शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

कोल्हापुरात वकील परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांचा फोन, खंडपीठ प्रश्नी चर्चेसाठी आठवड्यात वेळ देण्याचे आश्वासन

By उद्धव गोडसे | Updated: August 10, 2024 17:36 IST

मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चा

कोल्हापूर : खंडपीठ आंदोलनाची दिशा निश्चित करण्यासाठी आयोजित केेलेली वकील परिषद संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य संग्रामसिंह देसाई यांच्याशी मोबाइलवरून संवाद साधला. खंडपीठाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आठवड्यात भेटीची वेळ देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.महासैनिक दरबार हॉल येथे शनिवारी (दि. १०) झालेल्या वकील परिषदेसाठी सहा जिल्ह्यातील सुमारे दोन हजार वकील उपस्थित होते. आचारसंहितेपूर्वी अंतिम निर्णय व्हावा, यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार परिषदेत करण्यात आला.

मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या भेटीत कोल्हापुरातील खंडपीठावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आणि खंडपीठ आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी खंडपीठ कृती समितीची सहा जिल्ह्यांतील वकील परिषद झाली. समितीचे निमंत्रक तथा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी प्रास्ताविकातून आजवरचे आंदोलन आणि माजी मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या अहवालाची माहिती दिली.सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनच्या पदाधिका-यांनी आणि ज्येष्ठ वकिलांनी आंदोलनाबद्दल भूमिका मांडली. ज्येष्ठ विधिज्ञ श्रीकांत जाधव यांनी आंदोलन पुन्हा गतिमान झाल्याचे समाधन व्यक्त करून पक्षकारांना लढ्यात सामावून घेण्याचे आवाहन केले. ॲड. विवेक घाटगे यांनी आक्रमक आंदोलन करण्याची गरज व्यक्त केली. खंडपीठाच्या मागणीसाठी प्रदीर्घ काळ आंदोलन चालू राहणे हे सरकारचे आणि न्याय यंत्रणांचे अपयश आहे. सरकारने वकिलांचा अंत पाहू नये, असे आवाहन ॲड. महादेवराव आडगुळे यांनी केले.

महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य वसंतराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. राजकीय हेतूनेच आजवर कोल्हापूर खंडपीठाची मागणी दुर्लक्षित राहिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ॲड. सचिन देशमुख, किरण रजपूत, विकास पाटील, भाऊसाहेब पोवार, दिलीप पाटील, शिवाजीराव राणे, आदींनी मनोगत व्यक्त करून तातडीने हा प्रश्न निकाली निघावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच कोणत्याही प्रकारच्या आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांची फोनवरून चर्चापरिषदेचा समारोप होण्यापूर्वीच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ॲड. देसाई यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी देसाई यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे करून दिले. कोल्हापुरातील खंडपीठाबद्दल सरकार सकारात्मक असून, आठवडाभरात खंडपीठ कृती समितीला भेटीची वेळ देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. ही संपूर्ण चर्चा व्यासपीठावरून वकिलांना थेट ऐकविण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCourtन्यायालयadvocateवकिलChief Ministerमुख्यमंत्री