शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीचे क्षेत्र १२३७ हेक्टरने घटले, परतीच्या पावसाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 11:19 IST

कोल्हापूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.

ठळक मुद्दे रब्बीचे क्षेत्र १२३७ हेक्टरने घटले, परतीच्या पावसाचा परिणाम आडसाल ऊसलागण वाढली, खोडवा मात्र घटला

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात घट झाली असून तब्बल जानेवारी महिना उजाडला तरी अद्याप ४८ टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. रब्बीचा हंगाम संपुष्टात असला असून गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.

अतिवृष्टी आणि महापुराने ऊसाचे मोठे नुकसान झाल्याने ते क्षेत्र रब्बीखाली येईल, असा अंदाज होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे पुरते वेळापत्रकच बदलून गेल्याचा परिणाम पेरणीवर दिसत आहे. आडसाल ऊसलागणीचे क्षेत्र वाढले असले तरी खोडवा क्षेत्रात घट झाली आहे.जिल्ह्यात आॅक्टोबरपासून रब्बीच्या पेरण्या होतात. हातकणंगले आणि गडहिंग्लज तालुक्यांत रब्बीच्या मोठ्या प्रमाणात पेरण्या होतात. जिल्ह्याचे रब्बीचे पेरक्षेत्र ४० हजार हेक्टर आहे. त्यापैकी १८ हजार हेक्टर या दोन तालुक्यांतील आहे. उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात गहू, ज्वारी, हरभरा, मका, आदी पिके घेतली जातात.

रब्बीचा हंगाम मोठा असल्याने साधारणत: डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या केल्या जातात. मात्र यंदा जुलै-आॅगस्ट महिन्यात महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त केले. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढेल, असे वाटत असतानाच सप्टेंबर महिन्यात काहीशा थांबलेल्या पावसाने पुढे पाठच सोडली नाही.

आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले. पावसाळ्यात विक्रमी पाऊस झाल्याने अगोदरच जमिनीतील ओल जास्त होती. त्यात परतीच्या पावसाच्या दणक्याने जमिनीला वाफसाच आला नाही. त्याचा परिणाम रब्बी पेरणीवर झाला. नोव्हेंबर महिन्यापासून रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या; पण त्याही दबकतच होत्या.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ४८ टक्केच पेरणी झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत १२३७ हेक्टरने रब्बीचे क्षेत्र कमी झाले आहे. गडहिंग्लज, हातकणंगले, भुदरगड तालुक्यात ज्वारीच्या, तर हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल तालुक्यांत गहू पिकाच्या क्षेत्रात मोठी घट झाल्याचे चित्र आहे.चारा पिकांत दुप्पट वाढयंदा महापुराने हातकणंगले, शिरोळ तालुक्याला मोठा फटका बसला. उसाची पिके गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यामुळे चारा पिकांचे क्षेत्र वाढले. शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुक्यांत सुमारे १५०० हेक्टर क्षेत्र हे चाऱ्याखालील आहे.१४ हजार हेक्टरनी ऊसक्षेत्रात घटयंदा महापुराने ऊस गेल्याने त्या ठिकाणी आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात उसाच्या आडसाल लागणी झाल्या. मात्र महापुरात विद्युतपंपांना वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शेतीला पाणीच मिळाले नाही. त्यात परतीचा पाऊस राहिल्याने पूर्वहंगामी लागणी होऊ शकलेल्या नाहीत. त्याचा परिणाम पुढील २०२०-२०२१ या हंगामावर होणार असून लागण व खोडवा असा ४९ हजार ३३८ हेक्टरच ऊस उभा आहे.रब्बी, ऊसलागणी घटण्याची कारणे

  • साखर कारखान्यांचा हंगाम लांबल्याने ऊसक्षेत्रातील पेरण्या थांबल्या.
  • नोव्हेंबरपर्यंत परतीचा पाऊस राहिल्याने जमिनीला वाफसा मिळेना.
  • महापुरात बहुतांश ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने पूर्वहंगामी उसाच्या लागणी होऊ शकल्या नाहीत.

 

तुलनात्मक उसाचे क्षेत्र हेक्टरमध्येवर्ष               आडसाल          पूर्वहंगामी सुरू     खोडवा        एकूण        उभा ऊस२०१९           १२,५०६             २२,१२९            ३,९५०          २४,७०६       ६३,२९०२०२०           १७,८८०             २०,४८६             १,४४१          ९,५३१       ४९,३३८ 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर