शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सडोली खालसाचे वेगळेपण : दारू, जेवणावळींना फाटा देत पाडला वेगळा पायंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:23 IST

Grampanchyat Election Kolhapur- मतांसाठी पैशाचे वाटप नाही. दारू नाही की, मटणाच्या जेवणावळी. अशा सर्व गैरप्रकारांना फाटा देत यंदा सडोली खालसा (ता. करवीर) गावाने ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श पायंडा पाडला.

ठळक मुद्देदारू, जेवणावळींना फाटा देत पाडला वेगळा पायंडाआजी-माजी आमदारांच्या गावाचे पुढचे पाऊल

कोल्हापूर : मतांसाठी पैशाचे वाटप नाही. दारू नाही की, मटणाच्या जेवणावळी, अशा सर्व गैरप्रकारांना फाटा देत यंदा सडोली खालसा (ता. करवीर) गावाने ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श पायंडा पाडला.

आ. पी.एन. पाटील व माजी आ. संपतराव पवार यांचे हे गाव; परंतु या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावाचे नाव बदनाम होऊ नये यासाठी चांगला पुढाकार घेतला. यावेळेच्या नाही; परंतु पुढील निवडणुकीत तरी अनेक गावांनी त्याचे अनुकरण केल्यास लोकशाही अधिक बळकट होईल.सडोली हे अत्यंत सधन-संपन्न गाव. बुलडोझर व्यावसायिकांचे गाव म्हणूनही त्याची ख्याती. चांगली जमीन, कष्टकरी शेतकरी यामुळे चांगले पीक व त्यामुळे समृद्धीने नटलेले हे गाव. त्यात काँग्रेस व शे.का. पक्षाचे स्थानिक राजकारणात बळकट गट. गावची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजार. पाच प्रभागांत १३ जागा निवडून द्यायच्या होत्या.

त्यासाठी तीन पॅनलसह ४१ उमेदवार रिंगणात होते. अगोदरच काँग्रेस, शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले; परंतु जागा वाटपांत समझोता झाला नाही. त्यातही काँग्रेस व शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांचे निवडणूक बिनविरोध करण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न होते; परंतु यश आले नाही. त्यामुळे निवडणूक लागलीच आहे तर अन्य कोणत्याही गोष्टींना थारा द्यायचा नाही, असे प्रमुख कार्यकर्त्यांनी ठरविले. त्यास गावातील स्वाभिमानी जनतेनेही मोलाची साथ दिली.

त्यामुळे एकूण निवडणुकीदरम्यान प्रचारातही गावात कुठेही तणाव नव्हता. कुणी कुणावरही दादागिरी, दहशत दाखविणे, असे प्रकार घडले नाहीत. एकही जेवणावळ उठली नाही किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अन्य कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब झाला नाही. प्रचार करावा, ग्रामस्थांना आपली भूमिका पटवून द्यावी, त्यांनी मतदान करावे व जे निवडून येतील ते गावाचा कारभार पाहतील, असे सूत्र ठरल्याने यंदा गावची निवडणूक चांगल्या अर्थाने गाजली. पंचक्रोशीतूनही त्याबद्दल कौतुक झाले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर