शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

Maharashtra Vidhan Sabha 2019 : शेतकरी संघटनेला महिन्याभरात दुसरा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 16:11 IST

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात प्रवेशाची औपचारीकता पूर्ण करण्यात आली.

ठळक मुद्देकाटे यांच्या जाण्याने शेतकरी संघटनेला महिन्याभरात दुसरा धक्काभाजपशी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी जवळीकच कारणीभूत

कोल्हापूर: स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात प्रवेशाची औपचारीकता पूर्ण करण्यात आली.

काटे यांच्या जाण्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिनाभराच्या अंतरात दुसरा मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशाचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असलेतरी त्यांची भाजपशी आणि सदाभाऊ खोत यांच्याशी असलेली जवळीकच त्याला कारणीभूत ठरली आहे.काटे हे शेतकरी चळवळीत गेल्या ३0 वर्षापासून कार्यरत आहेत. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते कोल्हापुरात काम करत होते. राजू शेट्टी यांनी जोशी यांच्याशी फारकत घेऊन २00२ मध्ये कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. तेव्हापासून काटे हे शेट्टी यांच्यासोबतच होते. २00२ ते २0१९ अशी गेली १७ वर्षे ते स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनच संघटनेची धुरा सांभाळली.

ऊस आणि दूध आंदोलनासह जिल्हा परिषदेतील सत्तेसह आमदारकी आणि खासदारकी, मंत्रीपदे या संघटनेच्या चढत्या आलेखाचे ते एकमेव साक्षीदार होते. राजू शेट्टी यांचे अत्यंत विश्वासू असलेले काटे हेच संघटनेचे सर्वेसर्वा होते.

पण २0१४ मध्ये महायुतीमध्ये गेल्यापासून काटे यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यातूनच त्यांना कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत स्विकृत संचालकपदही मिळाले होते. तुपकर व सदाभाऊ यांच्या मंत्रीपदाचे काटे हे देखील भागीदार होते. या दोघांनीही संघटना सोडली आहे. या दोघांशी काटे यांचे असलेली जवळीकच त्यांना संघटनेपासून लांब घेऊन गेली आहे.काटे यांचा गनिमा कावागनिमी कावा हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याचे प्रमुख शस्त्र राहिले आहे. याच शस्त्राचा आधार स्वत: काटे यांनीच घेतल्याचे दिसत आहे. तुपकर यांनी संघटना सोडण्यापुर्वी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली होती, पण काटे यांनी कोणाशी साधी चर्चाही न करता सर्वानाच अंधारात ठेवून अचानकपणे भाजपच्या व्यासपीठावर एन्ट्री घेतली. याचा संघटनेतील सर्वच कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.

काटे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने संघटना सोडणे हे धक्कादायक आणि क्लेषदायक आहे. चळवळ अडचणीत असताना पाय रोवून उभे राहण्याऐवजी संघटना आणि शेतकरी चळवळीलाही वाऱ्यावर सोडले आहे.प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष 

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBJPभाजपाkolhapurकोल्हापूर