शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा दि. २४ डिसेंबरपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 16:34 IST

गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देकोल्हापुरातून विमानाचे २४ डिसेंबरपासून उड्डाणसंभाजीराजे यांची माहिती; मंगळवार, बुधवार, रविवारी सेवातिकीटाची नोंदणी गुरुवारपासून

कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूरची विमानसेवा आता दि. २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यादिवशी येथून एअर डेक्कन कंपनीच्या विमानाचे उड्डाण होणार आहे. कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा आठवड्यातून दर मंगळवार, बुधवार आणि रविवारी असणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी दिली.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांची खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी सकाळी दिल्ली येथे भेट घेतली. उडाण योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर वाहतूक परवाना आणि मुंबईतील स्लॉट (वेळ) या कारणास्तव विमानसेवा सुरु होण्यास विलंब होत होता. याच संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरुवातीपासून ही सेवा सुरु होण्यासाठी मुंबई, दिल्ली येथे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता.

गेल्या आठवड्यात त्यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांची भेट घेतली होती. दि. २५ व २६ आॅक्टोबर रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नागरी उड्डाण संचालनालयाच्या संयुक्त पथकाने कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली होती. या पाहणीचा अहवाल सादर झाल्यानंतर डीजीसीएने कोल्हापूर विमानतळाला प्रवासी वाहतूक परवाना दिला आहे.

दि. २४ डिसेंबरपासून कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्याचे नियोजन पूर्ण झाले असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील एका अधिकाऱ्यांने सांगितले असल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली. यानुसार एअर डेक्कनची ही विमानसेवा दर मंगळवार, बुधवार व रविवारी असणार आहे.

मुंबईवरून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापूरसाठी विमान उडान भरेल. दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी ते कोल्हापूरला पोहोचेल. याच दिवशी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी कोल्हापूर वरून हे विमान मुंबईसाठी उडान भरेल आणि दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी मुंबईला पोहोचेल अशी माहिती एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

कोल्हापूरला मोठा फायदाविमानसेवा सुरू होण्याबाबत केंद्रीयमंत्री अशोक गजपती राजू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण कोल्हापूर वासियांतर्फे आभार व्यक्त करतो, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. ते म्हणाले, उडाण योजनेमुळे कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून निश्चितपणे गुंतवणूक वाढेल. संपूर्ण महाराष्ट्राच्यादृष्टीने कोल्हापूर हे महत्वपूर्ण शहर असून विमानसेवेच्या प्रारंभामुळे कोल्हापूर जिल्ह्याला मोठा फायदा होईल.

तिकीटाची नोंदणी गुरुवारपासूनएअर डेक्कनचे विमान हे दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. मुंबई-कोल्हापूर या विमानसेवेच्या तिकीटाची नोंदणी प्रवासी हे गुरुवारपासून करु शकतात, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील व एअर डेक्कनच्या अधिकाऱ्यांनी दिली असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती