शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

कोल्हापुरातील सर्व रेल्वेगाड्या दुसऱ्यादिवशीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:05 IST

रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील सर्व रेल्वेगाड्या दुसऱ्यादिवशीही रद्दएसटीच्या १२०४ फेऱ्या रद्द : कुरुंदवाड आगार जयसिंगपूरमध्ये स्थलांतर

कोल्हापूर : रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.रुकडी येथील रेल्वेपुलाजवळ पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी धोका पातळीजवळ आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून मिरजेकडे आणि मिरजेहून कोल्हापूरकडे येणारी रेल्वेची वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंद करण्यात आली. यामुळे कोल्हापुरात दररोज येणारी पाच पॅसेंजर, आठ एक्स्प्रेस कोल्हापुरात आलीच नाही.

मिरज येथून सोमवारी हरिप्रिया, कोल्हापूर-नागपूर, राणी चन्नम्मा, गोंदिया कोल्हापूर या गाडीची वाहतूक सुरू होती. पुणे ते मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. रविवारी (दि. ४) महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्याने आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांनी पैसे परत घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर सोमवारी गर्दी केली. गाडी रद्द झाल्याने रेल्वे स्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ धोक्याच्या पातळीजवळ सुमारे १३ इंच पुराचे पाणी वाढल्याने ही वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.अनेक मार्गांवर पुराचे पाणी आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव १९ मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने या आगाराची वाहतूक बंद आहे. रविवारी (दि. ४) दिवसभर पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागातील १२०४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ४७०१२ किलोमीटरची वाहतूक झाली नाही.  पन्हाळगडावर जाण्याचा रस्ता बंद असल्याने बुधवारपेठेपर्यंतच वाहतूक सुरु आहे. 

पावसाचा जोर कायम राहिल्याने मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांची रेलचेल दिवसभर कमी होती. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, बेळगाव, आजरा, गडहिंग्लज या मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरूहोती. कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी तीनपर्यंत सुमारे ४० टक्के वाहतूक सुरळीत सुरू होती. काही मार्गांवर प्रवासी संख्या कमी असल्याने गाड्या रिकाम्या धावत होत्या.जोतिबाकडे भाविक कमीश्रावणषष्ठीमुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोल्हापूर विभागाच्या वतीने जादा गाडीचे नियोजन केले होते; मात्र पावसामुळे भाविक बाहेर न पडल्याने या गाडीने गर्दी कमी होती. अगदी तुरळकपणे ही वाहतूक सुरू होती. 

 

टॅग्स :state transportएसटीrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर