शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘अक्षरगप्पा’ उपक्रमाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम, आज कौशल इनामदार गप्पा रंगविणार, अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने ११ वर्षे रसिकमान्य अक्षरगप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:30 IST

‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने गेली ११ वर्षे ‘अक्षरगप्पा’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम आज, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता राम गणेश गडकरी हॉल (पेटाळा) येथे आयोजित करण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे‘अक्षरगप्पा’ उपक्रमाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम आजअक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने ११ वर्षे रसिकमान्य अक्षरगप्पा

-समीर देशपांडे

‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार’ यांच्या वतीने गेली ११ वर्षे ‘अक्षरगप्पा’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम आज, सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता राम गणेश गडकरी हॉल (पेटाळा) येथे आयोजित करण्यात आला आहे. 

प्रत्येक महिन्याचा चौथा रविवार. सायंकाळी पाचची वेळ. एक-एक रसिकश्रोते जमा होऊ लागतात. सव्वापाचला कार्यक्रम सुरू होतो. पाचच मिनिटांचे औपचारिक स्वागत, प्रास्ताविक, वक्त्यांचा परिचय होतो आणि थेट वक्ता बोलू लागतो. तास, सव्वातासात कार्यक्रम संपतो. वेगळ्या विषयावर काही नवीन ऐकल्याचं समाधान घेऊन रसिक चहापानानंतर घरी परततात.गेली ११ वर्षे कोळेकर तिकटीवरील ‘अक्षर दालन’मध्ये अनेक रसिकश्रोते या मासिक दृश्याचे साक्षीदार आहेत. रवींद्र जोशी यांच्या ‘अक्षर दालन’ या ग्रंथभांडाराचे उद्घाटन झाले आणि त्यावेळी हे ऐसपैस दालन पाहून ‘निर्धार’चे समीर देशपांडे यांनी त्यांना दर महिन्याला असा एखादा कार्यक्रम घेता येईल का, अशी विचारणा केली. कुणालाही ‘नाही’ म्हणण्याची सवय नसलेल्या जोशी यांनी ही कल्पना उचलून धरली.पहिल्याच कार्यक्रमासाठी जाजम घातले गेले. कुणी आपले अनुभव सांगितले. कुणी कविता म्हटल्या आणि ‘अक्षरगप्पां’ना सुरुवात झाली. संयोजकांनी सुरुवातीपासूनच विषयाचे आणि क्षेत्राचे कोणतेही बंधन घालून न घेतल्याने हा उपक्रम लोकप्रिय होऊ लागला.माजी तुरुंग अधिकारी टी. डी. कुलकर्णी यांच्यापासून ते कामगार नेते भाई जगताप यांच्यापर्यंत आणि व्यसनमुक्तीवाल्या अनिल अवचट यांच्यापासून ते ख्यातनाम गायक महेश काळे यांच्यापर्यंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांपासून सर्वसामान्यांनीही या कट्ट्यावर हजेरी लावल्याने श्रोत्यांना विविध विषयांतील चौफेर अनुभव घेता येऊ लागले. रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासाठी प्रसिद्ध कन्नड साहित्यिक भैराप्पा उपस्थित राहिले. ‘लवासा’वर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पत्रकार निळू दामले यांनी सुवर्णमहोत्सवानिमित्त आपली भूमिका मांडली.

अमृत महोत्सवासाठी आदिवासी पाड्यावर काम करणाऱ्या डॉ. स्मिता कोल्हे आल्या आणि आता शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी’ हे सुरेश भटांचे मराठी अभिमानगीत मराठी घराघरांत पोहोचविणाऱ्या कौशल इनामदार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही या गप्पा रंगविल्या आहेत.कॉ. गोविंद पानसरे, विक्रमसिंह घाटगे, जगदीश खेबूडकर, चंद्रकांत पाटगावकर, उदयसिंगराव गायकवाड, नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे या दिवंगतांनीही या गप्पांच्या माध्यमातून रसिकांशी संवाद साधला होता; तर खासदार राजू शेट्टी, हिंदकेसरी दीनानाथसिंह, लक्ष्मी धौल, सुनीलकुमार लवटे, दिग्दर्शक चंद्रकांत जोशी, अभिनेते सुबोध भावे, हृषिकेश जोशी, नितीन कुलकर्णी यासारख्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला आहे. आता या कार्यक्रमाची शताब्दी साजरी होत असताना या ‘अक्षरगप्पा’अशाच रसिकसेवेत रुजू राहाव्यात, यासाठी शुभेच्छा. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य