शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

घोषणा झाली, पण... भिरभरं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:19 PM

बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत

-उदय कुलकर्णी --बुधवारचा दिवस. मुख्यमंत्र्यांची भरगच्च पत्रकार परिषद. मुख्यमंत्र्यांनी ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियानां’तर्गत तब्बल ४००० कोटी रुपयांवर खर्च करून ६०,४१,००० शौैचालये बांधण्यात आली आहेत आणि त्यामुळे महाराष्ट हागणदारीमुक्त झाला आहे, अशी घोषणा केली. घोषणा ऐकून अवघा महाराष्ट थक्क झाला.खरं तर शौचालये बांधण्यासाठी अनुदान ही काही नवी योजना नव्हे. ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत तशी अनुदाने ग्रामीण भागात शौचालये बांधणाऱ्यांना पूर्वीही दिली जात होती. अशा काही कामांची पाहणी करण्यासाठी मी सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत फिरत होतो. अनेक खेड्यांत घरांजवळ नवी बांधकामे दिसली. कुतूहलानं चौकशी केली. ती शासकीय अनुदानातून उभारलेली शौचालये असल्याचं कळलं. काही ठिकाणी त्या शौचालयांमध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या, तर काही ठिकाणी उत्पन्नाचं साधन म्हणून पी.सी.ओ. सुरू केलेला होता. विचारलं, ‘शेळ्या इथं, पी.सी.ओ. इथं, मग शौचाला कुठं जाता?’ - तर उत्तर मिळालं ‘ते काय पूर्वीपासून जसं चालू आहे तसं चालू आहे’. आता हागणदारीमुक्तीच्या नावावर नव्याने हजारो कोटी रुपये शौचालयावर खर्च झाले आहेत. दुसºया टप्प्यात म्हणे शौचालयांचा वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. - प्रश्न आहे की, शौचालयांची उभारणी व जनजागृती या दोन्ही गोष्टी एकावेळी करता आल्या नसत्या का? - दुसरी बाब,अजूनही गावागावांत, शहराशहरांत अपंग व्यक्ती आणि महिलांसाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे उपलब्ध नाहीत, त्याबाबतची जाग कधी येणार आहे?विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील गोष्ट. सीताराम पुरुषोत्तम तथा आप्पासाहेब पटवर्धन हे मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजचे स्कॉलर. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पटवर्धनांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गांधींबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली; पण गांधींनी त्यांना आधी खेडेगावांत जाऊन मानवी विष्ठा आणि कचरा गोळा करीत ग्रामस्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्याविषयी सुचवलं. उच्चशिक्षित पटवर्धनांनी कणकवली गाठलं. रोज कावडीतून गावातला मैला गोळा करायला सुरुवात केली. लोकांनी सुरुवातीला वेड्यात काढलं; पण एकत्र केलेल्या मैल्यातून त्यांनी सोनखत बनवलं आणि शेती फुलवून दाखवली. मानवी विष्ठा वाहून नेणाºयांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी चराचे संडास, गोपुरी संडास असे अनेक प्रकारचे संडास बनवले. कणकवलीत गोपुरी आश्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संडासचे म्युझियमही उभारले. ग्रामस्वच्छता, हागणदारीमुक्त आणि मानवी विष्ठेची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळावी म्हणून आपण काय केले याची पटवर्धन यांनी पत्रकार बैठक घेऊन जाहिरात केल्याचे मात्र आठवत नाही. सध्या मात्र किती हजार कोटी खर्च याच्या जाहिरातीचा जमाना आहे. ग्रामस्वच्छता करायची म्हणजे इस्त्रीचे कपडे घालून नवा कोरा लांब दांड्याचा झाडू घेऊन तोंडाला मास्क घालून, कपड्यावर अ‍ॅप्रन बांधून व हातात ग्लोव्हज घालून छायाचित्रे काढायची म्हणजे निवडणुकीत त्याचा उपयोग करता येतो. ‘कोकण’ गांधींचा आदर्श कोण घेणार? त्यांचा आदर्श घेऊन निवडणुका थोड्याच जिंकता येणार आहेत?मुख्यमंत्र्यांनी हागणदारीमुक्तीची घोषणा केली हे खरे; पण याच महाराष्टÑात शहराशहरांमध्ये कचºयाचा प्रश्न गंभीर होत चाललाय त्याचं काय? ना कचºयाच्या उठावाची योग्य व्यवस्था आहे, ना कचºयाच्या योग्य विल्हेवाटीची ! कोल्हापूर, पुणे, औरंगाबाद अशा सगळ्याच शहरांच्या परिसरात कचºयांचे डोंगर आणि त्यानं पसरणारं अनारोग्य पाहायला मिळायला लागलंय. अधूनमधून हे कचºयाचे ढीग पेटवून दिले जातात आणि प्रदूषणात भर घातली जाते. मध्यमवर्गीय नागरिक शहर स्वच्छतेबाबत अतिजागरूक म्हणून ते ‘गार्बेज वॉक’ काढून आपला संताप व्यक्त करतात. बलात्कार झाला की मेणबत्त्या घेऊन फेरी काढायची. विचारवंताची हत्या झाली की, ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ काढायचा आणि कचरा फार झाला असं वाटलं तर ‘गार्बेज वॉक’ काढायचा. या पलीकडं जाऊन नागरिकांमध्ये कृतिशिलता यावी यासाठी आपण काय करणार आहोत? मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपणास माहिती आहे का? २०१७ या वर्षात दर दिवशी सर्वाधिक कचरा निर्माण करणाºया राज्यांमध्ये देशात महाराष्टÑाचा पहिला क्रमांक होता. देशामध्ये दररोज दीड लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. या कचºयापासून देशाला आणि महाराष्टÑाला मुक्ती कशी मिळेल?( -  लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत   kollokmatpratisad@gmail.com)