शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अंबाबाई विकास आराखडा १२०० कोटींचा, प्रस्ताव शासनाला सादर; तीन वर्षाचे टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 18:05 IST

शिखर समितीच्या बैठकीत होणार निर्णय 

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा प्रस्ताव मंगळवारी राज्य शासनाला पाठवण्यात आला आहे. याबाबत पुढील पंधरा दिवसात शिखर समितीची बैठक होऊन त्यात आराखड्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. आराखड्याची रक्कम आणखी वाढली असून साधारण १२०० कोटींपर्यंत गेला आहे. अपेक्षित प्रमाणात निधी आला तर पुढील ३ वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा उद्देश आहे.श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याबाबत सध्या वेगाने हालचाली सुरू असून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाकडूनही याबाबत वेगाने कार्यवाही सुरू असून मंगळवारी या आराखड्याचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर शिखर समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. पुढील १५ दिवसात जिल्हा प्रशासनाकडून शिखर समितीच्या बैठकीसाठीची वेळ घेण्यात येणार आहे. त्यांनी दिलेल्या वेळेनुसार बैठकीत चर्चा व सादरीकरण होईल. त्यावेळी येणाऱ्या सूचनांचा अंतर्भाव करून अंतिम आराखड्याला मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. शासनाने वेळेत, पुरेसा निधी दिला तर पुढील तीन वर्षात आराखडा पूर्ण करण्याचा उद्देश आहे.

बजेटमध्ये तरतुदीची शक्यताराज्य शासनाचा अर्थसंकल्प अजून सादर झालेला नाही. या बजेटमध्येच अंबाबाई मंदिर आराखड्यासाठी काही रकमेची तरतूद होण्याची शक्यता आहे. याबाबत शासन सकारात्मक असल्याने वेगाने आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे १५ दिवस आराखडा मंजूर होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील.

अजून बदल नाही..व्यापाऱ्यांनी पुनर्वसनासाठी कपिलतीर्थ मार्केट व अन्य इमारतींचा पर्याय सुचवला आहे मात्र याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा होऊन शिक्कामोर्तब झालेला नही. बजेटपूर्वी आराखडा शासनाला सादर होणे गरजेचे असल्याने सध्यस्थितीत त्यात कोणताही नवा बदल केलेला नाही. पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहेत.

संपादन व पुनर्वसनासाठीच सर्वाधिक रक्कमविकास प्रकल्पासाठी ३०० ते ४०० कोटी रुपये लागणार आहे. त्यासाठी जागेचे संपादन व मिळकतधारकांना नुकसानभरपाई यासाठीच सर्वाधिक ५०० ते ८०० कोटी रुपये लागणार आहे. त्यामुळे हजार कोटींचा हा आराखडा आता अंदाजे १२०० कोटींवर गेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरGovernmentसरकार