शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर विकासकामांसाठी प्रतीक्षाच! दहा वर्षांपासून फक्त चर्चाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:05 IST

देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिर परिसरात होऊ घातलेल्या विकासकामांचा मुहूर्त आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता आहे

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा समावेश करण्याचे निर्देश तब्बल पाच महिन्यांनंतर

भारत चव्हाण ।कोल्हापूर : देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिर परिसरात होऊ घातलेल्या विकासकामांचा मुहूर्त आणखी काही महिने पुढे जाण्याची शक्यता आहे. तत्त्वत: मान्यता मिळाल्यानंतर आणि सर्व प्रकारच्या तांत्रिक कसोट्यांच्या पसंतीस उतरल्यानंतर ८० कोटींचा आराखडा मंजूर केला; परंतु आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देशित केलेल्या बाबींचा आराखड्यात समावेश करून सक्षम यंत्रणेची तांत्रिक मान्यता घेण्यास, तसेच विकासकामांची सविस्तर अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून तपासून घेण्यास नगरविकास विभागाने सांगितले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हायला विलंब होणार असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.

मंदिर विकास आराखडा गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत आणि मंजुरीच्या प्रतीक्षेत राहिला असून, भाविकांत नाराजीची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनांचा समावेश नव्याने आराखड्यात करावा, त्यास सक्षम यंत्रणेची मान्यता घेऊन आराखडा पाठवा, असे तब्बल पाच महिन्यांनी पालिकेला कळविले आहे.

८० कोटी खर्चाच्या मंदिर विकास आराखड्यास राज्य सरकारच्या शिखर समितीने ३१ जानेवारीला मंजुरी दिली. त्याच्यानंतर आठ दिवसांत त्याबाबतचा अध्यादेश (जी. आर.) काढला जाणार होता. अध्यादेशाचा कच्चा मसुदा तयार करून महानगरपालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला होता; पण गेल्या सहा महिन्यांत तरी असा अध्यादेश निघालेला नाही. मनपा प्रशासनास त्याची प्रतीक्षा आणि उत्सुकता असतानाच २५ जूनला नगरविकास विभागाचे एक पत्र मनपाच्या हाती पडले आहे. ३१ जानेवारीच्या शिखर समितीच्या बैठकीत सदर आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्देशित केलेल्या बाबींचा आराखड्यात समावेश करून सदर आराखड्यास सक्षम यंत्रणेची तांत्रिक मान्यता घेण्याची आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे त्यात म्हटले आहे.

फोरट्रेस कंपनीने या आराखड्याचे काम केले आहे. मनपाने दिलेल्या या आराखड्यावर अनेक बैठकांतून, त्रुटी दुरुस्त केल्या. उच्चस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीतून परिपूर्ण आराखडा तयार झाला आहे. तरीही आता नव्याने काही बदल करायला सांगितले जात असल्यामुळे सरकारच्या हेतूविषयीच शंका निर्माण होत आहे.

मंदिर परिसर विकास आराखड्यावर सर्व प्रक्रिया पार पडली आहे. ८० कोटींचा निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग झाला आणि अध्यादेश मिळाला की निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम फक्त बाकी राहिले होते. मात्र, आता नगरविकास विभागाने पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने पूर्तता करण्यात वेळ जाणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच त्यात कालापव्यय होणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश१. महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या विकासकामांची सविस्तर अंदाजपत्रके सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून तपासून घेण्यात यावीत.२. प्रस्तावित आराखड्यात स्मार्ट पार्किंग प्रणाली व सौरऊर्जा प्रणालीचा यथायोग्य वापर करावा.३. ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ ते मंदिरस्थळापर्यंत विशेष वाहतूक व्यवस्थेची (ई-कार्ट) सोय करण्यात यावी.४. शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाचा विचार करून मंदिरात निर्माण होणाऱ्या निर्माल्याचे जागेवरच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचा आराखड्यात समावेश करावा.५. मंदिर परिसरात प्लास्टिकचा वापर होणार नाही याकरिता विशेष यंत्रणा असावी.६. वरील अटींच्या अधीन राहून आराखड्यास तत्त्वत: मान्यता देण्यात येत आहे.पालिकेचीही उदासीनता३१ जानेवारीला मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या निर्देशाप्रमाणे आराखड्यात बदल करण्याचे ठरले होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांत पालिकेच्या अधिकाºयांनीही मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे आराखड्यात बदल केला नाही. नगरविकास विभागाचे पत्र आल्यावर मनपा जागी झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिर