शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
ठाण्यात मनसे, उद्धवसेनेचे दोन उमेदवार निवडणुकीतून बाहेर! अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, कोणाचे अर्ज झाले रद्द? 
4
'हा देश सर्वांचा; धर्म, जात, भाषा आणि प्रदेशाच्या आधारे भेदभाव होऊ नये'- मोहन भागवत
5
शिंदेसेनेला धक्का, पाच उमेदवारी अर्ज बाद; एबी फॉर्मवर खाडाखोड, झेरॉक्स जोडल्याने ठरले अवैध
6
४० वर्षे ठाकरेंचा निष्ठावंत, एबी फॉर्मही घेतला; ऐनवेळी पक्षाला रामराम अन् भाजपातून अर्ज भरला
7
रोममध्ये विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाचा रोमान्स, 'त्या' फोटोवरुन चाहत्यांनी ओळखलंच!
8
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
9
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
10
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
11
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
12
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
13
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
14
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
15
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
16
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
17
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
18
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
19
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
20
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:24 IST

शासनाने सर्व व्यापारी आस्थापने सुरू ठेवण्याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेतला नाही, तर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्याचे कोल्हापूर चेंबरने ...

शासनाने सर्व व्यापारी आस्थापने सुरू ठेवण्याबाबत गुरुवारपर्यंत निर्णय घेतला नाही, तर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक घेण्याचे कोल्हापूर चेंबरने जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी विविध संलग्नित संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी, व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये सुरुवातीला कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती दिली. त्यानंतर राज्यपातळीवरील संघटनांच्या सूचनेनुसार आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर, कोरोनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सर्व दुकाने सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री आठनंतर दुकाने सुरू ठेवू नयेत. शनिवार, रविवारच्या विकेंड लॉकडाऊनचे पालन करावे, असे आवाहन संजय शेटे यांनी केले. कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, सचिव जयेश ओसवाल यांनी मार्गदर्शन केले. तौफिक मुल्लाणी, कुलदीप गायकवाड, जयंत गोयाणी, अजित कोठारी, आदींनी काही सूचना केल्या. यावेळी

हरिभाई पटेल, धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, राजू पाटील, प्रशांत शिदे, राहुल नष्टे, संपत पाटील, अनिल धडाम, प्रकाश केसरकर, प्रदीप भारमल, सीमा जोशी, शिवानंद पिसे, धर्मपाल जिरगे, अतुल शहा उपस्थित होते. दरम्यान, दुकाने सुरू ठेवण्याबाबत राज्यभरातील व्यापारी, व्यावसायिकांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी दोन दिवसांमध्ये निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानुसार कोल्हापुरातील व्यापारी, व्यावसायिकांनी शुक्रवारीदेखील दुकाने बंद ठेवली. काहीजणांनी सकाळी दुकाने सुरू करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनाही दुकाने बंद ठेवण्याची सूचना कोल्हापूर चेंबरने केली. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वळगता अन्य दुकाने बंद राहिली. त्यामुळे महाद्वार रोड, ताराबाई रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी परिसरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला.

चौकट

‘मास्क नाही, तर प्रवेश नाही’

मास्क, सॅनिटायझरच्या वापराचे काटेकोरपणे पालन करा. मास्क नसलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊ नका. सकाळी सात ते रात्री आठ यावेळेत दुकाने सुरू ठेवा, असे आवाहन जयेश ओसवाल यांनी व्यापारी, व्यावसायिकांना केले.