शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

कोल्हापुरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST

शासनाने सर्व व्यापारी आस्थापने सुरू ठेवण्याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेतला नाही, तर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्याचे कोल्हापूर चेंबरने ...

शासनाने सर्व व्यापारी आस्थापने सुरू ठेवण्याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेतला नाही, तर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्याचे कोल्हापूर चेंबरने जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी विविध संलग्नित संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये सुरुवातीला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यानंतर राज्यपातळीवरील संघटनांच्या सूचनेनुसार आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर, कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री आठनंतर दुकाने सुरू ठेवू नयेत. शनिवार, रविवारच्या विकेंड लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले. कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, सचिव जयेश ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. तौफिक मुल्लाणी, कुलदीप गायकवाड, जयंत गोयाणी, अजित कोठारी, आदींनी काही सूचना केल्या. यावेळी

हरिभाई पटेल, धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, प्रशांत शिदे, राहुल नष्टे, संपत पाटील, अनिल धडाम, प्रकाश केसरकर, प्रदीप भारमल, सीमा जोशी, शिवानंद पिसे, धर्मपाल जिरगे, अतुल शहा उपस्थित होते. दरम्यान, दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्यभरातील व्यापारी, व्यावसायिकांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानुसार कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांनी शुक्रवारीदेखील दुकाने बंद ठेवली. काहीजणांनी सकाळी दुकाने सुरू करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनाही दुकाने बंद ठेवण्याची सूचना कोल्हापूर चेंबरने केली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वळगता अन्य दुकाने बंद राहिली. त्यामुळे महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी परिसरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

चौकट

‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’

मास्क, सॅनिटायझरच्या वापराचे काटेकोरपणे पालन करा. मास्क नसलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नका. सकाळी सात ते रात्री आठ यावेळेत दुकाने सुरू ठेवा, असे आवाहन जयेश ओसवाल यांनी व्यापारी, व्यावसायिकांना केले.