शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अंबाबाई मंदिर प्रशासन सतर्क, कर्मचाऱ्यांना केल्या मास्क वापरण्याच्या सूचना

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 22, 2022 19:00 IST

भाविक आणि कर्मचारी दोघांच्याही सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, पण..

कोल्हापूर : देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून कोरोनाचा संभाव्य संसर्ग टाळण्यासाठी अंबाबाई मंदिरातील कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. गुरुवारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. भाविक आणि कर्मचारी दोघांच्याही सुरक्षेसाठी हा प्रतिबंधात्मक उपाय आहे, पण सक्ती नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा विस्फोट झाल्यानंतर भारतातही आता रुग्ण आढळू लागले आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात येतात. त्यांच्या संपर्कात कर्मचारी आले की त्यांना आणि त्यांच्याकडून पुन्हा भाविकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. राज्य किंवा केंद्र शासनाने अजून मास्कची सक्ती केलेली नसल्याने भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक नाही, असे नाईकवाडे यांनी सांगितले.चीनमध्ये Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले ४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर