शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागातील शेतीला साडेतीन हजार कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 06:57 IST

गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत.

- वसंत भोसलेकोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे कोल्हापूर विभागात येणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांतील दोन लाख हेक्टरवरील म्हणजेच ५ लाख एकरातील पिके कुजली आहेत. यामुळे प्रती एकरी सरासरी किमान ७० हजार रुपये उत्पन्न गृहीत धरले, तरी सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा फटका साडेपाच लाखांवर शेतकऱ्यांना बसला आहे. यात जिरायती, बागायती क्षेत्रांतील पिकांसह फळबागांचा समावेश आहे.अजून पंचनामे झाले नसले, तरी तलाठी व सर्कलकडून घेतलेल्या नजरअंदाज पाहणीनुसार, कृषी विभागाने हा अहवाल तयार केला आहे. यात कोल्हापूर विभागात मोडणाºया तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान कोल्हापूर जिल्ह्याचे झाल्याचे दिसत आहे, त्या खालोखाल सातारा आणि त्यानंतर सांगलीचा क्रमांक लागतो. कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ऊसाचेच १,२०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.आॅगस्टच्या सुरुवातीपासूनच संततधार बरसलेल्या पावसामुळे तीन जिल्ह्यांतील महापुराने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत घरादारांसह आजूबाजूची शेतीही कवेत घेतली. नदीकाठच्या पिकांसह जवळपास दीड-दोन किलोमीटर परिसरातील सर्व पिके पाण्याखाली गेली. सलग पडणारा पाऊस आणि आठ दिवसांहून अधिक काळ महापुराच्या पाण्यात ही पिके राहिल्याने पूर्णपणे कुजली आहेत, यात ऊस, भात, सोयाबीन, भुईमूग या प्रमुख पिकांसह कडधान्य पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. सर्वाधिक फटका ऊस आणि भात पिकाला बसला आहे.कृषी विभागाने तयार केलेल्या नजरअंदाज अहवालात जिरायती, बागायती आणि फळ पीक असे हेक्टरनिहाय वर्गीकरण करण्यात आले आहे. जिरायतीमध्ये दोन लाख ५१ हजार ८१४ शेतकºयांचे ७२ हजार ६२२ हेक्टरवरील पिके पूरबाधित आहे. बागायतीमध्ये दोन लाख ८६ हजार १९९ शेतकºयांचे एक लाख १५ हजार १३ हेक्टरवरील पीक बाधित आहे. फळपिकांमध्ये समाविष्ट असलेल्या केळी, द्राक्षांसह अन्य फळपिकांचे २६ हजार ३४९ शेतकºयांचे एक लाख १७0८ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे.नुकसानीचा आकडा वाढणारकितीही कमी उत्पादन झाले तरी तरी एकरी किमान सरासरी ७० हजार रुपयांचे उत्पन्न शेतकºयांच्या हाती लागतेच. ऊस तसेच अन्य बागायती पिकांचे, फळबांगाचे उत्पन्न यापेक्षा कितीतरी अधीक असते. त्यामुळे नुकसानीचा हा आकडा साडेतीन हजार कोटी रुपयापेक्षांही अधिक असू शकतो.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरagricultureशेती