शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी अंबाबाईला तिरूपतीचा शालू नेसवणे बंद होणार,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 5:45 AM

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी श्री अंबाबाई म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी आहे, असे सांगत तिरुपती देवस्थान पाठवित असलेला शालू दस-यादिवशी अंबाबाईला नेसविण्याची पद्धत यंदापासून अखेर बंद करण्यात आली आहे.

कोल्हापूर : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली करवीरनिवासी श्री अंबाबाई म्हणजे तिरुपती बालाजीची पत्नी आहे, असे सांगत तिरुपती देवस्थान पाठवित असलेला शालू दस-यादिवशी अंबाबाईला नेसविण्याची पद्धत यंदापासून अखेर बंद करण्यात आली आहे. तिरुपती देवस्थानकडून २० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या पद्धतीची पोलखोल झाल्यानंतर लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.दस-यादिवशी तिरुपतीहून येणारा शालू नव्हे तर समितीतर्फे देण्यात येणारे महावस्त्रच अंबाबाईला नेसविण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मंगळवारी दिली. तिरूपती देवस्थानच्या वतीने शालू आलाच तर त्याची कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही किंवा डामडौल होणार नाही.>निर्णय का ?तिरुपती देवस्थानकडून अंबाबाई म्हणजेच तिरुपतीची पत्नी या नात्याने १९८३ पासून शालू पाठविला जात होता. मात्र, अंबाबाई ही आदिमाता असून ती तिरुपतीची पत्नी नाही, हे सांगणारी वृतमालिका ‘लोकमत’ने दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या पद्धतीला विरोध होऊ लागला होता. गतवर्षी आईला शालू पाठवतोय, असे सांगून तिरुपती देवस्थानने हा शालू पाठविला होता. अंबाबाईला घागरा चोली वेष परिधान केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेला आला. लोकभावनेचा विचार करुन हा निर्णय घेतल्याचे समजते.