शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी 'टोल'च्या धर्तीवर आंदोलन, सर्वपक्षीय कृती समितीचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 16:45 IST

दोन्ही प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय आपली रस्त्यावरील लढाई मागे घ्यायची नाही, प्रसंग आलाच तर मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

कोल्हापूर : संघर्ष केल्याशिवाय कोल्हापूरला काही मिळत नाही, म्हणूनच आता शहराची हद्दवाढ आणि सर्किट बेंचसाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहा, असे आवाहन सोमवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय हद्दवाढ, सर्किट बेंच कृती समितीच्या बैठकीत करण्यात आले. या लढाईचा पहिला टप्प्या ठरविण्यासाठी दि. ११ सप्टेंबरला व्यापक मेळावा घेण्याचेही यावेळी ठरले. दोन्ही प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय आपली रस्त्यावरील लढाई मागे घ्यायची नाही, प्रसंग आलाच तर मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.कोल्हापूर शहराची हद्दवाढ व सर्किट बेंच प्रश्नी सोमवारी महाराणा प्रताप चौक येथे कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी महापौर आर. के. पोवार होते. हद्दवाढ, सर्किट बेंच प्रश्नी बरीच आंदोलने झाली. मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी झाल्या, बैठका झाल्या. परंतु, कोणत्याही सरकारने त्याबाबत औदार्य दाखविले नाही. त्यामुळे आता सरकार कोणाचेही असो मागे हटायचे नाही. ज्या पद्धतीने टोलसाठी आक्रमक आंदोलन उभारले त्याच धर्तीवर आंदोलन उभारले जाईल, त्यासाठी सर्वांनी तयार राहावे, असे आवाहन करण्यात आले.यावेळी सुभाष जाधव, अनिल कदम, बाबा पार्टे, महादेवराव आडगुळे यांची भाषणे झाली. यावेळी बार असो.चे अध्यक्ष गिरीष खडके, ॲड. प्रशांत चिटणीस, दिलीप पवार, लाला गायकवाड, अशोक भंडारे, पूजा साळोखे, शीतल तिवडे, सुमन वाडेकर उपस्थित होते.

११ सप्टेंबरला बैठक

आंदोलनाचा पुढील टप्पा ठरविण्यासाठी ११ सप्टेंबरला शाहू स्मारक भवनात व्यापक मेळावा आयोजित करण्यात येईल, असे महाराष्ट्र, गोवा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक घाटगे यांनी सांगितले.

कोण काय म्हणाले -

बाबा इंदूलकर : जोपर्यंत आंदोलन तीव्र होणार नाही तोपर्यंत सरकार आपल्या मागण्यांकडे गांभीर्याने बघणार नाही. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय महापालिका निवडणूकही होऊ द्यायची नाही.आर. के. पोवार : गेली अनेक वर्षे आंदोलने सुरू आहेत. कोणतेही सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. आता निर्णायक आंदोलन करून सरकारला निर्णय घेणे भाग पाडूया.दिलीप देसाई : सरकारने सर्व प्रथम ४२ गावांचे प्राधिकरण स्थापन केले आहे, त्यातील हद्दवाढीत समावेश असलेली गावे प्राधिकरणातून वगळण्यात यावीत.राजू जाधव : आमदार, खासदारांचे बंगले कोल्हापुरात असून हद्दवाढीला विरोध करतात, हे चुकीचे आहे. यापुढे दुहेरी भूमिका घेतलेली चालणार नाही.संदीप देसाई : मुख्यमंत्र्यांच्या दारात बसून आंदोलन करूया. जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेऊया.किशोर घाडगे : जिल्ह्यातील काही नेते शहरात एक आणि गावात एक अशा दुहेरी भूमिका घेतात. त्यांचा बुरखा फाडण्याची आवश्यकता आहे.ॲड. विवके घाटगे : मुख्यमंत्री व मुख्य न्यायाधीश यांची बैठक ठरली आहे. महिन्याभरात चर्चेच्या माध्यमातून सर्किट बेंचचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर