शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मनमानी बांधकाम परवानगींना चाप, जलसंपदाची पूररेषा महापालिकेला बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 16:42 IST

यापूर्वी शहराची पूररेषा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ठरावायची आणि बांधकाम परवानगी सुध्दा त्यांनीच द्यायची. त्यामुळे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांचे संगनमत होत असे. त्यातून नियमबाह्य बांधकामांना कायद्याच्या चाकोरीत बसवून परवानगी दिली जात होती. परंतु यापुढे मात्र तसे होणार नाही. जलसंपदा विभागाने निश्चित केलेल्या पूररेषेचा गांभीर्याने विचार करावाच लागणार असून पूररेषेतील बांधकामांवर देखील मर्यादा येणार आहेत.

ठळक मुद्देमनमानी बांधकाम परवानगींना चापजलसंपदाची पूररेषा महापालिकेला बंधनकारक

कोल्हापूर : यापूर्वी शहराची पूररेषा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीच ठरावायची आणि बांधकाम परवानगी सुध्दा त्यांनीच द्यायची. त्यामुळे अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांचे संगनमत होत असे. त्यातून नियमबाह्य बांधकामांना कायद्याच्या चाकोरीत बसवून परवानगी दिली जात होती. परंतु यापुढे मात्र तसे होणार नाही. जलसंपदा विभागाने निश्चित केलेल्या पूररेषेचा गांभीर्याने विचार करावाच लागणार असून पूररेषेतील बांधकामांवर देखील मर्यादा येणार आहेत.जलसंदा विभागाने शुक्रवारी निश्चित केलेली पूररेषा ही कोणाच्या फायद्याचा आणि कोणाच्या नुकसानीचा विषय नसून शहरातील अमर्याद आणि बेसुमार बांधकामांना प्रतिबंधीत करण्यासाठी उचललेले एक महत्वाचे पाऊल आहे. यापूर्वी २००५ साली पंचगंगा नदीला आलेल्या महापूरानंतर एक समिती नेमून महापालिकेने शहरातील पूूररेषा निश्चित केली होती.

राजकीय हस्तक्षेप आणि अधिकारी - बांधकाम व्यावसायिक यांचे लागेबांधे यामुळे ही पूररेषा नदीच्या पूराप्रमाणे मागे पुढे होत होती. कारण पूररेषा करणारेही महापालिकेचेच अधिकारी आणि बांधकाम परवानगी देणारेही तेच अधिकारी होते. थोडक्यात आपल्या सोयीनुसार ही पूररेषा आणि त्यातील बांधकामाचे नियम बदलले जात होते. परंतु यापुढे मात्र असले सोयीचे प्रकार चालणार नाहीत. जलसंपदा विभागाने पंचगंगा नदीची पूररेषा निश्चित करुन त्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर