शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Maratha Reservation: मराठा आंदोलन उग्र होण्यासाठीच नोकरभरती जाहीर - वामन मेश्राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 04:52 IST

ओबीसींच्या मतांचे धु्रवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ हजार पदांची नोकरभरती जाहीर केली आहे, असा आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी केला.

कोल्हापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुकीपूर्वीच मराठा समाजाचे आंदोलन उग्र व्हावे; त्यातून ओबीसी व मराठा समाज यांच्यात वाद निर्माण व्हावेत, त्यातून ओबीसींच्या मतांचे धु्रवीकरण होऊन त्याचा फायदा भाजपला व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७२ हजार पदांची नोकरभरती जाहीर केली आहे, असा आरोप ‘बामसेफ’चे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी रविवारी केला.कोल्हापूर येथे ‘बामसेफ’च्या ३२ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात मेश्राम म्हणाले, संसदेत अविश्वास ठरावावेळी शिवसेनेने भाजपाला मतदान केले नाही; त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत सेना आपल्याबरोबर असणार नाही. त्यामुळे मतांचे विभाजन होणार आहे. त्यात मराठा समाजाची मतेही मिळणार नाहीत. मग ओबीसींची तरी मते मिळतील. याकरिता निवडणुकीपूर्वीच ७२ हजार पदांची भरती करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यातून मराठा समाजाचेही आंदोलनही उग्र होईल. परिणामी ओबीसी व मराठा समाजामध्ये वाद निर्माण होतील. ओबीसींचे धुव्रीकरण होऊन ते भाजपाच्या बाजूने उभे राहतील. खरे पाहता मराठा समाजालाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षामुळे ७ आॅगस्ट १९३२ रोजी इंग्रज सरकारने शेड्युल्ड कास्टस आणि शेड्युल्ड ट्राईबना मान्यता दिली. त्यानंतर १६ नोव्हेंबर १९९२ ला ओबीसींना आरक्षण मंजूर झाले. ओबीसींच्या हक्कासाठी डॉ. बाबासाहेबांनी संसदेत आवाज उठविला होता, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण