शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

कोल्हापूरच्या कलावंतांकडून चित्रपटसृष्टीचे सारथ्य : राजदत्त -- गतवैभवासाठी नव्या पिढीने जोमाने कार्यरत व्हावे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:10 IST

कोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली भारतीय चित्रपटसृष्टी बाल्यावस्थेत होती. त्या काळात आनंदराव आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी चित्रपटसृष्टीला सामाजिक आणि विधायक दिशा देण्याचे काम केले

ठळक मुद्दे‘किफ्फ’मध्ये ‘माय मराठी’ विभागाच्या उद्घाटनप्रसंगी आवाहन

कोल्हापूर : शंभर वर्षांपूर्वी सुरू झालेली भारतीय चित्रपटसृष्टी बाल्यावस्थेत होती. त्या काळात आनंदराव आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी चित्रपटसृष्टीला सामाजिक आणि विधायक दिशा देण्याचे काम केले. त्यानंतर कित्येक वर्षे या क्षेत्राचे सारथ्य कोल्हापूरच्या कलावंतांनी केले. आता हे गतवैभव मिळविण्यासाठी नव्या पिढीने पुन्हा जोमाने कार्यरत व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी शुक्रवारी केले.

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत झालेल्या ‘माय मराठी’ विभागाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह बाळा जाधव उपस्थित होते.राजदत्त म्हणाले, मने उल्हासित करण्यासाठी कलेचा जन्म झाला.

मनोरंजनातून प्रबोधनाची वाट धरत या कलेने विस्तार केला. भारतीय चित्रपटाचे आद्यमहर्षी म्हणून बाबूराव पेंटरांचे नाव घ्यावे लागते. त्यांनी रसिकांना केवळ चित्र, शिल्प, चित्रपटच नाही दिले तर त्यातून संदेश देण्याचे काम केले. समाजातील घटना रसिकांपर्यंतच पोहोचविताना त्यांचे सामाजिक भान जागृत केले. पाचशे वर्षांपूर्वी साधू-संतांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले; पण चित्रपटसृष्टीला बाबूराव पेंटरांनी दिशा दिली.

दरम्यान, कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिवसभरात टॉकिंग विथ द विंड (श्रीलंका) , पर्सन शॉपर (युएसए), पॅन फ्लोवज २८ (रशिया), सर्वनाम - मराठी, द हाऊस आॅफ द ४१ स्ट्रीट (इराण), झाशांद फरांद (इराणी), किफ्फ शॉर्ट फिल्म, लव इज आॅल यु निड (डेन्मार्क), इंबरन्स आॅफ सरपेंट (कोलंबिया), कलियुग भारतीय, आॅन द पिसफुल पिक (व्हिएतनाम), द प्रोफेसी (व्हिएतनाम), मास्ट्रो (फे्रंच), वास्तुपुरुष हे चित्रपट प्रदर्शितझाले.कलामहर्षींच्या कार्याचे समग्र दालनकलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन करून कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची सुरुवात केली या घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त फेस्टिव्हलअंतर्गत मांडलेल्या छायाचित्र प्रदर्शनात पेंटर यांनी निर्माण केलेल्या ‘सैरंध्री’ चित्रपटापासूनचा प्रवास मांडला आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचे तंत्र, कलाकारांच्या वेशभूषा, नेपथ्य, प्रसंग यांची कृष्णधवल छायाचित्र पाहताना आपसूकच कुतूहल वाटते.१ं्नंि३३ं