शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सर्व रेल्वेगाड्या दुसऱ्यादिवशीही रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 18:05 IST

रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हापुरातील सर्व रेल्वेगाड्या दुसऱ्यादिवशीही रद्दएसटीच्या १२०४ फेऱ्या रद्द : कुरुंदवाड आगार जयसिंगपूरमध्ये स्थलांतर

कोल्हापूर : रेल्वेची कोल्हापुरातील वाहतूक सोमवारी दुसऱ्या दिवशीही बंद ठेवण्यात आली. मिरज येथून काही मार्गांवरील रेल्वेची वाहतूक सुरू होती. पुराचे पाणी कुरुंदवाड बसस्थानकात घुसल्याने या आगाराचे स्थलांतर जयसिंगपूरला करण्यात आले.रुकडी येथील रेल्वेपुलाजवळ पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी धोका पातळीजवळ आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून मिरजेकडे आणि मिरजेहून कोल्हापूरकडे येणारी रेल्वेची वाहतूक दुसऱ्या दिवशीही बंद करण्यात आली. यामुळे कोल्हापुरात दररोज येणारी पाच पॅसेंजर, आठ एक्स्प्रेस कोल्हापुरात आलीच नाही.

मिरज येथून सोमवारी हरिप्रिया, कोल्हापूर-नागपूर, राणी चन्नम्मा, गोंदिया कोल्हापूर या गाडीची वाहतूक सुरू होती. पुणे ते मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. रविवारी (दि. ४) महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द झाल्याने आगाऊ बुकिंग केलेल्या प्रवाशांनी पैसे परत घेण्यासाठी रेल्वेस्थानकावर सोमवारी गर्दी केली. गाडी रद्द झाल्याने रेल्वे स्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. रुकडी येथील रेल्वे पुलाजवळ धोक्याच्या पातळीजवळ सुमारे १३ इंच पुराचे पाणी वाढल्याने ही वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.अनेक मार्गांवर पुराचे पाणी आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव १९ मार्गांवरील वाहतूक बंद केली आहे. गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने या आगाराची वाहतूक बंद आहे. रविवारी (दि. ४) दिवसभर पावसाचा जोर वाढल्याने कोल्हापूर विभागातील १२०४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे ४७०१२ किलोमीटरची वाहतूक झाली नाही.  पन्हाळगडावर जाण्याचा रस्ता बंद असल्याने बुधवारपेठेपर्यंतच वाहतूक सुरु आहे. 

पावसाचा जोर कायम राहिल्याने मध्यवर्ती बसस्थानकातील प्रवाशांची रेलचेल दिवसभर कमी होती. मुंबई, पुणे, सांगली, मिरज, बेळगाव, आजरा, गडहिंग्लज या मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरूहोती. कोकणात जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी तीनपर्यंत सुमारे ४० टक्के वाहतूक सुरळीत सुरू होती. काही मार्गांवर प्रवासी संख्या कमी असल्याने गाड्या रिकाम्या धावत होत्या.जोतिबाकडे भाविक कमीश्रावणषष्ठीमुळे भाविकांची गर्दी लक्षात घेता, कोल्हापूर विभागाच्या वतीने जादा गाडीचे नियोजन केले होते; मात्र पावसामुळे भाविक बाहेर न पडल्याने या गाडीने गर्दी कमी होती. अगदी तुरळकपणे ही वाहतूक सुरू होती. 

 

टॅग्स :state transportएसटीrailwayरेल्वेkolhapurकोल्हापूर