शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विकासाच्या भावनेतूनच ‘राष्ट्रवादी’ शी युती : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 15:10 IST

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देबिद्री साखर निवडणूकीचे राजकारणसर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने जिंकू रविवारी, ८ आॅक्टोबरला निवडणूक होणार

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा - वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात विकासाच्या भावनेतूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली असून त्यात गैर कांही वाटत नाही. राजकारणांपेक्षा कारखान्यांच्या आणि शेतकºयांच्या हिताला महत्व देवून राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारखान्याच्या निवडणूकीत सर्व २१ जागा चांगल्या मताधिक्याने आम्ही जिंकू असाही विश्र्वास पाटील यांनी व्यक्त केला. येत्या रविवारी, ८ आॅक्टोबरला ही निवडणूक होत आहे.

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारवादी पार्टी असल्याची टीका भाजपने सातत्याने केली आहे. मग असे असताना त्याच पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय का घेतला अशी विचारणा केल्यावर पालकमंत्री पाटील म्हणाले,‘राजकारण की विकास असा जेव्हा प्रश्र्न येतो तेव्हा भाजपने कायमच विकासाला महत्व दिले आहे.

देशाच्या राजकारणातही १९६७ ला जनसंघाने मध्यप्रदेश,राजस्थान व गुजरातमध्ये तत्कालीन काँग्रेसविरोधी पक्षांना एकत्र आणून सत्ता मिळवली होती. जनता पार्टीमध्येही जनसंघ हा महत्वाचा घटक होता. आम्ही विकासापेक्षा, देशापेक्षा कधी स्वत:ला मोठ मानलं नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात २४ पक्ष एकत्र येवून देशात सरकार स्थापण केले होते. आताही भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकारमध्ये विविध ८ पक्ष सहभागी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसशी कारखान्याच्या निवडणूकीत युती केली यात गैर कांही वाटत नाही. राजकारणात आम्ही तेवढे लवचिक आहोत.’

ते म्हणाले,‘ बिद्री हा देशातील पहिल्या पाचमध्ये येवू शकेल अशी क्षमता असलेला चांगला कारखाना आहे. प्रशासकांच्या काळातही उत्साह वाढविणारे काम तिथे झाले आहे. सहवीज प्रकल्प उत्तम पध्दतीने सुरु आहे. गेल्या हंगामात एफआरपी आणि १७५ रुपये दुसरा हप्ता दिला आहे. अजूनही टनांस किमान शंभर रुपये दिले जावू शकतात. अशीही चांगली बसलेली घडी विस्कळीत होवू नये यासाठी आम्ही पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आलो. ’

भाजपने स्वबळावर निवडणूक लढवून ताकद आजमावण्याचा विचार का केला नाही असे विचारल्यावर मंत्री पाटील म्हणाले,‘भिंतीवर डोके आपटून मृत्यू पत्करण्यापेक्षा मी नेहमी व्यावहारिक विचार करणारा माणूस आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही स्वतंत्र पॅनेल करून विजयाप्रत पोहोचण्याएवढी आमची नक्कीच ताकद नाही. त्यामुळे कुणातरी सोबत जाण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय नव्हता.बिद्रीत एवढे लक्ष घातले असल्याने विधानसभेला राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला मंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला.

ते म्हणाले,‘सहकार संस्था असो की स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही कोणत्याही पक्षासोबत एकत्र यायला अडचण नाही. विधानसभेची निवडणूकही पक्षीय पातळीवर होते. एका कारखान्याच्या निवडणूकीतील युतीवरून विधानसभेचा अंदाज तो ही दोन वर्षे अगोदर बांधणे फारच घाईचे होईल.

मी स्वत: या मतदार संघातून निवडणूक लढवणार नाही हे यापूर्वीही स्पष्ट केले आहे. परंतू कांही झाले तरी या मतदार संघातून भाजपचा आमदार करण्याचे माझे टार्गेट आहे. त्यासाठी या मतदार संघातील विकासाचे प्रश्र्न मार्गी लावणार आहे. इतकी चांगली कामे करु की लोकांना भाजपचा आमदार निवडून देणे भाग पडेल.’