शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत शहरात दोन खुनांचा थरार; फुलेवाडीत तरूणाचा पाठलाग करून धारदार शस्त्राने खून

By उद्धव गोडसे | Updated: November 14, 2023 09:43 IST

मंगळवार पेठेत डोक्यात काठी घातल्याने पानटपरी चालक ठार 

कोल्हापूर : ऐन दिवाळीत शहरात सोमवारी (दि. १३) रात्री दोन घटनांमध्ये दोघांचा निर्घृण खून झाल्याने खळबळ उडाली. फुलेवाडी परिसरात शेतकरी धाब्याजवळ तीन हलेखोरानी पाठलाग करून कोयता, एडका आणि तलवारीचे १६ वार करून सराईत गुंड ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय २४, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याचा खून केला. तर मंगळवार पेठेत बालगोपाल तालमीजवळ सतीश बाबुराव खोत (वय ५८, र. मंगळवार पेठ) या पान टपरीचालकाच्या  डोक्यात काठीने मारहाण झाल्याने त्यांचा  खून झाला. या दोन्ही घटनांनंतर सोमवारी रात्री सीपीआरच्या अपघात विभागासमोर मोठी गर्दी झाली होती.

याबाबत अधिक माहिती आशी की, संपूर्ण शहर दिवाळीचा सण साजरा करण्यात दंग असताना शहरातील दोन खुनाच्या घटना घडल्या. हाणामारीचे गुन्हे दाखल असलेला पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत ऋषीकेश नलवडे हा फुलेवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये मित्रासोबत जेवण करण्यासाठी निघाला होता. मित्राच्या दुचाकीवर पाठीमागे बसून जाताना काही तरुण पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच त्याने दुचाकीवरून उडी मारली. आपल्या पोरांना बोलवून घे, असे मित्राला सांगून तो अंधारातून पळत सुटला. तोंडाला मास्क लावलेल्या तिघांनी ऋषीकेशचा पाठलाग केला. बंद पडलेल्या गुऱ्हाळगृहाजवळ ऋषीकेशला खाली पाडून त्याच्यावर तलवार, चाकू, एडकाने सपासप वार केले. मान, हात, पाठीवर १६ वार झाले. प्रतिकार करताना त्याच्या हाताची बोटेही तुटली. तो मेल्याची खात्री करूनच हल्लेखोर निघून गेले.

काही वेळातच ऋषिकेशचे मित्र घटनास्थळी पोहोचले. रक्ताने माखलेल्या ऋषीकेशला तातडीने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.  मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऋषिकेशचा खून झाल्याचे समजताच त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. वर्चस्ववाद आणि टोळी युद्धातून खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे.

सीपीआरमध्ये पोलिसांचा फौजफाटा  खुनाच्या घटनेची माहिती मिळताच प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्यासह पथक सीपीआर lमध्ये दाखल झाले. मृताचे नातेवाईक आणि मित्रांची गर्दी वाढल्याने पोलीसांनी बंदोबस्त वाढवला.

 मंगळवार पेठेत पाणटपरी चालकाचा खून मंगळवार पेठेत बालगोपाल तालमीजवळ राहणारे पानटपरी चालक सतीश बाबुराव खोत हे घरासमोर रात्री नऊच्या सुमारास झोपले होते. त्यावेळी त्यांचा एका मित्रासोबत वाद झाला. दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. यातून मित्राने काठी आणून झोपलेले खोत यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. मारहाणीत डोके फुटून खोत यांचा जागीच मृत्यू झाला. गल्लीतील लोकांनी रिक्षातून खोत यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस