शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

जैव वैद्यकीय कचऱ्यामध्येही गोरखधंदा, प्रजासत्ताक सेवा संस्थेची चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:49 IST

कोरोनात वापरलेली केवळ पीपीई किट इतर ठिकाणी प्रक्रियासाठी पाठविण्यास परवानगी आहे. मात्र, महापालिकेकडून सर्वच कोरोनाचा कचरा खुल्या वाहनातून मुंबईकडे पाठविला जात आहे. यामागे महापालिकेचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला आहे.

ठळक मुद्देजैव वैद्यकीय कचऱ्यामध्येही गोरखधंदा, प्रजासत्ताक सेवा संस्थेची चौकशीची मागणीप्रक्रियेसाठी मुंबईला पाठविण्यात गौडबंगाल असल्याचा आरोप

कोल्हापूर : कोरोनात वापरलेली केवळ पीपीई किट इतर ठिकाणी प्रक्रियासाठी पाठविण्यास परवानगी आहे. मात्र, महापालिकेकडून सर्वच कोरोनाचा कचरा खुल्या वाहनातून मुंबईकडे पाठविला जात आहे. यामागे महापालिकेचा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला आहे.

या प्रकरणाची चौकशी करून कचऱ्यावर मलई खाणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणी मुंबई येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांच्याकडे ई मेलद्वारे केली आहे.महापालिकेकडून शहर व शहरालगत असणाऱ्या ८०० पेक्षा जास्त रुग्णालयांतील जैव वैद्यकीय कचरा संकलित करून लाईन बाजार येथील प्रकल्पाच्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया केली जाते.

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे जैव वैद्यकीय कचऱ्यात वाढ झाली आहे. यामध्ये कोविड कचरा जास्त आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचरा प्रक्रियासाठी येत असल्याने परिसरात कचऱ्याचा ढीग पडला आहे.

महापालिकेकडून वाढीव कचरा मुंबई येथील वेस्ट मॅनेजमेंट (रॅमके) कडे दिला जात आहे. यामध्ये गैरप्रकार होत असल्याचा भांडाफोड प्रजासत्ताक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी शुक्रवारी केला. त्यांनी प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन महापालिकेच्या वाहनातून जमा झालेला कोविड कचरा टेम्पोमध्ये टाकत असल्याचे दिसून आले. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारत हा कचरा कुठे जातो, असा सवाल केला. त्याला सविस्तर माहिती देता आली नाही.देसाई यांनी यासंदर्भात सांगितले की, कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केवळ पीपीई किट मुंबईला पाठविण्याची महापालिकेला प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे. तेही बंदिस्त कंटेनरमधून वाहतूक करायची आहे. मात्र, महापालिकेडून सर्वच कचरा पाठविला जात आहे.

असे असताना हँडग्लोव्हज, मास्क, इतर साहित्यही प्लास्टिकच्या पिशवीतून उघड्या टेम्पोतून पाठविला जात आहे, हे धोकादायक आहे. तसेच कर्मचारीविना पीपीई किटमध्ये संकलित कचऱ्याच्या पिशव्या टेम्पोत टाकत आहेत.

महापालिकेचा प्रकल्प पूर्ण क्षमेतेने सुरू नाही. यामुळेच कचऱ्यात वाढ झाली आहे. वापरलेल्या हँडग्लोव्हजचा पुन्हा वापर होत असल्याचे यापूर्वी समोर आले आहे. त्यामुळे हा कचरा नेमका कुठे जातो. त्याचे काय होते, महापालिकेच्या या सर्व प्रकियाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली असल्याचे देसाई यांनी सांगितले.महापालिकेच्या जैव वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्पाची रोज १६०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. यापूर्वी केवळ १ हजार किलो कचरा येत होता. कोरोनामुळे रोज ४५०० किलो कचरा जमा होत असून यापैकी केवळ ३५०० किलो कचरा कोविडचा आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या परवानगीनेच येथील जादाचा कचरा मुंबई येथील रॅमके कंपनीकडे पाठवत असल्याची माहिती महापालिकेच्या संबंधित विभाग प्रमुखाने दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयenvironmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर