शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वारणेसह १२ कारखान्यांना आरआरसी नोटीस लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:54 IST

थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर आरआरसींतर्गत, तर २३ कारखान्यांना उस नियंत्रण आदेशांतर्गत कारवाईच्या अधिकृत नोटिसा गुरुवारी लागू झाल्या. आरआरसीची कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगलीतील पाच कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची  शुक्रवारी पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर सुनावणी होत आहे. यात साखर जप्तीसह १५ टक्के व्याजासह एफआरपी देण्याबाबत पुढील कारवाईवर चर्चा होणार आहे.

ठळक मुद्देवारणेसह १२ कारखान्यांना आरआरसी नोटीस लागूकारखानदारांची शुक्रवारी पुणे आयुक्तालयात सुनावणी

कोल्हापूर: थकीत एफआरपीप्रश्नी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांवर आरआरसींतर्गत, तर २३ कारखान्यांना उस नियंत्रण आदेशांतर्गत कारवाईच्या अधिकृत नोटिसा गुरुवारी लागू झाल्या.

आरआरसीची कारवाई झालेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सात, तर सांगलीतील पाच कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची  शुक्रवारी पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासमोर सुनावणी होत आहे. यात साखर जप्तीसह १५ टक्के व्याजासह एफआरपी देण्याबाबत पुढील कारवाईवर चर्चा होणार आहे.चालू गळीत हंगामाची वाटचाल सांगतेकडे सुरू झाली तरी अजूनही तुटलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना मिळालेली नाहीत. एकरकमी एफआरपी देता येत नसल्याचे सांगत काही कारखान्यांनी ८0:२0 च्या फॉर्म्युल्याप्रमाणे पहिली उचल म्हणून प्रतिटन २३00 रुपयांपर्यंतची उचल देऊ केली आहे. त्याप्रमाणे त्यांनी नोव्हेबरअखेरपर्यंतची बिले दिली आहेत.

डिसेंबरपासूनची सर्व बिले थकीत ठेवली आहेत. उस नियंत्रण आदेश १९६६ नुसार उस तुटल्यानंतर १४ दिवसांच्या आत बिल जमा न केल्यास १५ टक्के व्याजासह एफआरपी देणे बंधनकारक आहे, असे न केल्यास त्यांच्यावर आरआरसीअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत साखर जप्तीची कारवाई होते.त्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. कारवाईच्या या फेऱ्यात कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांतील ३५ कारखाने अडकले आहेत. यातही एकही रुपया आतापर्यंत अदा न केलेल्या १२, तर २३00 प्रमाणे जमा केलेल्या २३ कारखान्यांचा समावेश आहे. १२ कारखान्यांवर साखर जप्तीची कारवाई आठ दिवसांत सुरू होत आहे, तर २३00 रुपये जमा केलेल्या कारखान्यांनी उर्वरित रक्कम व्याजासह तातडीने देण्याबाबतचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

आरआरसी लागू झालेले कारखानेकोल्हापूर : दत्त शिरोळ, जवाहर हुपरी, वारणा, पंचगंगा, इको केन, संताजी घोरपडे, गुरुदत्त शुगर्स.सांगली : केन अ‍ॅग्रो, विश्वास, निनाई दालमिया, वसंतदादा, महाकाली.१९६६ मधील कलम ३(३) अन्वये लागू झालेल्या नोटिसाकोल्हापूर : आजरा, नलवडे गडहिंग्लज, भोगावती, राजाराम, शाहू कागल, डी. वाय. पाटील, बिद्री, कुंभी-कासारी, मंडलिक हमीदवाडा, उदयसिंग गायकवाड, अथणी शुगर्स.सांगली : उदगिरी शुगर्स, सोनहिरा, सद्गुरूशुगर्स, सर्वोदय, राजारामबापू वाटेगाव व साखराळे, मोहनराव शिंदे, ओलम शुगर्स, रिलायबल शुगर्स, क्रांती अग्रणी, हुतात्मा. 

 

 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर