण संकुल, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नWomenमहिला