शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

विकासाच्या भावनेतूनच ‘राष्ट्रवादी’ शी युती : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:10 IST

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देबिद्री साखर निवडणूकीचे राजकारणसर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने जिंकू रविवारी, ८ आॅक्टोबरला निवडणूक होणार

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारखान्याच्या निवडणूकीत सर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने आम्ही जिंकू असाही विश्र्वास पाटील यांनी व्यक्त केला. येत्या रविवारी, ८ आॅक्टोबरला ही निवडणूक होत आहे.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारवादी पार्टी असल्याची टीका भाजपने सातत्याने केली आहे. मग असे असताना त्याच पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय का घेतला अशी विचारणा केल्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले,‘राजकारण की विकास असा जेव्हा प्रश्र्न येतो तेव्हा भाजपने कायमच विकासाला महत्व दिले आहे.

देशाच्या राजकारणातही १९६७ ला जनसंघाने मध्यप्रदेश,राजस्थान व गुजरातमध्ये तत्कालीन काँग्रेसविरोधी पक्षांना एकत्र आणून सत्ता मिळवली होती. जनता पार्टीमध्येही जनसंघ हा महत्वाचा घटक होता. आम्ही विकासापेक्षा, देशापेक्षा कधी स्वत:ला मोठ मानलं नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात २४ पक्ष एकत्र येवून देशात सरकार स्थापण केले होते. आताही भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारमध्ये विविध ८ पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी कारखान्याच्या निवडणूकीत युती केली यात गैर कांही वाटत नाही. राजकारणात आम्ही तेवढे लवचिक आहोत.’

ते म्हणाले,‘ बिद्री हा देशातील पहिल्या पाचमध्ये येवू शकेल अशी क्षमता असलेला चांगला कारखाना आहे. प्रशासकांच्या काळातही उत्साह वाढविणारे काम तिथे झाले आहे. सहवीज प्रकल्प उत्तम पध्दतीने सुरु आहे. गेल्या हंगामात एफआरपी आणि १७५ रुपये दुसरा हप्ता दिला आहे. अजूनही टनांस किमान शंभर रुपये दिले जावू शकतात. अशीही चांगली बसलेली घडी विस्कळीत होवू नये यासाठी आम्ही पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो. ’

भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून ताकद आजमावण्याचा विचार का केला नाही असे विचारल्यावर मंत्री पाटील म्हणाले,‘भिंतीवर डोके आपटून मृत्यू पत्करण्यापेक्षा मी नेहमी व्यावहारिक विचार करणारा माणूस आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही स्वतंत्र पॅनेल करून विजयाप्रत पोहोचण्याएवढी आमची नक्कीच ताकद नाही. त्यामुळे कुणातरी सोबत जाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता.बिद्रीत एवढे लक्ष घातले असल्याने विधानसभेला राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला मंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

ते म्हणाले,‘सहकार संस्था असो की स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही कोणत्याही पक्षासोबत एकत्र यायला अडचण नाही. विधानसभेची निवडणूकही पक्षीय पातळीवर होते. एका कारखान्याच्या निवडणूकीतील युतीवरून विधानसभेचा अंदाज तो ही दोन वर्षे अगोदर बांधणे फारच घाईचे होईल.

मी स्वत: या मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही हे यापूर्वीही स्पष्ट केले आहे. परंतू कांही झाले तरी या मतदार संघातून भाजपचा आमदार करण्याचे माझे टार्गेट आहे. त्यासाठी या मतदार संघातील विकासाचे प्रश्र्न मार्गी लावणार आहे. इतकी चांगली कामे करु की लोकांना भाजपचा आमदार निवडून देणे भाग पडेल.’