शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जातेच कशी?, केंद्र सरकारचा कारवाईचा बडगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 11:56 IST

केंद्र सरकारने २०१९ पासून ज्याच्या नावावर ७/१२ आहे, असे शेतकरी पेन्शनसाठी पात्र आहेत.

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ पेन्शन योजनेतील अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पुन्हा पेन्शनची रक्कम जातेच कशी? त्यांच्याकडून वसुली करून पुन्हा ही रक्कम जमा झाल्यास जिल्हा पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय वित्त व कृषी मंत्रालयाने राज्यांना काढले आहेत.केंद्र सरकारने २०१९ पासून ज्याच्या नावावर ७/१२ आहे, असे शेतकरी पेन्शनसाठी पात्र आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार ४७६ शेतकऱ्यांना योजना सुरू झाल्यानंतर पहिला हप्ता मिळाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. यामध्ये ज्यांच्या नावावर जमीन नाही, जे योजनेच्या निकषात बसत नाहीत, असे लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने सर्वच खात्यांची तपासणी केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार शेतकरी अपात्र ठरले होते.अपात्र शेतकऱ्यांचा आकडा पाहून केंद्र सरकारने संबंधित शेतकऱ्यांकडून पैसे वसुली करून घेण्याचे आदेश संबंधित राज्यांना दिले होते. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून वसुलीची माेहीम राबवली. संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा काढून विहित वेळेत लाभ घेतलेली रक्कम शासनाला परत करण्याचे आदेश नोटिसीव्दारे दिले होते.त्यानुसार जवळपास ८ हजार शेतकऱ्यांनी पैसे परत केले होते. वास्तविक १६ हजार शेतकऱ्यांकडून पेन्शनची रक्कम परत घेत असतानाच तेथून पुढचे हप्ते बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारचे होते. मात्र अपात्र ठरलेल्या ८ हजार ६०० शेतकऱ्यांना पुन्हा पेन्शन येत आहे.सहा महिन्यांपूर्वी आदेश देऊनही अपात्र शेतकऱ्यांची पेन्शन बंद होत कशी नाही? अशी विचारणा केंद्रीय अर्थ व कृषी मंत्रालयाने राज्य शासनाकडे केली आहे. राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, विभागीय आयुक्तांना वसुलीसह पेन्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्ह्यातील ३२०० जणांची पेन्शन बंदजिल्ह्यातील १६ हजार अपात्र पेन्शनधारकांपैकी आतापर्यंत केवळ ३२०० जणांची पेन्शन बंद झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.१.९४ लाख शेतकऱ्यांना नववा हप्ताकेंद्र सरकारने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ३८ कोटी रुपयांचा नववा हप्ता जमा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना