शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

छ. संभाजी महाराजांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून संभाजीराजेंचा अजितदादांना सवाल; 'कोणता संदर्भ घेऊन बोललात?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 14:05 IST

जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. भाजपा आध्यात्मिक आघाडीच्यावतीने तर अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. तर भाजपने राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करत तीव्र निषेध केला. यातच आता यावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.संभाजीराजे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचेही रक्षण केले हे कोणी नाकारु शकत नाही. म्हणून संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेतच तर धर्मरक्षक देखील आहेत असे म्हणणे चुकीचे होणार नाही. अजित पवारांनी जे वक्तव्य केले ते चुकीचे आहे. याबाबत अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणता संदर्भ घेवून हे विधान केले हे त्यांनीच सांगावे. कोणतीही एतिहासिक घटना बोलायची असेल तर त्याचा अभ्यास पुर्ण केल्याशिवाय आपली प्रतिक्रिया देवू नये अशी अजित पवारांना माझी सूचना राहिल असेही ते म्हणाले. अजित पवार जे बोले ते अर्ध सत्य बोलले. जबाबदार पुढाऱ्यांनी विकृत बोलू नये. संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते अस जे विधान केले ते पुर्णपणे चुकीचे असल्याचेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.काय म्हणाले होते अजित पवारविधानसभेत बोलताना पवार म्हणाले, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असून इथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. तसेच 'बाल शौर्य पुरस्कार' हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असेही अजित पवार यांनी म्हटले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीAjit Pawarअजित पवार