शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रब्बीचे क्षेत्र १२३७ हेक्टरने घटले, परतीच्या पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:19 IST

कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.

ठळक मुद्दे रब्बीचे क्षेत्र १२३७ हेक्टरने घटले, परतीच्या पावसाचा परिणाम आडसाल ऊसलागण वाढली, खोडवा मात्र घटला

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.

अतिवृष्टी आणि महापुराने ऊसाचे मोठे नुकसान झाल्याने ते क्षेत्र रब्बीखाली येईल, असा अंदाज होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते वेळापत्रकच बदलून गेल्याचा परिणाम पेरणीवर दिसत आहे. आडसाल ऊसलागणीचे क्षेत्र वाढले असले तरी खोडवा क्षेत्रात घट झाली आहे.जिल्ह्यात आॅक्टोबरपासून रब्बीच्या पेरण्या होतात. हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यांत रब्बीच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या होतात. जिल्ह्याचे रब्बीचे पेरक्षेत्र ४० हजार हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार हेक्टर या दोन तालुक्यांतील आहे. उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात गहू, ज्वारी, हरभरा, मका, आदी पिके घेतली जातात.

रब्बीचा हंगाम मोठा असल्याने साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या केल्या जातात. मात्र यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यात महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढेल, असे वाटत असतानाच सप्टेंबर महिन्यात काहीशा थांबलेल्या पावसाने पुढे पाठच सोडली नाही.

आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले. पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्याने अगोदरच जमिनीतील ओल जास्त होती. त्यात परतीच्या पावसाच्या दणक्याने जमिनीला वाफसाच आला नाही. त्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला. नोव्हेंबर महिन्यापासून रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या; पण त्याही दबकतच होत्या.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ४८ टक्केच पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने रब्बीचे क्षेत्र कमी झाले आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, भुदरगड तालुक्यात ज्वारीच्या, तर हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल तालुक्यांत गहू पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे चित्र आहे.चारा पिकांत दुप्पट वाढयंदा महापुराने हातकणंगले, शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसला. उसाची पिके गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे चारा पिकांचे क्षेत्र वाढले. शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यांत सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र हे चाऱ्याखालील आहे.१४ हजार हेक्टरनी ऊसक्षेत्रात घटयंदा महापुराने ऊस गेल्याने त्या ठिकाणी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उसाच्या आडसाल लागणी झाल्या. मात्र महापुरात विद्युतपंपांना वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शेतीला पाणीच मिळाले नाही. त्यात परतीचा पाऊस राहिल्याने पूर्वहंगामी लागणी होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा परिणाम पुढील २०२०-२०२१ या हंगामावर होणार असून लागण व खोडवा असा ४९ हजार ३३८ हेक्टरच ऊस उभा आहे.रब्बी, ऊसलागणी घटण्याची कारणे

  • साखर कारखान्यांचा हंगाम लांबल्याने ऊसक्षेत्रातील पेरण्या थांबल्या.
  • नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळेना.
  • महापुरात बहुतांश ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने पूर्वहंगामी उसाच्या लागणी होऊ शकल्या नाहीत.

 

तुलनात्मक उसाचे क्षेत्र हेक्टरमध्येवर्ष               आडसाल          पूर्वहंगामी सुरू     खोडवा        एकूण        उभा ऊस२०१९           १२,५०६             २२,१२९            ३,९५०          २४,७०६       ६३,२९०२०२०           १७,८८०             २०,४८६             १,४४१          ९,५३१       ४९,३३८ 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर