शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
3
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
4
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
5
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
6
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
7
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
8
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
9
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
10
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
11
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
12
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
13
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
14
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
15
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
16
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
17
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
18
Sawaliya Foods Products shares: लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
19
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
20
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा

कोल्हापुरातील सर्व रेल्वेगाड्या दुसऱ्यादिवशीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:05 IST

रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील सर्व रेल्वेगाड्या दुसऱ्यादिवशीही रद्दएसटीच्या १२०४ फेऱ्या रद्द : कुरुंदवाड आगार जयसिंगपूरमध्ये स्थलांतर

कोल्हापूर : रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.रुकडी येथील रेल्वेपुलाजवळ पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी धोका पातळीजवळ आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून मिरजेकडे आणि मिरजेहून कोल्हापूरकडे येणारी रेल्वेची वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंद करण्यात आली. यामुळे कोल्हापुरात दररोज येणारी पाच पॅसेंजर, आठ एक्स्प्रेस कोल्हापुरात आलीच नाही.

मिरज येथून सोमवारी हरिप्रिया, कोल्हापूर-नागपूर, राणी चन्नम्मा, गोंदिया कोल्हापूर या गाडीची वाहतूक सुरू होती. पुणे ते मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. रविवारी (दि. ४) महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्याने आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांनी पैसे परत घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर सोमवारी गर्दी केली. गाडी रद्द झाल्याने रेल्वे स्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ धोक्याच्या पातळीजवळ सुमारे १३ इंच पुराचे पाणी वाढल्याने ही वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.अनेक मार्गांवर पुराचे पाणी आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव १९ मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने या आगाराची वाहतूक बंद आहे. रविवारी (दि. ४) दिवसभर पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागातील १२०४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ४७०१२ किलोमीटरची वाहतूक झाली नाही.  पन्हाळगडावर जाण्याचा रस्ता बंद असल्याने बुधवारपेठेपर्यंतच वाहतूक सुरु आहे. 

पावसाचा जोर कायम राहिल्याने मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांची रेलचेल दिवसभर कमी होती. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, बेळगाव, आजरा, गडहिंग्लज या मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरूहोती. कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी तीनपर्यंत सुमारे ४० टक्के वाहतूक सुरळीत सुरू होती. काही मार्गांवर प्रवासी संख्या कमी असल्याने गाड्या रिकाम्या धावत होत्या.जोतिबाकडे भाविक कमीश्रावणषष्ठीमुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोल्हापूर विभागाच्या वतीने जादा गाडीचे नियोजन केले होते; मात्र पावसामुळे भाविक बाहेर न पडल्याने या गाडीने गर्दी कमी होती. अगदी तुरळकपणे ही वाहतूक सुरू होती. 

 

टॅग्स :state transportएसटीrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर