शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019 : आघाडीने महाराष्ट्राची १५ वर्षे फुकट घालवली : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 18:32 IST

१५ वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेत होते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात गटा-तटात भांडणे लावून विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत ठेवले. काँगे्रस-राष्ट्रवादीने केवळ मौजमजा केली आणि महाराष्ट्राची विकासाची १५ वर्षे फुकट घालवली, अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.

ठळक मुद्देआघाडीने महाराष्ट्राची १५ वर्षे फुकट घालवली : आदित्य ठाकरेगडहिंग्लजमध्ये महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटला,  वरळीत उभारणार कोल्हापूर भवन

गडहिंग्लज : १५ वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेत होते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात गटा-तटात भांडणे लावून विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत ठेवले. काँगे्रस-राष्ट्रवादीने केवळ मौजमजा केली आणि महाराष्ट्राची विकासाची १५ वर्षे फुकट घालवली, अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.कागल व चंदगडविधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या पटांगणात ही सभा झाली.ठाकरे म्हणाले, युतीमध्ये कोणतेही छुपे वार, गनिमी नाही, जे कांही आहे ते समोरासमोर आहे. आघाडी मात्र फक्त बिघाडीसाठीच बनली असून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महायुतीच सक्षम आहे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठीच महायुती झाली आहे.मंडलिक म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीतच शिवसेनेचे उमेदवार कागल व चंदगडमधून निवडून द्यायला पाहिजे होते. गडहिंग्लज विभागातील रखडलेली विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीलाच साथ द्या.

शिवसेनेचे कागलचे उमेदवार संजय घाटगे व चंदगडचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार, अंबरीश घाटगे, प्रभाकर खांडेकर, सुनिल शिंत्रे, विरेंद्र मंडलिक, संभाजी भोकरे, उत्तम कांबळे, जयश्री तेली, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, श्रद्धा शिंत्रे, शशीकला पाटील, रियाज शमनजी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप माने यांनी सूत्रसंचलन केले. वरळीत उभारणार कोल्हापूर भवनचंदगड, आजरा, गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य नागरिक नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले आहेत. त्यांच्यासाठी वरळीमध्ये आपण कोल्हापूर भवन उभारणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेvidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड