शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

कोल्हापूर महापालिकेतील ५२६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास तत्त्वत: मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 13:24 IST

अटी शिथिल करण्यासाठी प्रस्ताव देण्याची सूचना

कोल्हापूर : महापालिकेतील ५२६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यास मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत येणाऱ्या अडचणींपैकी प्रशासकीय खर्चाची ३५ टक्क्यांची अट तसेच वयोमर्यादेची अट शिथिल करण्यासंबंधीचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावा, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी नगरविकास सचिव के. एच गोविंदराज वित्त विभागाचे सचिव, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, अमृत योजनेचे संचालक मनोहर हिरे, संघटना प्रतिनिधी संजय भोसले, दिनकर आवळे, विजय वणकुद्रे, अजित तिवले उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका सेवेत रोजंदारी म्हणून काम करणाऱ्या ५२६ कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे संघटनेने केली होती. त्यानुसार मंगळवारी मंत्रालय पातळीवर बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही बैठक पार पडली. क्षीरसागर मात्र अन्य एक बैठकीत व्यस्त राहिल्याने या बैठकीस अनुपस्थित होते.रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्यास बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. परंतु या कर्मचाऱ्यांना कायम करण्यास ३५ टक्के प्रशासकीय खर्चाची, कर्मचाऱ्यांचे रोस्टर तसेच वयोमर्यादेची अट अडथळा ठरत होती. परंतु बरीच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याकरिता या अटी शिथील करण्याकरिता महापालिका प्रशासनाने सुधारित प्रस्ताव देण्यास सांगण्यात आले.रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम केल्यास महापालिकेच्या तिजोरीवर सहा कोटी ५० लाखांचा बोजा पडणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने महिन्याला दोन कोटी जीएसटीचे अनुदान वाढवून द्यावे, अशी विनंती महापालिकेतर्फे करण्यात आली. त्यावेळी वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे हा प्रस्ताव देण्यात येईल, असे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.केएमटीच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या ७० चालक व ८० वाहकांनाही सेवेत कायम करण्यावर चर्चा झाली. त्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली. या सर्व कर्मचाऱ्यांना कायम केल्यास महिन्याला २७ लाखांचा बोजा पडणार असून तो महापालिका प्रशासन उचलणार आहे.

बापट कॅम्पसाठी अमृतमधून ४५ कोटीअमृत योजना २ मधून बापट कॅम्प येथील ड्रेनेज लाईन व सांडपाणी प्रक्रिया करण्याकरिता १८५ कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात १४० कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे हे काम रेंगाळणार होते म्हणून राज्य नगरोत्थान योजनेतून ४५ कोटी रुपयांचा निधी देण्याचे बैठकीत अमृत योजनेच्या संचालकांनी मान्य केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर