शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोल्हापुरातील अंबाबाई परिसर विकासात दुटप्पीपणाचा अडथळा, उठसूठ विरोध चुकीचाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 13:07 IST

एकीकडे विकास होत नाही म्हणून ओरड करायची आणि विकासाचा विचार सुरु झाल्यावर लगेच विरोध करायचा असा दुटप्पीपणा काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर बाहेरील महाद्वार रोडवरील मिळकतींच्या संपादनासाठी देवस्थान समितीने पहिले पाऊल उचलले तर लगेचच काही घटकांनी गैरसमज निर्माण करून विरोध सुरू केला आहे. एकीकडे विकास होत नाही म्हणून ओरड करायची आणि विकासाचा विचार सुरु झाल्यावर लगेच विरोध करायचा असा दुटप्पीपणा काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. तोच या विकासात मुख्य अडथळा आहे. तो दूर होत नाही तोपर्यंत अंबाबाई परिसर विकास हवेतच राहणार आहे.अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करा, धार्मिक व पर्यटनस्थळ करा, भाविकांना सोयीसुविधा द्या अशी मागणी करणारे, त्यासाठी आग्रही असणारेच विरोधासाठी पुढे येतात. हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती असल्याने अगदी मंदिराच्या भिंतीला लागून घरे, दुकानगाळे, वाहनांची गर्दी, फेरीवाले, यात्रीनिवास, व्यापारी संकुल असल्याने मिळकत धारकाला तिथे एक इंचभरही जास्तीच्या जागेत विकास करता येत नाही. दुचाकी वाहने नेता येत नाही, मोटारकाडीची तर गोष्टच सोडा. ही परिस्थिती बदलायची असेल तर परिसर मोकळा केला पाहीजे.

विकास हवा असेल तर तडजोडीचीही तयारी ठेवावी लागेल. मिळकतधारकांचे नुकसानच होणार असेल तर विरोध नक्की करावा. पण वस्तुस्थिती माहिती नसताना किंवा पूर्वग्रह दूषित मानसिकता ठेवून पहिल्या टप्प्यावरच विरोध केला जात आहे. त्यासाठी ठरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे.आग्रह धरायला हवा...संपादनाला विरोध करण्याऐवजी आमचे समाधानकारक पुनर्वसन कसे करणार यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरायला हवा. घरांच्या संपादनाचा मोबदला किती मिळणार, नुकसान होणार नाही ना, व्यवसाय, दुकानांची पर्यायी व्यवस्था कोठे करणार, तिथे व्यवसाय व्हावा, भाविक-पर्यटक यावेत यासाठी काय व्यवस्था लावणार यासाठी प्रशासनावर दबाव टाकून त्यांच्याकडून तसा आराखडा करून घेता येईल. पण विकासच करायचा नाही ही भूमिका योग्य नाही.

विश्वासात घ्या..पिढ्यानपिढ्या किंवा आयुष्याची जमापूंजी घालूून निर्माण केलेली एखादी गोष्ट विकास प्रकल्पासाठी देताना अनेक प्रश्न, शंका निर्माण होणार, असुरक्षिततेची भावना असणार हे साहजिक आहे. पण त्यांचे योग्य पद्धतीने व योग्य मार्गाने निराकरण करणे गरजेचे आहे. आता मिळकतधारकांना विनंतीपत्र पाठवले असले तरी तुमचे नुकसान होणार नाही उलट फायदाच होईल हा विश्वास देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासन म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये निर्माण केला तर हा संपादनाचा प्रवास सोपा होणार आहे.

महामार्ग, विमानतळाचे उदाहरण..सध्या नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी भूसंपादन झाले असून सर्व मिळकतधारकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळाला आहे. अगदी पडीक, डोंगराळ जमिनीला ही चांगला दर शासनाने दिला. कोल्हापूर विमानतळासाठी देखील चांगला मोबदला देऊन भूसंपादन झाले आहे. अंबाबाई मंदिर परिसर तर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. त्यामुळे तिथेही असा मोबदला मिळू शकतो. आणि मंदिराच्या आजूबाजूचे भूसंपादन झाल्याशिवाय मंदिर मोकळे कसे होणार..? जागा तर मंदिर परिसरातीलच घ्यावी लागेल. फुलेवाडी किंवा पाचगावची जागा घेऊन मंदिर परिसराचा विकास करता येणार नाही याचाही विचार होण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर