शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या भावनेतूनच ‘राष्ट्रवादी’ शी युती : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:10 IST

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देबिद्री साखर निवडणूकीचे राजकारणसर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने जिंकू रविवारी, ८ आॅक्टोबरला निवडणूक होणार

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारखान्याच्या निवडणूकीत सर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने आम्ही जिंकू असाही विश्र्वास पाटील यांनी व्यक्त केला. येत्या रविवारी, ८ आॅक्टोबरला ही निवडणूक होत आहे.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारवादी पार्टी असल्याची टीका भाजपने सातत्याने केली आहे. मग असे असताना त्याच पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय का घेतला अशी विचारणा केल्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले,‘राजकारण की विकास असा जेव्हा प्रश्र्न येतो तेव्हा भाजपने कायमच विकासाला महत्व दिले आहे.

देशाच्या राजकारणातही १९६७ ला जनसंघाने मध्यप्रदेश,राजस्थान व गुजरातमध्ये तत्कालीन काँग्रेसविरोधी पक्षांना एकत्र आणून सत्ता मिळवली होती. जनता पार्टीमध्येही जनसंघ हा महत्वाचा घटक होता. आम्ही विकासापेक्षा, देशापेक्षा कधी स्वत:ला मोठ मानलं नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात २४ पक्ष एकत्र येवून देशात सरकार स्थापण केले होते. आताही भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारमध्ये विविध ८ पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी कारखान्याच्या निवडणूकीत युती केली यात गैर कांही वाटत नाही. राजकारणात आम्ही तेवढे लवचिक आहोत.’

ते म्हणाले,‘ बिद्री हा देशातील पहिल्या पाचमध्ये येवू शकेल अशी क्षमता असलेला चांगला कारखाना आहे. प्रशासकांच्या काळातही उत्साह वाढविणारे काम तिथे झाले आहे. सहवीज प्रकल्प उत्तम पध्दतीने सुरु आहे. गेल्या हंगामात एफआरपी आणि १७५ रुपये दुसरा हप्ता दिला आहे. अजूनही टनांस किमान शंभर रुपये दिले जावू शकतात. अशीही चांगली बसलेली घडी विस्कळीत होवू नये यासाठी आम्ही पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो. ’

भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून ताकद आजमावण्याचा विचार का केला नाही असे विचारल्यावर मंत्री पाटील म्हणाले,‘भिंतीवर डोके आपटून मृत्यू पत्करण्यापेक्षा मी नेहमी व्यावहारिक विचार करणारा माणूस आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही स्वतंत्र पॅनेल करून विजयाप्रत पोहोचण्याएवढी आमची नक्कीच ताकद नाही. त्यामुळे कुणातरी सोबत जाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता.बिद्रीत एवढे लक्ष घातले असल्याने विधानसभेला राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला मंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

ते म्हणाले,‘सहकार संस्था असो की स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही कोणत्याही पक्षासोबत एकत्र यायला अडचण नाही. विधानसभेची निवडणूकही पक्षीय पातळीवर होते. एका कारखान्याच्या निवडणूकीतील युतीवरून विधानसभेचा अंदाज तो ही दोन वर्षे अगोदर बांधणे फारच घाईचे होईल.

मी स्वत: या मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही हे यापूर्वीही स्पष्ट केले आहे. परंतू कांही झाले तरी या मतदार संघातून भाजपचा आमदार करण्याचे माझे टार्गेट आहे. त्यासाठी या मतदार संघातील विकासाचे प्रश्र्न मार्गी लावणार आहे. इतकी चांगली कामे करु की लोकांना भाजपचा आमदार निवडून देणे भाग पडेल.’