शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : शेतकरी संघटनेला महिन्याभरात दुसरा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:11 IST

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात प्रवेशाची औपचारीकता पूर्ण करण्यात आली.

ठळक मुद्देकाटे यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेला महिन्याभरात दुसरा धक्काभाजपशी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी जवळीकच कारणीभूत

कोल्हापूर: स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात प्रवेशाची औपचारीकता पूर्ण करण्यात आली.

काटे यांच्या जाण्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिनाभराच्या अंतरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशाचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असलेतरी त्यांची भाजपशी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी असलेली जवळीकच त्याला कारणीभूत ठरली आहे.काटे हे शेतकरी चळवळीत गेल्या ३0 वर्षापासून कार्यरत आहेत. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कोल्हापुरात काम करत होते. राजू शेट्टी यांनी जोशी यांच्याशी फारकत घेऊन २00२ मध्ये कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. तेव्हापासून काटे हे शेट्टी यांच्यासोबतच होते. २00२ ते २0१९ अशी गेली १७ वर्षे ते स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनच संघटनेची धुरा सांभाळली.

ऊस आणि दूध आंदोलनासह जिल्हा परिषदेतील सत्तेसह आमदारकी आणि खासदारकी, मंत्रीपदे या संघटनेच्या चढत्या आलेखाचे ते एकमेव साक्षीदार होते. राजू शेट्टी यांचे अत्यंत विश्वासू असलेले काटे हेच संघटनेचे सर्वेसर्वा होते.

पण २0१४ मध्ये महायुतीमध्ये गेल्यापासून काटे यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यातूनच त्यांना कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्विकृत संचालकपदही मिळाले होते. तुपकर व सदाभाऊ यांच्या मंत्रीपदाचे काटे हे देखील भागीदार होते. या दोघांनीही संघटना सोडली आहे. या दोघांशी काटे यांचे असलेली जवळीकच त्यांना संघटनेपासून लांब घेऊन गेली आहे.काटे यांचा गनिमा कावागनिमी कावा हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याचे प्रमुख शस्त्र राहिले आहे. याच शस्त्राचा आधार स्वत: काटे यांनीच घेतल्याचे दिसत आहे. तुपकर यांनी संघटना सोडण्यापुर्वी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती, पण काटे यांनी कोणाशी साधी चर्चाही न करता सर्वानाच अंधारात ठेवून अचानकपणे भाजपच्या व्यासपीठावर एन्ट्री घेतली. याचा संघटनेतील सर्वच कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

काटे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने संघटना सोडणे हे धक्कादायक आणि क्लेषदायक आहे. चळवळ अडचणीत असताना पाय रोवून उभे राहण्याऐवजी संघटना आणि शेतकरी चळवळीलाही वाऱ्यावर सोडले आहे.प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष 

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBJPभाजपाkolhapurकोल्हापूर