शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

उत्सवी वातावरणासाठी आंबेडकर जयंतीचा उपयोग नको : रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 12:45 IST

समाजात वैचारिक क्रांती आणण्यासाठी आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधा

कोल्हापूर : गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सामान्य माणसांबरोबरच जगभरात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटले पाहिजे. केवळ नाचगाण्यासाठी आणि उत्सवी वातावरणासाठी उपयोग न करता समाजात वैचारिक क्रांती आणण्यासाठी आंबेडकर जयंतीचा मुहूर्त साधा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या निर्माण चौकातील भीम महोत्सवाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. अध्यक्षस्थानी भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो होते. यावेळी भारतात होणाऱ्या सोळाव्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण आठवले यांच्या हस्ते झाले.यावेळी आठवले म्हणाले की, बौद्ध समाज जरी येथे नसला तरी बुद्धांना मानणारे घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी आहेत, हीच त्यांच्या विचारांची ताकद आहे. बाबासाहेबांनी या देशात माणसांना जोडणारे माणुसकीचे कार्य केले आहे.ट्रस्टचे अध्यक्ष सतीश म्हाळगे यांनी प्रास्तविक करताना रामदास आठवले यांच्या नावे ट्रस्टमार्फत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापुरात उभारणार असल्याचे जाहीर केले. संघटक सचिव शहाजी कांबळे, सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी भदंत राहुल बोधी महाथेरो, आर. संबोधी, अण्णासाहेब वायदंडे, रूपाताई वायदंडे, सचिव मंगल म्हाळगे, माजी नगरसेवक दुर्वास कदम, राजेश ठिकपुर्ले, राहुल सडोलीकर उपस्थित होते. यावेळी कबीर नाईकनवरे यांनी गीतांचा कार्यक्रम सादर केला.गर्दी नसल्याने कार्यकर्त्यांना खडसावलेआठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करताना कार्यक्रमाला गर्दी नसल्याबद्दल कानउघाडणी करून कार्यकर्त्यांनाही थेट भाषणातून खडसावले. एखाद्या आंबेडकरी विचारांच्या वस्तीत जरी कार्यक्रम ठेवला असता तरी हजार लोक जमले असते, असे त्यांनी सुनावले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीRamdas Athawaleरामदास आठवले