शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोल्हापूर महापालिकेतील ५२६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास तत्त्वत: मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:24 IST

अटी शिथिल करण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना

कोल्हापूर : महापालिकेतील ५२६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यास मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत येणाऱ्या अडचणींपैकी प्रशासकीय खर्चाची ३५ टक्क्यांची अट तसेच वयोमर्यादेची अट शिथिल करण्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी नगरविकास सचिव के. एच गोविंदराज वित्त विभागाचे सचिव, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, अमृत योजनेचे संचालक मनोहर हिरे, संघटना प्रतिनिधी संजय भोसले, दिनकर आवळे, विजय वणकुद्रे, अजित तिवले उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका सेवेत रोजंदारी म्हणून काम करणाऱ्या ५२६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे संघटनेने केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालय पातळीवर बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली. क्षीरसागर मात्र अन्य एक बैठकीत व्यस्त राहिल्याने या बैठकीस अनुपस्थित होते.रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु या कर्मचाऱ्यांना कायम करण्यास ३५ टक्के प्रशासकीय खर्चाची, कर्मचाऱ्यांचे रोस्टर तसेच वयोमर्यादेची अट अडथळा ठरत होती. परंतु बरीच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याकरिता या अटी शिथील करण्याकरिता महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले.रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केल्यास महापालिकेच्या तिजोरीवर सहा कोटी ५० लाखांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने महिन्याला दोन कोटी जीएसटीचे अनुदान वाढवून द्यावे, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली. त्यावेळी वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात येईल, असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.केएमटीच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या ७० चालक व ८० वाहकांनाही सेवेत कायम करण्यावर चर्चा झाली. त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना कायम केल्यास महिन्याला २७ लाखांचा बोजा पडणार असून तो महापालिका प्रशासन उचलणार आहे.

बापट कॅम्पसाठी अमृतमधून ४५ कोटीअमृत योजना २ मधून बापट कॅम्प येथील ड्रेनेज लाईन व सांडपाणी प्रक्रिया करण्याकरिता १८५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात १४० कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे हे काम रेंगाळणार होते म्हणून राज्य नगरोत्थान योजनेतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे बैठकीत अमृत योजनेच्या संचालकांनी मान्य केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर