शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो, कोल्हापूरच्या आर्याने व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 12:02 IST

युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या आर्या नितीन चव्हाण आणि ऋतुजा जलित कांबळे या दोन लेकी रविवारी रात्री उशिरा सुखरूप घरी परतल्या.

कोल्हापूर : युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या आर्या नितीन चव्हाण आणि ऋतुजा जलित कांबळे या दोन लेकी रविवारी रात्री उशिरा सुखरूप त्यांच्या घरी परतल्या. त्यांच्या पालकांच्या जीवाला लागलेला घोर संपला. आर्या आणि ऋतुजा यांना भेटून त्यांची विचारपूस करण्यासाठी सोमवारी दिवसभर त्यांच्या घरी नातेवाईक, मित्रमंडळींची गर्दी झाली.शुक्रवारपेठ धनवडे गल्लीमधील आर्या आणि फुलेवाडीमधील ऋतुजा ही एमबीबीएसच्या शिक्षणासाठी तीन महिन्यांपूर्वी युक्रेनला गेल्या होत्या. गेल्या आठवड्यात गुरुवारपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू झाले. त्यामुळे आर्या, ऋतुजा यांच्या पालकांना त्या घरी कशा सुखरूप पोहोचणार याचा घोर लागला होता.

भारतीय दूतावासाच्या माध्यमातून युक्रेनमधून रुमानिया आणि तेथून मुंबईमध्ये शनिवारी त्या पोहोचल्या. मुंबईतून रविवारी रात्री उशिरा त्या कोल्हापूरमधील आपल्या घरी सुखरूप पोहोचल्या. कुटुंबातील इतर सदस्यांना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले.तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतोरशियाने १४ फेब्रुवारीपासून युद्ध करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळी आमच्या बुकोविनीयन विद्यापीठाने तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही आपल्या देशात जाऊ शकता असे सांगितले होते. भारतात येण्यासाठीच्या विमानाचे तिकीट दुप्पट झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. हे दर कमी असते, तर आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो. - आर्या चव्हाण

  • आम्ही युक्रेनमध्ये ज्या ठिकाणी राहत होतो. त्या ठिकाणी सुरक्षित होतो. बुकोविनीयन विद्यापीठातील शिक्षक, वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आम्हा भारतीय विद्यार्थ्यांना मोठी मदत केली. रुमानियाची बॉर्डर सोडण्यासाठी अधिष्ठाता आले होते.
  • युक्रेन, रुमानियातील लोकांनी खूप काळजी घेतली. केंद्र सरकारने पाठविलेल्या विमानातून आम्ही देशात आलो. रशियाने युद्धाचा इशारा दिल्यानंतर लगेचच अमेरिकेने त्यांचे विद्यार्थी नेले. त्याप्रमाणे आपल्या देशाने कार्यवाही केली असती, युद्ध सुरू होण्यापूर्वीच आम्ही सर्व विद्यार्थी तेथून बाहेर पडलो असतो. सुखरूप घरी पोहोचल्याचा आनंद वाटत असल्याचे आर्याने सांगितले
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया