शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

शेतकरीविरोधी, फसवे सरकार उलथवा - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 05:03 IST

समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते मात्र, अद्याप त्यांचे हत्यारे का सापडत नाहीत? पोलीस अधिकारी, नगरसेवकालाही मारले जाते.

मुरगूड (जि. कोल्हापूर)  -  समतेचा संदेश देणाऱ्या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांची हत्या होते. नरेंद्र दाभोलकरांनाही मारले जाते मात्र, अद्याप त्यांचे हत्यारे का सापडत नाहीत? पोलीस अधिकारी, नगरसेवकालाही मारले जाते. संपूर्ण महाराष्ट्रात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे असा हल्लाबोल करीत समाजा-समाजामध्ये जाती-जातीमध्ये भांडणे लावून आपला फायदा करून घेणाºया फसव्या, शेतकरी विरोधी भाजप सरकारला उलथवून टाका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.मुरगूड (ता. कागल) येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, देशात व राज्यात ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या या भाजपने काय केले, याचे उत्तर द्यावे. कोणताही प्रश्न उपस्थित केला तर समिती नेमतो, अभ्यास करतो हे मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांचे उत्तर ठरलेले आहे.अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतºयाची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप त्यांनी केला.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे म्हणाले, एक एप्रिल हा नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर आल्या. कारण सत्तेत आल्यापासून मोदींनी जनतेला फसवून कायम एप्रिल फूलच केले आहे. सामान्य जनतेला नव्हे तर ‘अच्छे दिना’चा मंत्र जपणाºया मंत्र्यांनाच ‘अच्छे दिन’ आले आहेत.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, आगामी निवडणुकीत केंद्रात एकटा भाजप किंवा काँग्रेस सत्तेत येऊ शकत नाही. त्यामुळे देशाच्या राजकारणात राष्टÑवादी काँगे्रसची महत्वाची भूमिका असणार आहे. यासाठी शरद पवारांना ताकद देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.हे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकारआम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे व पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या.विधानसभा प्राणिसंग्रहालय आहे का?विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा होण्यापेक्षा उंदीर, मांजर, वाघ आणि सिंहाची चर्चा होते. ही विधानसभा म्हणजे प्राणिसंग्रहालय आहे का, अशी विचारणा करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतही राज्य सरकारला लक्ष्य केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस