शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रब्बीचे क्षेत्र १२३७ हेक्टरने घटले, परतीच्या पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:19 IST

कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.

ठळक मुद्दे रब्बीचे क्षेत्र १२३७ हेक्टरने घटले, परतीच्या पावसाचा परिणाम आडसाल ऊसलागण वाढली, खोडवा मात्र घटला

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.

अतिवृष्टी आणि महापुराने ऊसाचे मोठे नुकसान झाल्याने ते क्षेत्र रब्बीखाली येईल, असा अंदाज होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते वेळापत्रकच बदलून गेल्याचा परिणाम पेरणीवर दिसत आहे. आडसाल ऊसलागणीचे क्षेत्र वाढले असले तरी खोडवा क्षेत्रात घट झाली आहे.जिल्ह्यात आॅक्टोबरपासून रब्बीच्या पेरण्या होतात. हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यांत रब्बीच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या होतात. जिल्ह्याचे रब्बीचे पेरक्षेत्र ४० हजार हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार हेक्टर या दोन तालुक्यांतील आहे. उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात गहू, ज्वारी, हरभरा, मका, आदी पिके घेतली जातात.

रब्बीचा हंगाम मोठा असल्याने साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या केल्या जातात. मात्र यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यात महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढेल, असे वाटत असतानाच सप्टेंबर महिन्यात काहीशा थांबलेल्या पावसाने पुढे पाठच सोडली नाही.

आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले. पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्याने अगोदरच जमिनीतील ओल जास्त होती. त्यात परतीच्या पावसाच्या दणक्याने जमिनीला वाफसाच आला नाही. त्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला. नोव्हेंबर महिन्यापासून रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या; पण त्याही दबकतच होत्या.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ४८ टक्केच पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने रब्बीचे क्षेत्र कमी झाले आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, भुदरगड तालुक्यात ज्वारीच्या, तर हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल तालुक्यांत गहू पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे चित्र आहे.चारा पिकांत दुप्पट वाढयंदा महापुराने हातकणंगले, शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसला. उसाची पिके गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे चारा पिकांचे क्षेत्र वाढले. शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यांत सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र हे चाऱ्याखालील आहे.१४ हजार हेक्टरनी ऊसक्षेत्रात घटयंदा महापुराने ऊस गेल्याने त्या ठिकाणी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उसाच्या आडसाल लागणी झाल्या. मात्र महापुरात विद्युतपंपांना वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शेतीला पाणीच मिळाले नाही. त्यात परतीचा पाऊस राहिल्याने पूर्वहंगामी लागणी होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा परिणाम पुढील २०२०-२०२१ या हंगामावर होणार असून लागण व खोडवा असा ४९ हजार ३३८ हेक्टरच ऊस उभा आहे.रब्बी, ऊसलागणी घटण्याची कारणे

  • साखर कारखान्यांचा हंगाम लांबल्याने ऊसक्षेत्रातील पेरण्या थांबल्या.
  • नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळेना.
  • महापुरात बहुतांश ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने पूर्वहंगामी उसाच्या लागणी होऊ शकल्या नाहीत.

 

तुलनात्मक उसाचे क्षेत्र हेक्टरमध्येवर्ष               आडसाल          पूर्वहंगामी सुरू     खोडवा        एकूण        उभा ऊस२०१९           १२,५०६             २२,१२९            ३,९५०          २४,७०६       ६३,२९०२०२०           १७,८८०             २०,४८६             १,४४१          ९,५३१       ४९,३३८ 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर