शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पेन्शन जातेच कशी?, केंद्र सरकारचा कारवाईचा बडगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 11:56 IST

केंद्र सरकारने २०१९ पासून ज्याच्या नावावर ७/१२ आहे, असे शेतकरी पेन्शनसाठी पात्र आहेत.

राजाराम लोंढेकोल्हापूर : केंद्र सरकारच्या ‘पी. एम. किसान’ पेन्शन योजनेतील अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पुन्हा पेन्शनची रक्कम जातेच कशी? त्यांच्याकडून वसुली करून पुन्हा ही रक्कम जमा झाल्यास जिल्हा पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय वित्त व कृषी मंत्रालयाने राज्यांना काढले आहेत.केंद्र सरकारने २०१९ पासून ज्याच्या नावावर ७/१२ आहे, असे शेतकरी पेन्शनसाठी पात्र आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ लाख ३० हजार ४७६ शेतकऱ्यांना योजना सुरू झाल्यानंतर पहिला हप्ता मिळाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. यामध्ये ज्यांच्या नावावर जमीन नाही, जे योजनेच्या निकषात बसत नाहीत, असे लाभ घेत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर शासनाने सर्वच खात्यांची तपासणी केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार शेतकरी अपात्र ठरले होते.अपात्र शेतकऱ्यांचा आकडा पाहून केंद्र सरकारने संबंधित शेतकऱ्यांकडून पैसे वसुली करून घेण्याचे आदेश संबंधित राज्यांना दिले होते. जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून वसुलीची माेहीम राबवली. संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा काढून विहित वेळेत लाभ घेतलेली रक्कम शासनाला परत करण्याचे आदेश नोटिसीव्दारे दिले होते.त्यानुसार जवळपास ८ हजार शेतकऱ्यांनी पैसे परत केले होते. वास्तविक १६ हजार शेतकऱ्यांकडून पेन्शनची रक्कम परत घेत असतानाच तेथून पुढचे हप्ते बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारचे होते. मात्र अपात्र ठरलेल्या ८ हजार ६०० शेतकऱ्यांना पुन्हा पेन्शन येत आहे.सहा महिन्यांपूर्वी आदेश देऊनही अपात्र शेतकऱ्यांची पेन्शन बंद होत कशी नाही? अशी विचारणा केंद्रीय अर्थ व कृषी मंत्रालयाने राज्य शासनाकडे केली आहे. राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून, विभागीय आयुक्तांना वसुलीसह पेन्शन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्ह्यातील ३२०० जणांची पेन्शन बंदजिल्ह्यातील १६ हजार अपात्र पेन्शनधारकांपैकी आतापर्यंत केवळ ३२०० जणांची पेन्शन बंद झाली आहे. उर्वरित लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.१.९४ लाख शेतकऱ्यांना नववा हप्ताकेंद्र सरकारने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील १ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ३८ कोटी रुपयांचा नववा हप्ता जमा केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना