शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्हे मार्गी लावा, ‘वारणे’च्या तपासावर मार्गदर्शक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 19:44 IST

कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करून ते मार्गी लावा, अशा सूचना ‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी देत कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत झाडाझडती घेतली. बुधवारी दिवसभर त्यांनी तपासणी केली.

ठळक मुद्दे‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांच्या सूचनाविभागीय कार्यालयाची झाडाझडती : ‘वारणे’च्या तपासावर मार्गदर्शक सूचना

कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील नऊ प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करून ते मार्गी लावा, अशा सूचना ‘सीआयडी’चे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी देत कोल्हापूर परिक्षेत्राच्या कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेत झाडाझडती घेतली. बुधवारी दिवसभर त्यांनी तपासणी केली.दरम्यान, रामानंद हे वार्षिक तपासणीसाठी आले असतानाच वारणानगर चोरी प्रकरण पुन्हा गाजल्याने त्यांनी या चोरी प्रकरणाचा तपास कुठेपर्यंत आला आहे, त्यामध्ये प्रगती आहे का, याची चाचपणी करीत तपासासंबंधी मार्गदर्शक सूचना ‘सीआयडी’चे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांना केल्या.राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) पाच जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय कोल्हापुरातील शनिवार पेठ येथे आहे. या कार्यालयाच्या कामकाजाची वार्षिक तपासणी करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद बुधवारी कोल्हापुरात आले. त्यांनी सकाळी दहा वाजता कार्यालयास भेट देऊन पोलीस अधीक्षक डॉ. बारी यांच्यासह पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, लिपिक यांच्या मुलाखती घेतल्या.

वर्षभरात पाच जिल्ह्यांतून किती गुन्ह्यांचा तपास सुरू आहे, याची माहिती घेतली असता नऊ गुन्ह्यांचा तपास अपूर्ण असल्याचे दप्तरी दिसून आले. गुन्हे प्रलंबित का आहेत, त्यावर कोणत्या पद्धतीने तपास सुरू आहे, कोणाकडे तपास आहे, तपासामध्ये प्रगती आहे का, तपासातील त्रुटी, आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करीत प्रश्नांची सरबत्ती केली.

प्रलंबित नऊ गुन्हे तत्काळ मार्गी लावा, त्यांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करा, अशा सूचना रामानंद यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाच्या तपासातील प्रगती त्यांनी विचारून घेतली. त्यासाठी मार्गदर्शक सूचना केल्या.कार्यालयीन अडचणी दूर करण्याची विनंती‘सीआयडी’चे येथील कार्यालय पाच जिल्ह्यांचे आहे. ऐतिहासिक आणि मोडकळीस आलेल्या लाकडी इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर अडगळीच्या जागी हे कार्यालय आहे. येथे अधिकाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. आरोपींना स्वतंत्रपणे ठेवून त्यांच्याकडे चौकशी करण्यासाठी अद्ययावत कोठडी नाही.

अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. महिला कर्मचाऱ्यांसाठी चेंजिंग रूम नाही. अशा बिकट परिस्थितीत या ठिकाणी काम करावे लागते. येथून हे कार्यालय अन्य ठिकाणी हलवावे. त्यासाठी नवीन जागेची आणि इमारतीची तरतूद करावी, आदी कार्यालयीन अडचणी दूर करण्याची विनंती ‘सीआयडी’च्या अधिकारी प्रशासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक रामानंद यांच्याकडे केली.

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर