शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पूरक पोषण आहार भागवतोय अडीच लाख माता-बालकांची भूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:44 IST

आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा समृध्द असल्याने आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी चांगली होत असल्याने या जिल्ह्यात कुपोषणाने एकाही बाळाचा मृत्यू झालेला नाही. स्तनदा माता आणि गरोदर महिलांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो.

ठळक मुद्दे अंगणवाड्यातून लॉकडाऊन काळातही पूरक पोषण आहार सुरूचजिल्ह्यात शंभर टक्के धान्य वाटप

नसीम सनदी 

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’च्या काळात खाण्यापिण्याची आबाळ होत असतानाही अंगणवाड्यातून मिळणाऱ्या पूरक पोषण आहारातून जिल्ह्यातील अडीच लाख माता-बालकांची भूक भागविली जात आहे. लाभार्थ्यांना घरपोच धान्य-कडधान्य वाटप करून कुपोषण होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. हे मिळणारे धान्य, कडधान्य कमी उत्पन्न गटातील संपूर्ण कुटुंबांचे पोषण करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. कुपोषण होऊ नये याची दक्षता घेतल्यामुळे सहा महिने ते ३ वर्ष वयोगटापर्यंतची बालके, स्तनदा माता, गरोदर महिला यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे. आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर जिल्हा समृध्द असल्याने आणि शासनाच्या योजनेची अंमलबजावणी चांगली होत असल्याने या जिल्ह्यात कुपोषणाने एकाही बाळाचा मृत्यू झालेला नाही.

कुपोषणाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडीत नोंदणी केलेल्या ६ महिने ते ३ वर्षांच्या बालकांना, स्तनदा माता आणि गरोदर महिलांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. अंगणवाड्यांमध्येच शिजवलेले अन्न बालकांना दिले जात होते, पण मध्यंतरी आहारावरून तक्रारी आल्यानंतर तयार ऐवजी कच्चे धान्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार लाभार्थ्यांना वयोगटानुसार धान्य व कडधान्याचे वाटप सुरू झाले. लॉकडाऊनमुळे पूरक पोषण आहार वाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता. पण राज्याच्या महिला व बालविकास विभागाने तातडीने निर्णय घेऊन धान्य, कडधान्य घरपोच देण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यातील ४ हजार ३६९ अंगणवाड्यांतून २ लाख ४२ हजार ४७ लाभार्थ्यांना शंभर टक्के वाटपही झाले आहे.

मिळणारे धान्य व कडधान्यहरभरा डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, चवळी, तांदूळ, गहू, तिखट पूड, हळद, मीठ, गोडेतेल. 

  • जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या : ४ हजार ३६९
  • ६ महिने ते ३ वर्षापर्यंतची मुले : १ लाख २ हजार १२६
  • तीव्र कमी वजनाची मुले : १ हजार ९१७
  • गरोदर व स्तनदा माता : ३६ हजार ४१६
  • ३ वर्ष ते ६ वर्षाची मुले : १ लाख १ हजार ५८८

सामाजिक वॉच..कोल्हापूर हे चळवळीचे शहर आहे. त्यामुळे रेशनधान्यापासून ते पोषण आहारापर्यंतचे धान्य लोकांना नीट मिळते की नाही याकडे जनतेचे लक्ष असते. धान्य कमी मिळाले किंवा कमी प्रतीचे मिळाले तर लोक अधिकाऱ्यांना जाऊन जाब विचारतात. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे पुरेसे पालन करूनच या आहाराचे वाटप झाले आहे.आहाराबरोबरच शिक्षणहीजिल्ह्यातील अंगणवाड्यांची गुणवत्ता राष्ट्रीय पातळीवर गौरवली गेली आहे. आकार या शिक्षण प्रणालीमुळे अंगणवाड्यांमध्ये येणाºया बालकांचा बौध्दिक विकासही झपाट्याने होत आहे. लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असतानाही घरपोच धान्य-कडधान्य देऊन माता बालकांच्या आहाराची काळजी घेतानाच त्यांचे शिक्षण व प्रबोधन होईल याकडे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचा विशेष कटाक्ष आहे. व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना रोजच्या रोज अंगणवाडी सेविकांकडून आरोग्याचे व अभ्यासाचे धडे दिले जात आहेत.

 

मार्च व एप्रिल या दोन महिन्यांतील पूरक पोषण आहाराचे धान्य एकदमच मिळाले आहे. याची गुणवत्ताही चांगली असल्यामुळे माझ्यासह कुटुंबीयदेखील आवडीने खातात. कडधान्ये मोफत मिळत असल्याने त्यावरील आमचा खर्च कमी झाला आहे.शिवानी भुरावणे,स्तनदा माता

 

अंगणवाड्यांमध्ये धान्य आल्यावर सेविका व मदतनीस स्वत:हून मोबाईलवर संपर्क साधून ते घेऊन जाण्यास सांगतात. बालकांच्या वयोगटानुसार त्याचे पाकीट देतात. दोन महिन्यांतून एकदा ऐवजी दर महिन्याला ते मिळाले तर त्याचा दर्जाही चांगला राहील.नजमा नाईक,३ वर्ष वयोगट बालकांचे पालक

 

बालके व मातांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिल्हा परिषद कायमच आग्रही राहिली आहे. जिल्हा कुपोषणमुक्त राहण्यासाठी ७ हजार ४१६ अंगणवाडी कर्मचारी यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. घरोघरी जाऊन सर्वेक्षणही करीत आहेत. धान्याच्या स्वरूपात मिळणारा आहार वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी यंत्रणेचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे, त्यामुळे तक्रारीस वाव राहिलेला नाही. तरीदेखील तक्रार आल्यास त्याची तातडीने दखल घेतली जात आहे.सोमनाथ रसाळउपमुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, कोल्हापूर 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना