शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागातील शेतीला साडेतीन हजार कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 06:57 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत. यामुळे प्रती एकरी सरासरी किमान ७० हजार रुपये उत्पन्न गृहीत धरले, तरी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका साडेपाच लाखांवर शेतकऱ्यांना बसला आहे. यात जिरायती, बागायती क्षेत्रांतील पिकांसह फळबागांचा समावेश आहे.अजून पंचनामे झाले नसले, तरी तलाठी व सर्कलकडून घेतलेल्या नजरअंदाज पाहणीनुसार, कृषी विभागाने हा अहवाल तयार केला आहे. यात कोल्हापूर विभागात मोडणाºया तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचे झाल्याचे दिसत आहे, त्या खालोखाल सातारा आणि त्यानंतर सांगलीचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ऊसाचेच १,२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच संततधार बरसलेल्या पावसामुळे तीन जिल्ह्यांतील महापुराने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत घरादारांसह आजूबाजूची शेतीही कवेत घेतली. नदीकाठच्या पिकांसह जवळपास दीड-दोन किलोमीटर परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली. सलग पडणारा पाऊस आणि आठ दिवसांहून अधिक काळ महापुराच्या पाण्यात ही पिके राहिल्याने पूर्णपणे कुजली आहेत, यात ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग या प्रमुख पिकांसह कडधान्य पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सर्वाधिक फटका ऊस आणि भात पिकाला बसला आहे.कृषी विभागाने तयार केलेल्या नजरअंदाज अहवालात जिरायती, बागायती आणि फळ पीक असे हेक्टरनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. जिरायतीमध्ये दोन लाख ५१ हजार ८१४ शेतकºयांचे ७२ हजार ६२२ हेक्टरवरील पिके पूरबाधित आहे. बागायतीमध्ये दोन लाख ८६ हजार १९९ शेतकºयांचे एक लाख १५ हजार १३ हेक्टरवरील पीक बाधित आहे. फळपिकांमध्ये समाविष्ट असलेल्या केळी, द्राक्षांसह अन्य फळपिकांचे २६ हजार ३४९ शेतकºयांचे एक लाख १७0८ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा आकडा वाढणारकितीही कमी उत्पादन झाले तरी तरी एकरी किमान सरासरी ७० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागतेच. ऊस तसेच अन्य बागायती पिकांचे, फळबांगाचे उत्पन्न यापेक्षा कितीतरी अधीक असते. त्यामुळे नुकसानीचा हा आकडा साडेतीन हजार कोटी रुपयापेक्षांही अधिक असू शकतो.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरagricultureशेती