शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पोलीस प्रशासनाकडून चिंता : अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 10:30 AM

ही चिंतेची बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शालेय स्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, महिला दक्षता विभाग, बालकल्याण समिती यांच्यावतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देशालेय स्तरावर होणार प्रबोधन

एकनाथ पाटीलकोल्हापूर : टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे १६ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुली घर सोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात १०० पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींनी घर सोडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, चंदगड, करवीर, इचलकरंजी, हातकणंगले, गडहिंग्लज, आदी तालुक्यांत मुलींचे घर सोडून निघून जाण्याचे प्रमाण घाबरवून टाकणारे आहे.

ही चिंतेची बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शालेय स्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन करण्यासाठी महापालिका, जिल्हा परिषद, महिला दक्षता विभाग, बालकल्याण समिती यांच्यावतीने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी अल्पवयीन मुली पळून जाण्याची चिंता व्यक्त करीत शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुला-मुलींना प्रबोधनाचे धडे दिले जाणार आहेत.

शाहूवाडी, गगनबावडा, चंदगड हा परिसर दुर्गम आहे. येथील बहुतांशी लोक नोकरीनिमित्त मुंबईला आहेत. त्यांचे कुटुंब मात्र गावातच आहे. आई कामासाठी बाहेर पडल्यानंतर अंकुश ठेवणारी जबाबदार व्यक्तीच घरी नसल्याने अल्पवयीन मुली निरनिराळ्या आमिषांना बळी पडत आहेत. आधी मैत्री, मग गप्पाटप्पा आणि मग भेटवस्तू. घरामध्ये न मिळणाऱ्या वस्तू प्रियकराकडून मिळू लागल्याने त्या भारावून जातात. मोबाईल अनेक मुलींना पुरविला जात आहे. हा प्रवास मैत्रीकडून तकलादू आणि दिखाऊ प्रेमसंबंधांपर्यंत जातो. त्यामुळे घरच्या बंधनातून बाहेर पडून स्वत:च्या स्वप्नातील संसार उभा करण्याचे स्वप्न या मुलींना पडते.

पंधरा-सोळा वर्षे हाताखांद्यावर खेळवले, वाढविले त्या आई-वडिलांपेक्षा त्यांना समोरचा प्रियकर महत्त्वाचा वाटू लागतो. आणि त्यातूनच त्या पळून जातात. काम आणि कमाईच्या चक्रात अडकलेले आई-वडील मुलींनी दिलेल्या या अनपेक्षित धक्क्याने कोलमडून जात असल्याचे चित्र आहे. आई-वडील पोलिसांत दाद मागतात. परंतु अब्रूचे खोबरे होणे आणि मन:स्ताप पदरी पडणे ते रोखू शकत नाहीत. अल्पवयीन मुलगी असल्याने पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. शोध घेतल्यानंतर मात्र मुलगीच स्वत:हून पळून गेल्याचे सांगते. हा पळून जाण्याचा ट्रेंड कोठेतरी थांबला पाहिजे. त्यासाठी शालेय स्तरावर मुला-मुलींच्यात प्रबोधन करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.कुटुंबाला मनस्ताप

पळून गेलेल्या मुलींच्या आयुष्यासह कुटुंबाचेही आयुष्य बरबाद होत असल्याची विदारक वस्तुस्थिती आहे. मुलगीचे अपहरण झाल्याची नोंद पोलीसदप्तरी झाल्यानंतर मुलगी अल्पवयीन असल्याने तिने घरातून पळून जाऊन केलेला विवाह बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे मुलीची रवानगी सुधारगृहात आणि मुलावर कायदेशीर कारवाई होते. यात दोन्हीकडच्या कुटुंबांना प्रचंड मन:स्ताप भोगावा लागतो. विशेष म्हणजे केवळ मुली हरवल्या एवढ्यावरच ही समस्या संपणारी नाही.

 

अल्पवयीन मुली लग्नाच्या आमिषाने पळून जाण्याचे प्रमाण वाढते आहे. या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन शालेय स्तरावर मुला-मुलींमध्ये प्रबोधन व समुपदेशन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनस्तरावर घेतला जात आहे.डॉ. अभिनव देशमुख : पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKidnappingअपहरण