शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

कोल्हापूर विभागातील शेतीला साडेतीन हजार कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 06:57 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत. यामुळे प्रती एकरी सरासरी किमान ७० हजार रुपये उत्पन्न गृहीत धरले, तरी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका साडेपाच लाखांवर शेतकऱ्यांना बसला आहे. यात जिरायती, बागायती क्षेत्रांतील पिकांसह फळबागांचा समावेश आहे.अजून पंचनामे झाले नसले, तरी तलाठी व सर्कलकडून घेतलेल्या नजरअंदाज पाहणीनुसार, कृषी विभागाने हा अहवाल तयार केला आहे. यात कोल्हापूर विभागात मोडणाºया तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचे झाल्याचे दिसत आहे, त्या खालोखाल सातारा आणि त्यानंतर सांगलीचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ऊसाचेच १,२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच संततधार बरसलेल्या पावसामुळे तीन जिल्ह्यांतील महापुराने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत घरादारांसह आजूबाजूची शेतीही कवेत घेतली. नदीकाठच्या पिकांसह जवळपास दीड-दोन किलोमीटर परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली. सलग पडणारा पाऊस आणि आठ दिवसांहून अधिक काळ महापुराच्या पाण्यात ही पिके राहिल्याने पूर्णपणे कुजली आहेत, यात ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग या प्रमुख पिकांसह कडधान्य पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सर्वाधिक फटका ऊस आणि भात पिकाला बसला आहे.कृषी विभागाने तयार केलेल्या नजरअंदाज अहवालात जिरायती, बागायती आणि फळ पीक असे हेक्टरनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. जिरायतीमध्ये दोन लाख ५१ हजार ८१४ शेतकºयांचे ७२ हजार ६२२ हेक्टरवरील पिके पूरबाधित आहे. बागायतीमध्ये दोन लाख ८६ हजार १९९ शेतकºयांचे एक लाख १५ हजार १३ हेक्टरवरील पीक बाधित आहे. फळपिकांमध्ये समाविष्ट असलेल्या केळी, द्राक्षांसह अन्य फळपिकांचे २६ हजार ३४९ शेतकºयांचे एक लाख १७0८ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा आकडा वाढणारकितीही कमी उत्पादन झाले तरी तरी एकरी किमान सरासरी ७० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागतेच. ऊस तसेच अन्य बागायती पिकांचे, फळबांगाचे उत्पन्न यापेक्षा कितीतरी अधीक असते. त्यामुळे नुकसानीचा हा आकडा साडेतीन हजार कोटी रुपयापेक्षांही अधिक असू शकतो.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरagricultureशेती