शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद: कर्नाटकचे मुख्यमंत्री आज कोल्हापुरात, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून मांडली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 12:56 IST

अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ सह सांगली जिल्ह्याला याचा फटका बसणार

मोहन सातपुतेउचगाव: कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा घाट घातला आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकतेच्या पवित्र्यात आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई हे आज, कोल्हापुरातील सिद्धगिरी मठावरील कार्यक्रमासाठी उजळाईवाडी कोल्हापूर विमानतळावर आले असता शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री बोंम्मई यांना निवेदन देऊन आपली भूमिका मांडली आहे.अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ सह सांगली जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री बोंम्मई यांना यावर तोडगा काढण्याची विनंती केली. तसेच धरणाची उंची वाढवण्यास विरोध दर्शवला. अलमट्टी धरणाची पाणी पातळी ५१२ ठेवावी, अशी मागणी वारंवार केली जाते. याबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापूर्वी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद एकीकडे न्यायालयात असताना अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे. पाच मीटरने उंची वाढवल्यानंतर अलमट्टीची पाणी पातळी थेट शिरोळ बंधा-यापर्यंत पोहोचणार असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ञ करत आहेत. यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात जाणाऱ्या नद्यांमधले पाणी पुढे सरकणार नाही. पावसाळ्यात ही दोन्ही शहरं जलमय होऊ शकतात. तर शिरोळ तालुक्यातील साडेपाच ते सहा हजार एकर जमीन नापीक बनण्याचा धोका आहे. त्यामुळे हा वाद आणखी तापण्याची चिन्हं आहेत.अलमट्टी धरणाचा तिढा, कोल्हापूरला पाण्याचा वेढाअलमट्टी धरणाचं बांधकाम पूर्ण झालं. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या महापुरांना अलमट्टी धरण कारणीभूत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. सांगलीपासून सुमारे सव्वादोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अलमट्टी धरणाचा सांगली आणि कोल्हापुरातल्या महापुराशी थेट संबंध नसल्याचा एक मतप्रवाह आहे. दरम्यान, अलमट्टीची उंची वाढवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रातून जोरदार विरोध सुरू झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकDamधरण