शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

कोल्हापुरातील अंबाबाई परिसर विकासात दुटप्पीपणाचा अडथळा, उठसूठ विरोध चुकीचाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 13:07 IST

एकीकडे विकास होत नाही म्हणून ओरड करायची आणि विकासाचा विचार सुरु झाल्यावर लगेच विरोध करायचा असा दुटप्पीपणा काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर बाहेरील महाद्वार रोडवरील मिळकतींच्या संपादनासाठी देवस्थान समितीने पहिले पाऊल उचलले तर लगेचच काही घटकांनी गैरसमज निर्माण करून विरोध सुरू केला आहे. एकीकडे विकास होत नाही म्हणून ओरड करायची आणि विकासाचा विचार सुरु झाल्यावर लगेच विरोध करायचा असा दुटप्पीपणा काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. तोच या विकासात मुख्य अडथळा आहे. तो दूर होत नाही तोपर्यंत अंबाबाई परिसर विकास हवेतच राहणार आहे.अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करा, धार्मिक व पर्यटनस्थळ करा, भाविकांना सोयीसुविधा द्या अशी मागणी करणारे, त्यासाठी आग्रही असणारेच विरोधासाठी पुढे येतात. हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती असल्याने अगदी मंदिराच्या भिंतीला लागून घरे, दुकानगाळे, वाहनांची गर्दी, फेरीवाले, यात्रीनिवास, व्यापारी संकुल असल्याने मिळकत धारकाला तिथे एक इंचभरही जास्तीच्या जागेत विकास करता येत नाही. दुचाकी वाहने नेता येत नाही, मोटारकाडीची तर गोष्टच सोडा. ही परिस्थिती बदलायची असेल तर परिसर मोकळा केला पाहीजे.

विकास हवा असेल तर तडजोडीचीही तयारी ठेवावी लागेल. मिळकतधारकांचे नुकसानच होणार असेल तर विरोध नक्की करावा. पण वस्तुस्थिती माहिती नसताना किंवा पूर्वग्रह दूषित मानसिकता ठेवून पहिल्या टप्प्यावरच विरोध केला जात आहे. त्यासाठी ठरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे.आग्रह धरायला हवा...संपादनाला विरोध करण्याऐवजी आमचे समाधानकारक पुनर्वसन कसे करणार यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरायला हवा. घरांच्या संपादनाचा मोबदला किती मिळणार, नुकसान होणार नाही ना, व्यवसाय, दुकानांची पर्यायी व्यवस्था कोठे करणार, तिथे व्यवसाय व्हावा, भाविक-पर्यटक यावेत यासाठी काय व्यवस्था लावणार यासाठी प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्याकडून तसा आराखडा करून घेता येईल. पण विकासच करायचा नाही ही भूमिका योग्य नाही.

विश्वासात घ्या..पिढ्यानपिढ्या किंवा आयुष्याची जमापूंजी घालूून निर्माण केलेली एखादी गोष्ट विकास प्रकल्पासाठी देताना अनेक प्रश्न, शंका निर्माण होणार, असुरक्षिततेची भावना असणार हे साहजिक आहे. पण त्यांचे योग्य पद्धतीने व योग्य मार्गाने निराकरण करणे गरजेचे आहे. आता मिळकतधारकांना विनंतीपत्र पाठवले असले तरी तुमचे नुकसान होणार नाही उलट फायदाच होईल हा विश्वास देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये निर्माण केला तर हा संपादनाचा प्रवास सोपा होणार आहे.

महामार्ग, विमानतळाचे उदाहरण..सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी भूसंपादन झाले असून सर्व मिळकतधारकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळाला आहे. अगदी पडीक, डोंगराळ जमिनीला ही चांगला दर शासनाने दिला. कोल्हापूर विमानतळासाठी देखील चांगला मोबदला देऊन भूसंपादन झाले आहे. अंबाबाई मंदिर परिसर तर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे तिथेही असा मोबदला मिळू शकतो. आणि मंदिराच्या आजूबाजूचे भूसंपादन झाल्याशिवाय मंदिर मोकळे कसे होणार..? जागा तर मंदिर परिसरातीलच घ्यावी लागेल. फुलेवाडी किंवा पाचगावची जागा घेऊन मंदिर परिसराचा विकास करता येणार नाही याचाही विचार होण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर