शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात वकील परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन, खंडपीठ प्रश्नी चर्चेसाठी आठवड्यात वेळ देण्याचे आश्वासन

By उद्धव गोडसे | Updated: August 10, 2024 17:36 IST

मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा

कोल्हापूर : खंडपीठ आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित केेलेली वकील परिषद संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य संग्रामसिंह देसाई यांच्याशी मोबाइलवरून संवाद साधला. खंडपीठाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आठवड्यात भेटीची वेळ देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.महासैनिक दरबार हॉल येथे शनिवारी (दि. १०) झालेल्या वकील परिषदेसाठी सहा जिल्ह्यातील सुमारे दोन हजार वकील उपस्थित होते. आचारसंहितेपूर्वी अंतिम निर्णय व्हावा, यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला.

मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या भेटीत कोल्हापुरातील खंडपीठावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी खंडपीठ कृती समितीची सहा जिल्ह्यांतील वकील परिषद झाली. समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी प्रास्ताविकातून आजवरचे आंदोलन आणि माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या अहवालाची माहिती दिली.सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी आणि ज्येष्ठ वकिलांनी आंदोलनाबद्दल भूमिका मांडली. ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत जाधव यांनी आंदोलन पुन्हा गतिमान झाल्याचे समाधन व्यक्त करून पक्षकारांना लढ्यात सामावून घेण्याचे आवाहन केले. ॲड. विवेक घाटगे यांनी आक्रमक आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली. खंडपीठाच्या मागणीसाठी प्रदीर्घ काळ आंदोलन चालू राहणे हे सरकारचे आणि न्याय यंत्रणांचे अपयश आहे. सरकारने वकिलांचा अंत पाहू नये, असे आवाहन ॲड. महादेवराव आडगुळे यांनी केले.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य वसंतराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. राजकीय हेतूनेच आजवर कोल्हापूर खंडपीठाची मागणी दुर्लक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. सचिन देशमुख, किरण रजपूत, विकास पाटील, भाऊसाहेब पोवार, दिलीप पाटील, शिवाजीराव राणे, आदींनी मनोगत व्यक्त करून तातडीने हा प्रश्न निकाली निघावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चापरिषदेचा समारोप होण्यापूर्वीच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ॲड. देसाई यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी देसाई यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे करून दिले. कोल्हापुरातील खंडपीठाबद्दल सरकार सकारात्मक असून, आठवडाभरात खंडपीठ कृती समितीला भेटीची वेळ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. ही संपूर्ण चर्चा व्यासपीठावरून वकिलांना थेट ऐकविण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयadvocateवकिलChief Ministerमुख्यमंत्री